शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Coronavirus : देशभरात टोलवसुलीला सुरुवात, मध्यरात्रीपासूनच वाहनांकडून पैसे वसुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 08:18 IST

राज्यातील सर्व टोलनाक्यावर टोलवसुली सुरू करण्यात येणार असल्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या सचिवांनी जारी केले आहेत.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २० एप्रिलपासून देशातील काही राज्यांमध्ये, काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, देशभरात २० एप्रिलपासून लॉकडाऊनमध्ये काही बदल करण्यात आले आहे. त्यानुसार, शेतीसंदर्भातील आणि काही उद्योग सुरू करण्यात येत आहेत. त्यातच, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने २० एप्रिलच्या मध्यरात्रीपासूनच टोलवसुलीला सुरुवात केली आहे. राज्यातील वाशीजवळील महामार्गावरही मध्यरात्रीपासूनच टोलवसुली सुरु झाली आहे. दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अनेक टोलनाक्यांवर रात्रीच वाहनांकडून टोलवुसली करण्यात आली.  

राज्यातील सर्व टोलनाक्यावर टोलवसुली सुरू करण्यात येणार असल्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या सचिवांनी जारी केले आहेत. त्यानुसार, राज्यभरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणाच्या अधिपत्याखालील सर्व टोलनाक्यांवर टोलवसुली सुरू करण्यात आली आहे. तसेच, रस्ते आणि महामार्ग विकास प्राधिकरणाच्या आदेशानुसार देशभरात टोलवसुली सुरु झाली असून २० एप्रिलच्या मध्यरात्रीपासूनच वाहनांकडून टोलवसुली करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, सध्या केवळ अत्यावश्यक सेवांची वाहतूक होत आहे, त्याच वाहनांना आंतरजिल्हा, आंतरराज्य सीमांमध्ये प्रवेश देण्यात येत आहे. याशिवाय, पोलीस परवानगीने अत्यावश्यक आणि अतिदक्षता व महत्वाच्या प्रसंगीच सर्वसामान्य नागरिकांना वाहतूकीचा परवानगी देण्यात आली आहे. 

सरकारने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन दरम्यान २९ मार्चपासून टोलवसुली थांबवली होती. त्यामुळे अत्यावश्यक वस्तूंची ने-आण करणे सोपे झाले होते. लॉकडाउनच्या काळात सर्व सेवा बंद होत्या. मात्र, आता देशभरात कोरोना हॉटस्पॉट नसलेल्या ठिकाणी २० एप्रिलपासून सवलत देण्यात येत आहे. तसेच काही भागात काही अटी लागू करून उद्योगधंद्यांना परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यावसायिक आणि खासगी वाहने रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच, २० एप्रिलपासून सर्वांना प्रवास करताना टोल सुरू करण्यात आला आहे.

टॅग्स :tollplazaटोलनाकाcorona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबईdelhiदिल्ली