शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

Coronavirus : देशभरात टोलवसुलीला सुरुवात, मध्यरात्रीपासूनच वाहनांकडून पैसे वसुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 08:18 IST

राज्यातील सर्व टोलनाक्यावर टोलवसुली सुरू करण्यात येणार असल्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या सचिवांनी जारी केले आहेत.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २० एप्रिलपासून देशातील काही राज्यांमध्ये, काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, देशभरात २० एप्रिलपासून लॉकडाऊनमध्ये काही बदल करण्यात आले आहे. त्यानुसार, शेतीसंदर्भातील आणि काही उद्योग सुरू करण्यात येत आहेत. त्यातच, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने २० एप्रिलच्या मध्यरात्रीपासूनच टोलवसुलीला सुरुवात केली आहे. राज्यातील वाशीजवळील महामार्गावरही मध्यरात्रीपासूनच टोलवसुली सुरु झाली आहे. दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अनेक टोलनाक्यांवर रात्रीच वाहनांकडून टोलवुसली करण्यात आली.  

राज्यातील सर्व टोलनाक्यावर टोलवसुली सुरू करण्यात येणार असल्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या सचिवांनी जारी केले आहेत. त्यानुसार, राज्यभरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणाच्या अधिपत्याखालील सर्व टोलनाक्यांवर टोलवसुली सुरू करण्यात आली आहे. तसेच, रस्ते आणि महामार्ग विकास प्राधिकरणाच्या आदेशानुसार देशभरात टोलवसुली सुरु झाली असून २० एप्रिलच्या मध्यरात्रीपासूनच वाहनांकडून टोलवसुली करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, सध्या केवळ अत्यावश्यक सेवांची वाहतूक होत आहे, त्याच वाहनांना आंतरजिल्हा, आंतरराज्य सीमांमध्ये प्रवेश देण्यात येत आहे. याशिवाय, पोलीस परवानगीने अत्यावश्यक आणि अतिदक्षता व महत्वाच्या प्रसंगीच सर्वसामान्य नागरिकांना वाहतूकीचा परवानगी देण्यात आली आहे. 

सरकारने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन दरम्यान २९ मार्चपासून टोलवसुली थांबवली होती. त्यामुळे अत्यावश्यक वस्तूंची ने-आण करणे सोपे झाले होते. लॉकडाउनच्या काळात सर्व सेवा बंद होत्या. मात्र, आता देशभरात कोरोना हॉटस्पॉट नसलेल्या ठिकाणी २० एप्रिलपासून सवलत देण्यात येत आहे. तसेच काही भागात काही अटी लागू करून उद्योगधंद्यांना परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यावसायिक आणि खासगी वाहने रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच, २० एप्रिलपासून सर्वांना प्रवास करताना टोल सुरू करण्यात आला आहे.

टॅग्स :tollplazaटोलनाकाcorona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबईdelhiदिल्ली