शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

शौचालये बांधली; पण पाणी, मलनि:सरणाची व्यवस्था नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 05:13 IST

ग्रामीण भारत आता हगणदारीमुक्त झाला असल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या दाव्याबद्दल सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी शंका व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली : ग्रामीण भारत आता हगणदारीमुक्त झाला असल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या दाव्याबद्दल सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी शंका व्यक्त केली आहे. पूर्वीच्याच माहितीवर विसंबून हगणदारीमुक्ती योजना यशस्वी झाल्याचा निष्कर्ष सरकारने काढला असून, लोक उघड्यावर शौचाला जाण्याच्या आपल्या जुन्या सवयीकडे पुन्हा वळण्याची शक्यता आहे, असे या तज्ज्ञांचे मत आहे.यासंदर्भात डॉ. सुमेध यांनी सांगितले की, २०१२ साली केलेल्या सर्वेक्षणातील माहितीचा आधार घेऊन हगणदारीमुक्ती योजनेचे यश मोजले गेले आहे. केंद्रीय ग्रामीण विकास खाते, ग्रामपंचायती यांनी हे सर्वेक्षण सात वर्षांपूर्वी केले होते. देशामध्ये बांधलेल्या शौचालयांना वीज, पाणीपुरवठा करण्यात आला आहे की नाही या गोष्टीचा अंतर्भाव या सर्वेक्षणात नव्हता. वीज, पाणी नसलेल्या शौचालयाचा लोक वापर करणे टाळतात.महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त अहमदाबादमध्ये ‘स्वच्छ भारत कार्यक्रमात’ बोलताना मोदी यांनी हगणदारीमुक्तीबाबत दावा केला होता.पश्चिम बंगालमधल्या शहरी भागातील ५२ स्थानिक स्वराज्य संस्थांची हद्द वगळता देश हगणदारीमुक्त झाला आहे, असा दावा याआधी केंद्रीय गृहनिर्माण व नागरी बाबीविषयक खात्याने केला होता.हरयाणामध्ये उडाला बोजवारासेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (सीएसई) या संस्थेच्या संचालक व पर्यावरणतज्ज्ञ सुनीता नारायण यांनी सांगितले की, गेल्या चार वर्षांत सरकारने देशातील ६ लाख गावांमध्ये १० कोटी तर शहरी भागांमध्ये ६३ लाख शौचालये बांधली.इतक्या शौचालयांतील मलनि:सरणाची केंद्र सरकारने व्यवस्था केली आहे का? लोक ही शौचालये कायमच वापरत राहतील याची खात्री कशी काय देता येईल? हरियाणा हगणदारीमुक्त झाल्याचे २०१७ साली जाहीर करण्यात आले.मात्र, तेथील लोक उघड्यावर शौचाला जाण्याच्या आपल्या जुन्या सवयीकडे पुन्हा वळल्याचे अलीकडेच केलेल्या एका पाहणीतून दिसून आले, असेही सुनीता नारायण यांनी सांगितले.

टॅग्स :Indiaभारत