शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

शौचालये बांधली; पण पाणी, मलनि:सरणाची व्यवस्था नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 05:13 IST

ग्रामीण भारत आता हगणदारीमुक्त झाला असल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या दाव्याबद्दल सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी शंका व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली : ग्रामीण भारत आता हगणदारीमुक्त झाला असल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या दाव्याबद्दल सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी शंका व्यक्त केली आहे. पूर्वीच्याच माहितीवर विसंबून हगणदारीमुक्ती योजना यशस्वी झाल्याचा निष्कर्ष सरकारने काढला असून, लोक उघड्यावर शौचाला जाण्याच्या आपल्या जुन्या सवयीकडे पुन्हा वळण्याची शक्यता आहे, असे या तज्ज्ञांचे मत आहे.यासंदर्भात डॉ. सुमेध यांनी सांगितले की, २०१२ साली केलेल्या सर्वेक्षणातील माहितीचा आधार घेऊन हगणदारीमुक्ती योजनेचे यश मोजले गेले आहे. केंद्रीय ग्रामीण विकास खाते, ग्रामपंचायती यांनी हे सर्वेक्षण सात वर्षांपूर्वी केले होते. देशामध्ये बांधलेल्या शौचालयांना वीज, पाणीपुरवठा करण्यात आला आहे की नाही या गोष्टीचा अंतर्भाव या सर्वेक्षणात नव्हता. वीज, पाणी नसलेल्या शौचालयाचा लोक वापर करणे टाळतात.महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त अहमदाबादमध्ये ‘स्वच्छ भारत कार्यक्रमात’ बोलताना मोदी यांनी हगणदारीमुक्तीबाबत दावा केला होता.पश्चिम बंगालमधल्या शहरी भागातील ५२ स्थानिक स्वराज्य संस्थांची हद्द वगळता देश हगणदारीमुक्त झाला आहे, असा दावा याआधी केंद्रीय गृहनिर्माण व नागरी बाबीविषयक खात्याने केला होता.हरयाणामध्ये उडाला बोजवारासेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (सीएसई) या संस्थेच्या संचालक व पर्यावरणतज्ज्ञ सुनीता नारायण यांनी सांगितले की, गेल्या चार वर्षांत सरकारने देशातील ६ लाख गावांमध्ये १० कोटी तर शहरी भागांमध्ये ६३ लाख शौचालये बांधली.इतक्या शौचालयांतील मलनि:सरणाची केंद्र सरकारने व्यवस्था केली आहे का? लोक ही शौचालये कायमच वापरत राहतील याची खात्री कशी काय देता येईल? हरियाणा हगणदारीमुक्त झाल्याचे २०१७ साली जाहीर करण्यात आले.मात्र, तेथील लोक उघड्यावर शौचाला जाण्याच्या आपल्या जुन्या सवयीकडे पुन्हा वळल्याचे अलीकडेच केलेल्या एका पाहणीतून दिसून आले, असेही सुनीता नारायण यांनी सांगितले.

टॅग्स :Indiaभारत