शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या पराभवासाठी एकत्र या, सत्तेत येण्यासाठी एकजूट होण्याची गरज  - शरद यादव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 23:22 IST

केंद्र आणि राज्यांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी दलित व मागास वर्गांनी एकत्र येण्याची गरज आहे. या वर्गांनी धार्मिक वाद आणि जातीय दंगलीपासून दूर रहायला हवे, असा सल्ला जनता दल यूनायटेडचे माजी अध्यक्ष शरद यादव यांनी दिला.

भोपाळ : केंद्र आणि राज्यांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी दलित व मागास वर्गांनी एकत्र येण्याची गरज आहे. या वर्गांनी धार्मिक वाद आणि जातीय दंगलीपासून दूर रहायला हवे, असा सल्ला जनता दल यूनायटेडचे माजी अध्यक्ष शरद यादव यांनी दिला.शरद यादव म्हणाले की, देशातील दलित आणि मागासवर्गाने एकत्र आल्याश एक मजबूत व्होट बँक तयार करता येईल. ‘जात को जमात मे बदलो’ असे सांगत त्यांनी सर्व जाती एका मोठ्या समूहात यायला हव्यात, असे आवाहन केले. ते म्हणाले की, दलित आणि मागासवर्ग यांनी सत्तेत येण्यासाठी एकजूट होण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही मत होते.शरद यादव यांना अलीकडेच राज्यसभेतून अपात्र घोषित करण्यात आले आहे. ते म्हणाले की जातीय दंगल होत असेल तर ती रोखण्यासाठी दलितांनी व मागास वर्गांनी प्रयत्न करावेत. अडचणींच्या काळात अल्पसंख्यांकांना मदत करावी. राज्यघटनेने प्रत्येकाला मतदानाद्वारे लढण्याचे प्रभावी माध्यम दिले आहे.

साहसी व्हा : प्रकाश आंबेडकरप्रकाश आंबेडकर म्हणाले की, आपण संख्येने मजबूत आहोत. आता साहसी व्हावे लागेल. आपली लढाई भाजपशी आहे. कोरेगाव भीमाच्या घटनेचा उल्लेख करुन ते म्हणाले की, या हिंसाचारामागे असलेल्यांना अटक करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. हिंदुत्ववाद्यांना इशारा देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, धर्म व राजकारण एकत्र करु नका. अन्यथा हिंदूंमध्ये हाफिज सईदसारख्या प्रवृत्ती वाढतील. (वृत्तसंस्था)

टॅग्स :BJPभाजपा