शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

भाजपाच्या पराभवासाठी एकत्र या, सत्तेत येण्यासाठी एकजूट होण्याची गरज  - शरद यादव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 23:22 IST

केंद्र आणि राज्यांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी दलित व मागास वर्गांनी एकत्र येण्याची गरज आहे. या वर्गांनी धार्मिक वाद आणि जातीय दंगलीपासून दूर रहायला हवे, असा सल्ला जनता दल यूनायटेडचे माजी अध्यक्ष शरद यादव यांनी दिला.

भोपाळ : केंद्र आणि राज्यांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी दलित व मागास वर्गांनी एकत्र येण्याची गरज आहे. या वर्गांनी धार्मिक वाद आणि जातीय दंगलीपासून दूर रहायला हवे, असा सल्ला जनता दल यूनायटेडचे माजी अध्यक्ष शरद यादव यांनी दिला.शरद यादव म्हणाले की, देशातील दलित आणि मागासवर्गाने एकत्र आल्याश एक मजबूत व्होट बँक तयार करता येईल. ‘जात को जमात मे बदलो’ असे सांगत त्यांनी सर्व जाती एका मोठ्या समूहात यायला हव्यात, असे आवाहन केले. ते म्हणाले की, दलित आणि मागासवर्ग यांनी सत्तेत येण्यासाठी एकजूट होण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही मत होते.शरद यादव यांना अलीकडेच राज्यसभेतून अपात्र घोषित करण्यात आले आहे. ते म्हणाले की जातीय दंगल होत असेल तर ती रोखण्यासाठी दलितांनी व मागास वर्गांनी प्रयत्न करावेत. अडचणींच्या काळात अल्पसंख्यांकांना मदत करावी. राज्यघटनेने प्रत्येकाला मतदानाद्वारे लढण्याचे प्रभावी माध्यम दिले आहे.

साहसी व्हा : प्रकाश आंबेडकरप्रकाश आंबेडकर म्हणाले की, आपण संख्येने मजबूत आहोत. आता साहसी व्हावे लागेल. आपली लढाई भाजपशी आहे. कोरेगाव भीमाच्या घटनेचा उल्लेख करुन ते म्हणाले की, या हिंसाचारामागे असलेल्यांना अटक करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. हिंदुत्ववाद्यांना इशारा देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, धर्म व राजकारण एकत्र करु नका. अन्यथा हिंदूंमध्ये हाफिज सईदसारख्या प्रवृत्ती वाढतील. (वृत्तसंस्था)

टॅग्स :BJPभाजपा