शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

तुफानी हल्लाबोल : शहा-राहुल यांच्यात वाक्युद्ध! एकमेकांच्या बालेकिल्ल्यात शिरून घेतले तोंडसुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:47 IST

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि भाजपाचे अध्यक्ष खा. अमित शहा यांनी मंगळवारी परस्परांच्या बालेकिल्ल्यांत शिरून एकमेकांवर तुफानी हल्लाबोल केला.

नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि भाजपाचे अध्यक्ष खा. अमित शहा यांनी मंगळवारी परस्परांच्या बालेकिल्ल्यांत शिरून एकमेकांवर तुफानी हल्लाबोल केला.काही महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार असलेल्या गुजरातच्या दुस-या दिवशीच्या दौºयात राहुल गांधी यांनी शहा, पंतप्रधाननरेंद्र मोदी व भाजपावर बोचरी टीका केली, तर खा. राहुल गांधी यांच्या अमेठी या मतदारसंघामध्ये अमित शहा यांनी थेट राहुल गांधींवर तोफ डागली.राहुल गांधी व अमित शहा यांनी दिवसभरात एकमेकांविरुद्ध केलेल्या वाक्ताडनाचा ठळक गोषवारा असा:राहुल गांधी : सन २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सांगायचे की, मला पंतप्रधान नव्हे, तर देशाचा चौकीदार व्हायचे आहे. चौकीदार के सामने चोरी हुई.. तो वो चौकीदार थे या भागिदार?अमित शहा : भाजपाने काय दिले, असे वारंवार विचारता. आम्ही देशाला ‘बोलणारा’ पंतप्रधान दिला आहे. (त्यांचा रोख आधीचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे होता.)विकासाचे गुजरात मॉडेलराहुल गांधी : गुजरातचे कर्ज दोन लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. विकासाच्या नावाखाली एवढे कर्ज काढूनही शेतकरी व गरिबांची स्थिती हालाखीचीच आहे. विकासाचे हे मॉडेल अपयशी ठरले आहे.अमित शहा : ते गुजरातच्या विकासावरून टिंगल करत आहेत. पण तुमच्या तीन पिढ्यांनी अमेठीसाठी काय केले, असे मला काँग्रेसच्या ‘शहजाद्यां’ना विचारायचे आहे. तुम्ही आमच्याकडे तीन वर्षांचा हिशेब मागत आहात, पण अमेठीचे लोक तुमच्या तीन पिढ्यांचा हिशेब मागत आहेत. राहुलबाबांनी इटालियन चश्मा लावल्याने त्यांना विकास दिसत नाही!भ्रष्टाचाराविषयीराहुल गांधी : एक कंपनी (जय शहा यांची?) सहा-सात वर्षांपूर्वी स्थापन झाली. सन २०१४मध्ये ती अगदीच मामुली होती. पण त्यानंतर काही महिन्यांतच ती कंपनी एवढी मोठी झाली की तिची उलाढाल ५० हजार रुपयांवरून चक्क ८० कोटी रुपयांवर पोहोचली. त्या कंपनीस कर्ज कोणी दिले? केंद्र सरकारच्या पीयूष गोयल यांच्या खात्याने.अमित शहा : काँग्रेसने देशावर ७० वर्षे राज्य केले. मला तुम्हाला असे विचारायचे आहे की, तुम्ही येथील (अमेठीमध्ये) बराच काळ खासदार असूनही इथे जिल्हाधिकारी कार्यालय, टीबी हॉस्पिटल व आकाशवाणीचे एफएम केंद्र का नाही? गोमती नदीमुळे इथे होणारी जमिनीची धूप अजूनही का थांबलेली नाही?सुशासन आणि सरकारी कारभारराहुल गांधी : भाजपाला २२ वर्षांत जमणार नाही तेवढे काम काँग्रेस फक्त सहा महिन्यांत करून दाखवील!अमित शहा : (अमेठीवासीयांना उद्देशून) तुम्ही एकाच कुटुंबावर ६० वर्षे विश्वास ठेवलात. आता भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर विश्वास ठेवा म्हणजे पश्चात्ताप करण्याची पाळी येणार नाही!

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAmit Shahअमित शाह