शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

आजपासून शहरात हेल्मेट सक्ती

By admin | Updated: February 1, 2016 00:03 IST

कारवाईचा बडगा : प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रमुखासह २० जणांचे पथक

कारवाईचा बडगा : प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रमुखासह २० जणांचे पथक
औरंगाबाद : शहरात हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी सोमवारपासून करण्यात येणार आहे. हेल्मेट न वापरणार्‍या वाहनांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी तसेच १५ पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांसह सुमारे सहाशे पोलीस रस्त्यावर उतरणार आहेत. हे पोलीस दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करणार आहेत. हेल्मेट सक्तीचा दुचाकीचालकांनी धसका घेतला असून, मागील दोन-तीन दिवसांपासून शहरातील विविध दुकानांवर हेल्मेट खरेदीसाठी अक्षरश: रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
शहरात वेगवेगळ्या भागात होणार्‍या अपघातात दरवर्षी १७० हून अधिक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागतो. दुचाकीस्वाराने हेल्मेट वापरले तर किमान जीव वाचण्याची शक्यता जास्त असते. औरंगाबादकरांना नियमित हेल्मेट वापरण्याची अजिबात सवय नाही. त्यामुळे पोलिसांना दरवेळी सक्तीची मोहीम राबवावी लागते. सर्वसामान्य नागरिकांचे जीव वाचावे एवढीच प्रामाणिक इच्छा पोलिसांची आजपर्यंत राहिलेली आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार शहरात मागील दोन महिन्यांपासून हेल्मेटचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याबद्दल जनजागृती करीत आहेत. या जनजागरणामुळे शहरातील अनेक महाविद्यालयांनी तसेच औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांनी कामगारांना हेल्मेट वापरणे बंधनकारक केले. त्यामुळे शहरात हेल्मेट वापरणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. हेल्मेट न वापरणार्‍या दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे १ फे ब्रुवारीपासून शहरात हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला.
चौका, चौकांत कारवाई
हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी मोठी तयारी केली आहे. शहरातील प्रत्येक चौकात, तसेच वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा रस्त्याच्या ठिकाणी विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई केली जाणार आहे. या कारवाईसाठी वाहतूक शाखेतील सुमारे २२५ पोलीस रस्त्यावर असतील. शहरातील पंधरा पोलीस ठाणेप्रमुखांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली आहेत. प्रत्येक ठाण्याचे वीस कर्मचारी हेल्मेटसक्तीच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त करण्यात आले असल्याचे पोलीस उपायुक्त संदीप आटोले यांनी सांगितले.

अपूर्ण....