शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

राजीव गांधींच्या अकाली मृत्यूचे टीएन शेषन यांना आधीच मिळाले होते संकेत; 'तो' सल्ला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 15:09 IST

इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८५ मध्ये एसपीजी सुरक्षा बनवली गेली जेणेकरून पंतप्रधानांना चोख सुरक्षा देता येईल. १९८८-८९ मध्ये स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप कायद्याला संसदेत मंजुरी मिळाली

नवी दिल्ली - राजीव गांधी यांच्या हत्येला काँग्रेस सरकार त्यांच्या सुरक्षेतील हलगर्जीला जबाबदार मानते. १९८९ मध्ये जेव्हा विश्वनाथ प्रताप सिंह यांचे सरकार बनले तेव्हा राजीव गांधी यांना मिळालेली स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची सुरक्षा हटवली होती. परंतु जर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी टीएन शेषन यांचा एक सल्ला ऐकला असता तर ८९ मध्ये त्यांची सुरक्षा हटवली गेली नसती. 

भारतातील निवडणूक आयोगाचे सुधारक मानले जाणारे टीएन शेषन यांनी राजीव गांधी यांना माजी पंतप्रधानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना एसपीजी सुरक्षा देण्याचा सल्ला दिला होता. परंतु राजीव गांधी यांनी तो सल्ला न ऐकता तो प्रस्ताव फेटाळला. भविष्यातील सुरक्षेसाठी हे स्वार्थी पाऊल असेल असे राजीव गांधींना वाटले. त्यावेळी शेषन हे पर्यावरण मंत्रालयाचे सचिव आणि पंतप्रधानांचे सुरक्षा इन्चार्ज होते. टीएन शेषन यांचा हा खुलासा त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झालेले नवीन पुस्तक थ्रू द ब्रोकन ग्लासमध्ये झाला आहे. ज्योतिषावर विश्वास असणाऱ्या टीएन शेषन यांना राजीव गांधींसोबत अघटित घडणार असल्याचे संकेत मिळाले होते. 

इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८५ मध्ये एसपीजी सुरक्षा बनवली गेली जेणेकरून पंतप्रधानांना चोख सुरक्षा देता येईल. १९८८-८९ मध्ये स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप कायद्याला संसदेत मंजुरी मिळाली. जेव्हा कायदा तयार होत होता तेव्हा टीएन शेषन यांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना सल्ला दिला होता की, एसपीजी सुरक्षेच्या अंतर्गत माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबियांचाही समावेश करावा. माजी निवडणूक मुख्य आयुक्त टीएन शेषन यांच्या मरणोत्तर प्रकाशित झालेल्या आत्मचरित्रात हा खुलासा झाला आहे. शेषन यांचे १० नोव्हेंबर २०१९ रोजी निधन झाले. 

इंग्लिश न्यूज वेबसाईटनुसार, एका रिपोर्टमध्ये या पुस्तकातील या भागाचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यात शेषन यांनी राजीव गांधी यांना त्यांचा सल्ला दिल्याचे सांगितले होते. शेषन यांनी राजीव गांधींना सतर्क केले होते. पंतप्रधानपदावरून दूर झाल्यानंतर राजीव गांधींच्या सुरक्षेला धोका होऊ शकतो. यासाठी अमेरिकेचे उदाहरण देत एफबीआय माजी राष्ट्रपती आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षा दिली जाते असं सांगितले. परंतु राजीव गांधी यांनी या प्रस्तावावर सहमती दर्शवली नाही. मी त्यांना समजवण्याचा बराच प्रयत्न केला परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही. 

पुस्तकात शेषन यांनी ज्योतिषशास्त्रातील त्यांची आवडही नमूद केली आहे. राजीव गांधींच्या अकाली मृत्यूची पूर्वकल्पनाही त्यांनी दिली होती. त्यामुळेच शेषन यांनी राजीव गांधींना मे १९९१ च्या निवडणूक प्रचारादरम्यान आपल्या सुरक्षेची काळजी घेण्याचा सल्लाही दिला होता. १० मे १९९१ रोजी टीएन शेषन यांनी राजीव गांधी यांची वैयक्तिक भेट घेतली आणि त्यांना मोहिमेदरम्यान सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला. पण माजी पंतप्रधानांनी चिंता फेटाळून लावली. १७ मे रोजी शेषन यांनी राजीव यांना एक फॅक्स पाठवून त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यास सांगितले, परंतु त्यांचा संदेश वाचण्याआधीच २१ मे रोजी श्रीपेरुंबदुर येथे आत्मघातकी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधी