शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

राजीव गांधींच्या अकाली मृत्यूचे टीएन शेषन यांना आधीच मिळाले होते संकेत; 'तो' सल्ला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 15:09 IST

इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८५ मध्ये एसपीजी सुरक्षा बनवली गेली जेणेकरून पंतप्रधानांना चोख सुरक्षा देता येईल. १९८८-८९ मध्ये स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप कायद्याला संसदेत मंजुरी मिळाली

नवी दिल्ली - राजीव गांधी यांच्या हत्येला काँग्रेस सरकार त्यांच्या सुरक्षेतील हलगर्जीला जबाबदार मानते. १९८९ मध्ये जेव्हा विश्वनाथ प्रताप सिंह यांचे सरकार बनले तेव्हा राजीव गांधी यांना मिळालेली स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची सुरक्षा हटवली होती. परंतु जर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी टीएन शेषन यांचा एक सल्ला ऐकला असता तर ८९ मध्ये त्यांची सुरक्षा हटवली गेली नसती. 

भारतातील निवडणूक आयोगाचे सुधारक मानले जाणारे टीएन शेषन यांनी राजीव गांधी यांना माजी पंतप्रधानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना एसपीजी सुरक्षा देण्याचा सल्ला दिला होता. परंतु राजीव गांधी यांनी तो सल्ला न ऐकता तो प्रस्ताव फेटाळला. भविष्यातील सुरक्षेसाठी हे स्वार्थी पाऊल असेल असे राजीव गांधींना वाटले. त्यावेळी शेषन हे पर्यावरण मंत्रालयाचे सचिव आणि पंतप्रधानांचे सुरक्षा इन्चार्ज होते. टीएन शेषन यांचा हा खुलासा त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झालेले नवीन पुस्तक थ्रू द ब्रोकन ग्लासमध्ये झाला आहे. ज्योतिषावर विश्वास असणाऱ्या टीएन शेषन यांना राजीव गांधींसोबत अघटित घडणार असल्याचे संकेत मिळाले होते. 

इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८५ मध्ये एसपीजी सुरक्षा बनवली गेली जेणेकरून पंतप्रधानांना चोख सुरक्षा देता येईल. १९८८-८९ मध्ये स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप कायद्याला संसदेत मंजुरी मिळाली. जेव्हा कायदा तयार होत होता तेव्हा टीएन शेषन यांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना सल्ला दिला होता की, एसपीजी सुरक्षेच्या अंतर्गत माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबियांचाही समावेश करावा. माजी निवडणूक मुख्य आयुक्त टीएन शेषन यांच्या मरणोत्तर प्रकाशित झालेल्या आत्मचरित्रात हा खुलासा झाला आहे. शेषन यांचे १० नोव्हेंबर २०१९ रोजी निधन झाले. 

इंग्लिश न्यूज वेबसाईटनुसार, एका रिपोर्टमध्ये या पुस्तकातील या भागाचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यात शेषन यांनी राजीव गांधी यांना त्यांचा सल्ला दिल्याचे सांगितले होते. शेषन यांनी राजीव गांधींना सतर्क केले होते. पंतप्रधानपदावरून दूर झाल्यानंतर राजीव गांधींच्या सुरक्षेला धोका होऊ शकतो. यासाठी अमेरिकेचे उदाहरण देत एफबीआय माजी राष्ट्रपती आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षा दिली जाते असं सांगितले. परंतु राजीव गांधी यांनी या प्रस्तावावर सहमती दर्शवली नाही. मी त्यांना समजवण्याचा बराच प्रयत्न केला परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही. 

पुस्तकात शेषन यांनी ज्योतिषशास्त्रातील त्यांची आवडही नमूद केली आहे. राजीव गांधींच्या अकाली मृत्यूची पूर्वकल्पनाही त्यांनी दिली होती. त्यामुळेच शेषन यांनी राजीव गांधींना मे १९९१ च्या निवडणूक प्रचारादरम्यान आपल्या सुरक्षेची काळजी घेण्याचा सल्लाही दिला होता. १० मे १९९१ रोजी टीएन शेषन यांनी राजीव गांधी यांची वैयक्तिक भेट घेतली आणि त्यांना मोहिमेदरम्यान सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला. पण माजी पंतप्रधानांनी चिंता फेटाळून लावली. १७ मे रोजी शेषन यांनी राजीव यांना एक फॅक्स पाठवून त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यास सांगितले, परंतु त्यांचा संदेश वाचण्याआधीच २१ मे रोजी श्रीपेरुंबदुर येथे आत्मघातकी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधी