शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

"अहंकार सोडा आणि ममतांना इंडिया आघाडीचे प्रमुख करा"; काँग्रेसच्या पराभवावर TMC नेत्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 16:31 IST

महाराष्ट्रात काँग्रेसच्या पराभवामुळे इंडिया आघाडीचे नेतृत्व बदलण्याची मागणी केली जात आहे.

INDIA Alliance : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा लाजिरवाणा असा पराभव झाला आहे. महाराष्ट्रात १०१ जागांवर निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसला केवळ १६ जागा मिळवता आल्या आहेत. तर गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १४७ जागांवर लढून ४४ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे आता काँग्रेस नेत्यांवर जोरदार टीका करण्यात येत आहे. अशातच आता तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनीही काँग्रेसला लक्ष्य करत इंडिया आघाडीबद्दत महत्त्वाचे विधान केलं आहे.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसने त्यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले आहेत. बंगालमधील सर्व 6 विधानसभा पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसने बाजी मारल्याने त्यांच्या नेत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. अशातच महाराष्ट्रात काँग्रेसच्या पराभवामुळे इंडिया आघाडीचे नेतृत्व बदलण्याची मागणी केली जात आहे. काँग्रेसने आपला अहंकार बाजूला ठेवावा आणि ममता बॅनर्जी यांना इंडिया आघाडीच्या नेत्या म्हणून घोषित करावे, असे तृणमूलचे ज्येष्ठ नेते आणि खासदार कल्याण बॅनर्जी यांनी म्हटले आहे. इंडिया आघाडीला कणखर आणि निर्णायक नेतृत्वाची गरज असल्याचे बॅनर्जी म्हणाले.

ममता बॅनर्जी यांच्याकडे मजबूत नेतृत्व आहे. तसेच, त्यांच्या तळागाळातील संपर्कामुळे त्या इंडिया आघाडीसाठी सर्वात प्रभावी व्यक्ती बनल्या आहेत, असा दावा कल्याण बॅनर्जी यांनी केला. "काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अपयश स्वीकारावे लागेल. आता वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा एकतेला प्राधान्य देण्याची गरज आहे. त्यांनी आपला अहंकार सोडून ममता बॅनर्जींना इंडिया आघाडीच्या गटनेत्या म्हणून स्वीकारावे," असं कल्याण बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

"ममतांची देशात सेनानी म्हणून ओळख आहे. त्यांचे नेतृत्व आणि जनतेशी संपर्क साधण्याची क्षमता त्यांना एक आदर्श चेहरा बनवते. त्यामुळे एकजूट आणि व्यावहारिक दृष्टिकोन न ठेवता विरोधकांचे प्रयत्न फोल ठरतील," असेही बॅनर्जी म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024congressकाँग्रेसtmcठाणे महापालिकाMamata Banerjeeममता बॅनर्जीRahul Gandhiराहुल गांधी