शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
2
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
3
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
4
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
5
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
6
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
7
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
8
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
9
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
10
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
11
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
12
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
13
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
14
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
15
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
16
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

"अहंकार सोडा आणि ममतांना इंडिया आघाडीचे प्रमुख करा"; काँग्रेसच्या पराभवावर TMC नेत्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 16:31 IST

महाराष्ट्रात काँग्रेसच्या पराभवामुळे इंडिया आघाडीचे नेतृत्व बदलण्याची मागणी केली जात आहे.

INDIA Alliance : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा लाजिरवाणा असा पराभव झाला आहे. महाराष्ट्रात १०१ जागांवर निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसला केवळ १६ जागा मिळवता आल्या आहेत. तर गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १४७ जागांवर लढून ४४ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे आता काँग्रेस नेत्यांवर जोरदार टीका करण्यात येत आहे. अशातच आता तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनीही काँग्रेसला लक्ष्य करत इंडिया आघाडीबद्दत महत्त्वाचे विधान केलं आहे.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसने त्यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले आहेत. बंगालमधील सर्व 6 विधानसभा पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसने बाजी मारल्याने त्यांच्या नेत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. अशातच महाराष्ट्रात काँग्रेसच्या पराभवामुळे इंडिया आघाडीचे नेतृत्व बदलण्याची मागणी केली जात आहे. काँग्रेसने आपला अहंकार बाजूला ठेवावा आणि ममता बॅनर्जी यांना इंडिया आघाडीच्या नेत्या म्हणून घोषित करावे, असे तृणमूलचे ज्येष्ठ नेते आणि खासदार कल्याण बॅनर्जी यांनी म्हटले आहे. इंडिया आघाडीला कणखर आणि निर्णायक नेतृत्वाची गरज असल्याचे बॅनर्जी म्हणाले.

ममता बॅनर्जी यांच्याकडे मजबूत नेतृत्व आहे. तसेच, त्यांच्या तळागाळातील संपर्कामुळे त्या इंडिया आघाडीसाठी सर्वात प्रभावी व्यक्ती बनल्या आहेत, असा दावा कल्याण बॅनर्जी यांनी केला. "काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अपयश स्वीकारावे लागेल. आता वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा एकतेला प्राधान्य देण्याची गरज आहे. त्यांनी आपला अहंकार सोडून ममता बॅनर्जींना इंडिया आघाडीच्या गटनेत्या म्हणून स्वीकारावे," असं कल्याण बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

"ममतांची देशात सेनानी म्हणून ओळख आहे. त्यांचे नेतृत्व आणि जनतेशी संपर्क साधण्याची क्षमता त्यांना एक आदर्श चेहरा बनवते. त्यामुळे एकजूट आणि व्यावहारिक दृष्टिकोन न ठेवता विरोधकांचे प्रयत्न फोल ठरतील," असेही बॅनर्जी म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024congressकाँग्रेसtmcठाणे महापालिकाMamata Banerjeeममता बॅनर्जीRahul Gandhiराहुल गांधी