शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

"अहंकार सोडा आणि ममतांना इंडिया आघाडीचे प्रमुख करा"; काँग्रेसच्या पराभवावर TMC नेत्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 16:31 IST

महाराष्ट्रात काँग्रेसच्या पराभवामुळे इंडिया आघाडीचे नेतृत्व बदलण्याची मागणी केली जात आहे.

INDIA Alliance : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा लाजिरवाणा असा पराभव झाला आहे. महाराष्ट्रात १०१ जागांवर निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसला केवळ १६ जागा मिळवता आल्या आहेत. तर गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १४७ जागांवर लढून ४४ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे आता काँग्रेस नेत्यांवर जोरदार टीका करण्यात येत आहे. अशातच आता तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनीही काँग्रेसला लक्ष्य करत इंडिया आघाडीबद्दत महत्त्वाचे विधान केलं आहे.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसने त्यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले आहेत. बंगालमधील सर्व 6 विधानसभा पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसने बाजी मारल्याने त्यांच्या नेत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. अशातच महाराष्ट्रात काँग्रेसच्या पराभवामुळे इंडिया आघाडीचे नेतृत्व बदलण्याची मागणी केली जात आहे. काँग्रेसने आपला अहंकार बाजूला ठेवावा आणि ममता बॅनर्जी यांना इंडिया आघाडीच्या नेत्या म्हणून घोषित करावे, असे तृणमूलचे ज्येष्ठ नेते आणि खासदार कल्याण बॅनर्जी यांनी म्हटले आहे. इंडिया आघाडीला कणखर आणि निर्णायक नेतृत्वाची गरज असल्याचे बॅनर्जी म्हणाले.

ममता बॅनर्जी यांच्याकडे मजबूत नेतृत्व आहे. तसेच, त्यांच्या तळागाळातील संपर्कामुळे त्या इंडिया आघाडीसाठी सर्वात प्रभावी व्यक्ती बनल्या आहेत, असा दावा कल्याण बॅनर्जी यांनी केला. "काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अपयश स्वीकारावे लागेल. आता वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा एकतेला प्राधान्य देण्याची गरज आहे. त्यांनी आपला अहंकार सोडून ममता बॅनर्जींना इंडिया आघाडीच्या गटनेत्या म्हणून स्वीकारावे," असं कल्याण बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

"ममतांची देशात सेनानी म्हणून ओळख आहे. त्यांचे नेतृत्व आणि जनतेशी संपर्क साधण्याची क्षमता त्यांना एक आदर्श चेहरा बनवते. त्यामुळे एकजूट आणि व्यावहारिक दृष्टिकोन न ठेवता विरोधकांचे प्रयत्न फोल ठरतील," असेही बॅनर्जी म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024congressकाँग्रेसtmcठाणे महापालिकाMamata Banerjeeममता बॅनर्जीRahul Gandhiराहुल गांधी