शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
3
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
4
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
5
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
6
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
7
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
8
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
9
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
10
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
11
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
12
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
13
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
14
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
15
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
16
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
17
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
18
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
19
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
20
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!

"अहंकार सोडा आणि ममतांना इंडिया आघाडीचे प्रमुख करा"; काँग्रेसच्या पराभवावर TMC नेत्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 16:31 IST

महाराष्ट्रात काँग्रेसच्या पराभवामुळे इंडिया आघाडीचे नेतृत्व बदलण्याची मागणी केली जात आहे.

INDIA Alliance : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा लाजिरवाणा असा पराभव झाला आहे. महाराष्ट्रात १०१ जागांवर निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसला केवळ १६ जागा मिळवता आल्या आहेत. तर गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १४७ जागांवर लढून ४४ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे आता काँग्रेस नेत्यांवर जोरदार टीका करण्यात येत आहे. अशातच आता तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनीही काँग्रेसला लक्ष्य करत इंडिया आघाडीबद्दत महत्त्वाचे विधान केलं आहे.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसने त्यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले आहेत. बंगालमधील सर्व 6 विधानसभा पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसने बाजी मारल्याने त्यांच्या नेत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. अशातच महाराष्ट्रात काँग्रेसच्या पराभवामुळे इंडिया आघाडीचे नेतृत्व बदलण्याची मागणी केली जात आहे. काँग्रेसने आपला अहंकार बाजूला ठेवावा आणि ममता बॅनर्जी यांना इंडिया आघाडीच्या नेत्या म्हणून घोषित करावे, असे तृणमूलचे ज्येष्ठ नेते आणि खासदार कल्याण बॅनर्जी यांनी म्हटले आहे. इंडिया आघाडीला कणखर आणि निर्णायक नेतृत्वाची गरज असल्याचे बॅनर्जी म्हणाले.

ममता बॅनर्जी यांच्याकडे मजबूत नेतृत्व आहे. तसेच, त्यांच्या तळागाळातील संपर्कामुळे त्या इंडिया आघाडीसाठी सर्वात प्रभावी व्यक्ती बनल्या आहेत, असा दावा कल्याण बॅनर्जी यांनी केला. "काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अपयश स्वीकारावे लागेल. आता वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा एकतेला प्राधान्य देण्याची गरज आहे. त्यांनी आपला अहंकार सोडून ममता बॅनर्जींना इंडिया आघाडीच्या गटनेत्या म्हणून स्वीकारावे," असं कल्याण बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

"ममतांची देशात सेनानी म्हणून ओळख आहे. त्यांचे नेतृत्व आणि जनतेशी संपर्क साधण्याची क्षमता त्यांना एक आदर्श चेहरा बनवते. त्यामुळे एकजूट आणि व्यावहारिक दृष्टिकोन न ठेवता विरोधकांचे प्रयत्न फोल ठरतील," असेही बॅनर्जी म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024congressकाँग्रेसtmcठाणे महापालिकाMamata Banerjeeममता बॅनर्जीRahul Gandhiराहुल गांधी