शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 16:24 IST

Tirupati laddu controversy : लाडूच्या वादानंतर आता सोमवारी (२३ सप्टेंबर) तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण करण्यात आले.

Tirupati laddu controversy :तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. मागील राज्य सरकारच्या कार्यकाळात तिरुपती बालाजी देवस्थानतर्फे प्रसाद म्हणून देण्यात येणाऱ्या लाडू बनविण्यासाठी निकृष्ट पदार्थ व प्राण्याच्या चरबीचा वापर केला होता, असा अहवाल गुजरातमधील एका प्रयोगशाळेनं दिला. यावरून अनेकांनी संताप व्यक्त केला असून देशातील राजकारण चांगलेच तापलं आहे. 

दरम्यान, लाडूच्या वादानंतर आता सोमवारी (२३ सप्टेंबर) तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण करण्यात आले. या पूजेवेळी मंत्रोच्चाराद्वारे भगवान व्यंकटेश्वर स्वामींची क्षमा मागण्यात आली. तिरुमला तिरुपती देवस्थानम् (टीटीडी) ने या महाशांती होममचे आयोजन केले होते. मंदिराकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ४ तास हा शुद्धीकरण कार्यक्रम चालला. या कार्यक्रमात मंदिराच्या पुजाऱ्यांसह टीटीडीचे अधिकारीही सहभागी झाले होते. यानंतर तिरुपतीच्या प्रसिद्ध 'लाडू प्रसादम्'ला पुन्हा पावित्र्य बहाल करण्यात आल्याचेही टीटीडीने म्हटले आहे. 

याबाबत मंदिराच्या एका पुजाऱ्याने भाष्य केले आहे. ते म्हणाले, हे सांगणे अत्यंत दुर्दैवी आहे की, गेल्या ४-५ दिवसांपासून बालाजीचा प्रसाद तूप वापरून तयार केला जात असल्याच्या अनेक बातम्या जगभरात पसरत आहेत. त्यात प्राण्यांची चरबी असते. तसेच, काही प्रयोगशाळेच्या अहवालावरून तुपात काही प्रमाणात भेसळ असल्याचे सरकारने सिद्ध केले आहे. त्यामुळे मंदिराच्या ठिकाणांचे शुद्धीकरण करण्यासाठी काय करावे यासाठी सरकारने प्रस्ताव आणला, असे मंदिराच्या ज्येष्ठ पुजाऱ्यांपैकी एक कृष्ण शेषचला दीक्षितुलु यांनी सांगितले.

"आता सर्व काही शुद्ध झालंय"आम्ही शांती होम करण्याचा प्रस्ताव घेऊन व्यवस्थापनाकडे गेलो. मंजुरी मिळाल्यावर काल संध्याकाळी ६ नंतर करायचं ठरवलं. सकाळी ६ नंतर आम्ही सर्वजण भगवान व्यंकटेश्वराचे आशीर्वाद आणि परवानगी घेण्यासाठी गर्भगृहात गेलो. आता सर्व काही शुद्ध झाले आहे, मी सर्व भक्तांना विनंती करतो की, आता काळजी करण्याची गरज नाही. भगवान बालाजीचे दर्शन घ्या आणि प्रसाद घरी घेऊन जा, असे कृष्ण शेषचला दीक्षितुलु यांनी सांगितले.

लाडू वादावर मुख्यमंत्र्यांचे वक्तव्यतिरुपती तिरुमला मंदिरात शांती होम, शुद्धीकरण आणि विधी करण्याचा उद्देश देखील प्रायश्चित आणि चूक सुधारण्यासाठी होता. दरम्यान, लाडू वादावर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे वक्तव्यही समोर आले होते. ते म्हणाले, मंदिरात भेसळयुक्त तूप पुरवणाऱ्यांना राज्य सरकार सोडणार नाही. यासोबतच काही दोषी कर्मचाऱ्यांना काळ्या यादीत टाकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखलआंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी रविवारी (२२ सप्टेंबर) मंदिराच्या पावित्र्याचे उल्लंघन केल्याबद्दल मागील वायएसआरसीपी सरकारवर निशाणा साधला. टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी आरोप केला की, मागील जगन मोहन रेड्डी सरकारच्या काळात टीटीडीने तूप खरेदी करण्याच्या प्रक्रियेत बदल केला होता. सीएम नायडू यांनीही या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली आहे.

टॅग्स :tirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाट