शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 21:26 IST

Tirupati Prasadam Controversy : पवन कल्याण यांनी देशात 'सनातन' राष्ट्रीय मंडळाची स्थापना करण्याची मागणी केली.

Tirupati Prasadam Controversy : आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादावरुन राज्यासह देशात मोठा वाद (Tirupati Prasadam Controversy) निर्माण झाला आहे. या प्रसादात जणावरांची चरबी मिसळल्याचा आरोप मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी केला आहे. दरम्यान, आता या घटनेवर आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री  पवन कल्याण (Pawan Kalyan) यांनी शुक्रवारी (20 सप्टेंबर) मोठे विधान केले.

पवन कल्याण म्हणाले की, 'जेव्हा मंदिरांवर हल्ले होत असतात, तेव्हा आवाज उठवणे ही प्रत्येक राजकीय नेत्याची मूलभूत जबाबदारी आहे. नेता कोणत्याही धर्माचा असो, त्याने अशा घटनांबाबत आपली जागृकता दाखवली पाहिजे. देशाच्या अखंडतेसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. याकडे कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष केले जाऊ नये. अनेक दिवसांपासून हा प्रश्न दुर्लक्षित आहे. अशा गोष्टी संपवण्याची वेळ आली आहे. मशीद, चर्च किंवा मंदिर, प्रत्येक प्रार्थनास्थळाचे पावित्र्य आपण राखले पाहिजे. अशा घटना कमी करण्यासाठी आम्ही लवकरच मार्ग शोधू,' असे ते म्हणाले.

एकत्र येण्याचे आवाहनपवन कल्याण यांनी यापूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत देशात 'सनातन' राष्ट्रीय मंडळाची स्थापना करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, सर्व धोरणकर्ते, धार्मिक प्रमुख, न्यायव्यवस्था, सामान्य नागरिक, मीडिया आणि आपापल्या क्षेत्रातील इतर सर्व दिग्गजांच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर अर्थपूर्ण चर्चा व्हायला हवी. माझा विश्वास आहे की, ‘सनातन धर्माचा’ कोणत्याही स्वरूपात होणारा अपमान थांबवण्यासाठी आपण सर्वांनी विलंब न लावता एकत्र आले पाहिजे.

जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रियावायएसआरसीपीचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया देताना सांगितले की, मी स्वतः पंतप्रधानांना पत्र लिहिणार आहे. भारताच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहिणार आहे. चंद्राबाबू नायडू यांनी वस्तुस्थितीचा विपर्यास कसा केला आणि तसे केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई का करू नये, हे त्यांना समजावून सांगणार आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू अशी व्यक्ती आहे की, जी राजकीय फायद्यासाठी देवाचा वापर करू शकते. चंद्राबाबू नायडू यांच्या आंध्र प्रदेशातील 100 दिवसांच्या कारकिर्दीवरून लक्ष हटवण्यासाठी तूप भेसळीचे आरोप करण्यात आल्याचा प्रतिदावा जगन मोहन रेड्डी यांनी केला.

चंद्राबाबू नायडूंचा हल्लाबोलआंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले होते की, गेल्या 5 वर्षांत जगन मोहन सरकार, वायएसआरसीपीच्या नेत्यांनी तिरुमलाच्या पावित्र्याला कलंक लावला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे वकील विनीत जिंदाल यांनी या प्रकरणी जगन मोहन रेड्डी, कंत्राटदार आणि टीटीडी अधिकाऱ्यांविरोधात तक्रार केली आहे. प्रसादामध्ये प्राण्यांची चरबी असलेले तूप मिसळून त्यांनी लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळ केला असल्याचे त्यात म्हटले आहे. केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांनी याप्रकरणी सविस्तर अहवाल मागवला आहे.

 

टॅग्स :tirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटAndhra Pradeshआंध्र प्रदेश