शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

फक्त ३२० रुपये किलो दराने तूप खरेदी करत होतं TTD; कंपनीने उचलला 'या' गोष्टीचा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 13:00 IST

आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात लाडूंमध्ये तुपाच्या भेसळीचा मुद्दा तापत आहे.

Tirupati Ladoos : आंध्र प्रदेशातील  जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर झाल्याचा गंभीर आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केल्यानंतर मोठी खळबळ उडाली. तिरुपती बालाजी मंदिराच्या लाडूंमधील तूप भेसळीचा मुद्दा तापत आहे. लाडू तयार करण्यासाठी वापरलेल्या तुपाची चाचणी केली असता त्यात माशाच्या तेलाचा आणि गोमांस टॅलोचा समावेश असल्याचे आढळून आला. हे तूप खरेदीसाठीचे टेंडर मागील सरकारने मंजूर केले होते. त्यानंतर आता या तुपाबाबत आणखी एक धक्कादायक बाब उघड झाली आहे.

तिरुपतीच्या श्री वेंकटेश्वर मंदिरामध्ये प्रसाद म्हणून वाटप केल्या जाणाऱ्या लाडूच्या नमुन्यामध्ये कमी दर्जाचे तूप आणि प्राण्यांची चरबी आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली. तुपातील भेसळ ओळखण्यासाठी चाचणी सुविधा नाही याचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादाराने फायदा घेतल्याचा आरोप तिरुमला तिरुपती देवस्थानमने केला. तर आमच्या उत्पादनांचे नमुने संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य प्रकारे प्रमाणित केले होते असे उत्तर तुपाचा पुरवठा करणाऱ्या कंपनीने दिले. आता या तुपाच्या किमतीबाबतही महत्त्वाची बाब समोर आली आहे.

लाडू निर्मीतीसाठी तुपाचा पुरवठा करणाऱ्या एआर डेअरीला केवळ ३२० रुपये किलो दराने कंत्राट देण्यात आले होते. त्यासाठी कर्नाटकच्या नंदिनी तूपाची निविदा रद्द करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतर जुलैमध्ये तुपात भेसळ आढळून आली आणि पुन्हा नंदिनी कंपनीला तुपाचा ठेका ४७० रुपये प्रति किलो या दराने देण्यात आला होता. एका अहवालाचा हवाला देत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी म्हटलं की, पूर्वीच्या जगनमोहन रेड्डी सरकारमध्ये बालाजी मंदिरातील प्रसादात तुपाऐवजी फिश ऑईल आणि प्राण्यांची चरबी मिसळली जात होती. तर हे दावे चुकीचे असून नायडू  हे देवाच्या नावावर राजकारण करत असल्याचे जगन मोहन रेड्डी यांनी म्हटलं.

आज तकच्या वृत्तानुसार, तूपाच्या निविदा प्रतीवरुन खरेदी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निविदेतील अटींचा भंग करून तूप चाचणीसाठी पाठवण्यात आले नाही. निविदेतील कलम ८० नुसार, पुरवठा केलेल्या तुपाच्या प्रत्येक खेपासाठी एनएबीएल प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच कलम ८१ नुसार, तुपाचे नमुने तिरुमला तिरुपती देवस्थानम लॅब चाचणीसाठी पाठवणे बंधनकारक आहे. ऑगस्ट २०२३ ते जुलै २०२४ या कालावधीत काळ्या यादीत टाकलेल्या कंपनीच्या आधीच्या नमुन्यांमध्ये ही भेसळ कशी आढळून आली नाही, असा प्रश्न आता  उपस्थित केला जात आहे. 

टीटीडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्यामला राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही नमुन्यांमध्ये भेसळ आढळून आल्यानंतर तात्काळ पुरवठा बंद केला. पुरवठादारांनी चाचणी करण्यासाठी प्रयोगशाळा नसल्याचा फायदा घेत ३२० ते ४११ रुपयांपर्यंत तूप पुरवठा केला. शुद्ध गाईच्या तुपाच्या पुरवठ्यासाठी ही किंमत योग्य नसल्याचेही ते म्हणाले. 

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशChandrababu Naiduचंद्राबाबू नायडू