शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 19:47 IST

Amul Company Clear Reaction On Tirumala Tirupati Laddu Controversy: तिरुमला तिरुपती लाडू प्रसाद तयार करण्यासाठी अमूल तूप वापरले जात असल्याचा चुकीचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला होता. यावर कंपनीने स्पष्टीकरण दिले.

Amul Company Clear Reaction On Tirumala Tirupati Laddu Controversy: तिरुमला तिरुपती व्यंकटेश्वर बालाजी मंदिरात मिळणाऱ्या लाडू प्रसादावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. तिरूमला तिरूपती देवस्थानातील लाडू प्रकरणात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आंध्र प्रदेश सरकारकडे अहवाल मागितला असून, मंदिरातील लाडू प्रसादाची तपासणी करण्यात येणार आहे. यातच सोशल मीडियावर तिरुपतीला अमूल तूप पाठवण्यात येण्याबाबत चुकीची माहिती शेअर करण्यात आली होती. यासंदर्भात आता कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे. 

तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता

काहीजणांनी सोशल मीडियावर या प्रकरणी सांगितले की, अलीकडच्या काळात लाडवांना कापराचा खूप जास्त गंध येत होता. यापूर्वी महिनाभरापेक्षा जास्त लोटूनही काळ लाडू खराब होत नव्हते. मात्र, आता तीन दिवसांमध्येच लाडू खराब होतात, असे अनेकांनी सांगितले. वर्ष १४८० मध्ये लाडवाचा उल्लेख मंदिरातील नोंदीत आढळतो. त्यावेळी या प्रसादाला 'मनोहरम' असे म्हटले जायचे. ३६ लाख लाडू गेल्या वर्षी १० दिवसांच्या वैकुंठद्वार दर्शनादरम्यान विकण्यात आले, अशी माहिती देण्यात आली आहे. 

काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण

अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही

तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) ला अमूल तूप पुरवठा केला जात असल्याचा उल्लेख काही सोशल मीडिया पोस्ट्समध्ये करण्यात आला आहे. अमूल कंपनीने कधीही तिरुमला तिरुपती देवस्थानमला अमूल तूप पुरवठा केलेला नाही. आम्ही हे देखील स्पष्ट करू इच्छितो की, अमूल तूप आमच्या अत्याधुनिक उत्पादन सुविधांमध्ये दुधापासून बनवले जाते, जे ISO प्रमाणित आहेत. अमूल तूप हे उच्च दर्जाच्या शुद्ध दुधाच्या फॅटपासून बनवले जाते. आमच्या डेअरीमध्ये मिळणारे दूध FSSAI द्वारे निर्दिष्ट केल्यानुसार भेसळ शोधण्यासह कडक गुणवत्ता तपासणीतून जाते. अमूल तूप ५० हून अधिक वर्षांहून अधिक काळ भारतातील सर्वात विश्वासार्ह तूप ब्रँड आहे आणि भारतीय घरांचा अविभाज्य भाग आहे. अमूलविरोधातील ही चुकीची माहिती देणारी मोहीम थांबवण्यासाठी ही पोस्ट जारी करण्यात येत आहे, असे अमूल कंपनीने एक्सवर म्हटले आहे. 

तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी

दरम्यान, तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरात लाडू प्रसादाचे महत्त्व अनन्य साधारण मानले गेले आहे. महाप्रसादाचे हे लाडू बनवण्याच्या प्रक्रियेला 'दित्तम' असे म्हटले जाते. गेल्या ३०० वर्षांत केवळ सहा वेळा हा लाडू करण्याची पद्धत बदलण्यात आली आहे. ३ ते ५ लाखांपेक्षा जास्त लाडू दररोज बनविण्यात येतात. ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल लाडू विक्रीतून देवस्थानला मिळतो. हे लाडू तयार करण्यासाठी १० टन बेसन, १० टन साखर, ७०० किलो काजूगर, १५० किलो वेलची, ३००-४०० लीटर तूप, ५०० किलो पाक, ५४० किलो मनुके याचे ठरलेले वजन आणि प्रमाण घेतले जाते.

 

टॅग्स :tirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटAndhra Pradeshआंध्र प्रदेश