शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

बॉलीवूडमधील मंडळींची बदनामी न करण्याचा टाइम्स नाऊ, रिपब्लिक टीव्हीला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2020 07:04 IST

सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमधील इतर मंडळींवरही काही आरोप झाले होते.

नवी दिल्ली : १९९७ साली प्रसारमाध्यमातील लोकांनी केलेल्या पाठलागामुळे अपघात होऊन प्रिन्सेस डायना मरण पावली. तसा प्रकार आपल्या देशात होता कामा नये असे दिल्ली उच्च न्यायालयाने प्रसारमाध्यमांना बजावले आहे. बॉलीवूडमधील मंडळींची बदनामी करणारा कोणताही कार्यक्रम दाखवू नये असा आदेश न्या. राजीव शकधर यांनी टाइम्स नाऊ व रिपब्लिक टीव्ही या दोन वृत्तवाहिन्यांना दिला आहे.

सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमधील इतर मंडळींवरही काही आरोप झाले होते. त्याची उदंड चर्चाही झाली होती. या घटनांच्या वार्तांकनाप्रसंगी काही वृत्तवाहिन्यांनी आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप करत बॉलीवूडमधील दिग्गजांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यामध्ये आमीर खान, शाहरुख खान, सलमान खान, अक्षयकुमार, करण जोहर, आदित्य चोप्रा, फरहान अख्तर आदींचा समावेश आहे. 

समांतर न्यायालय बनू नका

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्या. राजीव शकधर यांनी म्हटले आहे की, प्रसारमाध्यमांनी समांतर न्यायालय बनू नये. प्रसारमाध्यमांचे काम बातमी देण्याचे आहे. मात्र सध्या बातमी कमी व त्यात स्वत:ची मते अधिक अशा पद्धतीने बातम्या दिल्या जात आहेत. एखाद्या गोष्टीबद्दल आधीच निष्कर्ष काढून मग त्या अंगाने बातम्या दिल्या जातात असेही दिल्ली न्यायालयाने वृतवाहिन्यांना फटकारले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय