शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
2
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
3
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
4
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
5
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
6
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
7
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
8
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
9
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
10
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
11
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
12
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
13
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
14
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
15
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
16
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
17
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
18
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
19
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
20
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'

काँग्रेस तृणमूलमध्ये विलीन करायची वेळ आलीय, तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 13:58 IST

भाजपने गुरुवारी पाचपैकी चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त केल्यानंतर तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

भाजपने गुरुवारी पाचपैकी चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त केल्यानंतर तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला आहे. "भाजपला राष्ट्रीय पातळीवर लढा देण्यात काँग्रेसला अपयश आलं आहे. काँग्रेस पक्षाचं तृणमूल काँग्रेस पक्षात विलीन होण्याची वेळ आली आहे", असं विधान तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी केलं आहे. काँग्रेसनं तृणमूलमध्ये विलीन होऊन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वाखाली काम करावं, असा सल्ला तृणमूलच्या नेत्यांनी काँग्रेसला देऊ केला आहे. ममता बॅनर्जीच भाजपाचा पराभव करू शकतात, असंही त्यांनी म्हटलं आहे.  "काँग्रेससारखा जुना पक्ष का नाहीसा होत आहे, हे मला समजत नाही. आम्हीही या पक्षाचा भाग होतो. काँग्रेसने टीएमसीमध्ये विलीन व्हावे. हीच योग्य वेळ आहे. मग राष्ट्रीय स्तरावर महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांच्या तत्त्वांवर आपण (नथुराम) गोडसेच्या तत्त्वांना मात देऊ शकतो", असं तृणमूल काँग्रेसचे नेते आणि राज्याचे परिवहन व नगर विकास मंत्री फिरहाद हकीम म्हणाले. 

तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनीही हकीम यांच्याच प्रतिक्रियेची री ओढली. "काँग्रेस भाजपसारख्या शक्तीशी लढू शकत नाही, असे आम्ही खूप दिवसांपासून म्हणत आलो आहोत. भाजपविरोधात लढण्यासाठी ममता बॅनर्जींसारख्या नेत्याची गरज आहे. काँग्रेसने हे समजून घेतले पाहिजे", असं कुणाल घोष म्हणाले. 

यापूर्वी, टीएमसीचे मुखपत्र असलेल्या 'जागो बांगला' मधूनही अनेकदा काँग्रेसवर आरोप करण्यात आले आहेत. "भाजपच्या विरोधात विरोधी शक्तींची एक शक्तिशाली युती बनवण्याऐवजी काँग्रेसनं स्वतःला केवळ ट्विटरवर मर्यादित ठेवलं आहे", अशी टीका या वृत्तपत्रातून काँग्रेसवर करण्यात आली होती.  आपल्याला भाजपचा पर्याय हवा आहे, भाजपविरोधात आघाडी हवी आहे. असे आम्ही अनेकवेळा म्हटले आहे, अगदी काँग्रेसलाही याची कल्पना दिली आहे. पण त्याचं काहीच झालं नाही. आमच्या नेत्याने (ममता बॅनर्जी) युतीसाठी एक फ्रेमवर्क, एक सुकाणू समिती, धोरण आणि कृती मार्गाची मागणी केली आहे. मात्र, काहीही केलं गेलं नाही. काँग्रेस स्वतःला फक्त ट्विटरवर मर्यादित ठेवण्यात आनंदी आहे, असा घणाघाती हल्ला 'जागो बांगला' मधून करण्या आला होता. 

तृणमूल काँग्रेस गोव्यात चांगलं प्रदर्शन करण्यात अपयशी ठरली आणि त्यांना एकही जागा मिळाली नाही. त्यांचा निवडणूक सहयोगी महाराष्ट्र गोमंतक पक्ष (एमजीपी) ने दोन जागा जिंकल्या असून ते भाजपला पाठिंबा देणार असल्याचे सांगितलं जात आहे. यामुळे तृणमूलचे नेतेही चांगलेच संतापले आहेत. "आम्ही गोव्यात पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि आम्हाला मिळालेल्या मताधिक्याने आम्ही समाधानी आहोत. परंतु, एमजीपीने काय निर्णय घेतला यावर आम्ही भाष्य करू शकत नाही. त्या निर्णयाबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही", असं कुणाल घोष म्हणाले. 

दरम्यान, बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी टीएमसीच्या प्रस्तावावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. "टीएमसी भाजपचा सर्वात मोठा एजंट आहे. जर ते भाजपविरोधात लढण्यास गंभीर असतील तर त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावे", असा प्रतिसल्ला अधीर रंजन चौधरी यांनी देऊ केला आहे. 

गोवा विधानसभा निवडणुकीत टीएमसीच्या कामगिरीची मात्र भाजप नेतृत्वाने खिल्ली उडवली. "पुढील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हे आमचे पंतप्रधानपदाचा चेहरा असतील. गुरुवारच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरून हे स्पष्ट झाले आहे की पश्चिम बंगालच्या बाहेर टीएमसी नाही. दुसरीकडे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पक्ष आता पंजाबमध्येही सरकार स्थापन करेल. परिणामी, आता विरोधकांचा चेहरा कोण, ममता की केजरीवाल हे त्यांनीच ठरवावे", असं भाजपा प्रदेशाध्यक्षा सुकांता मजुमदार म्हणाल्या.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसElectionनिवडणूक