शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
3
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
4
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
5
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
6
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
7
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
8
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
9
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
10
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
11
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
12
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
13
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
14
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
15
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
16
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
18
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
19
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
20
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!

कौतुकास्पद! 39 वर्षांपासून गावात एकही गुन्हा नाही; लोकांनी कोर्ट-पोलीस स्टेशन पाहिलंच नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 10:52 IST

गावातील लोकांना गेली 39 वर्षे म्हणजे 1983 पासून पोलीस स्टेशनची गरजच भासली नाही. 

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर येत असतात. पण असं असताना एक कौतुकास्पद घटना आता घडली आहे. मध्य प्रदेशातील निवारी जिल्ह्यात एक असं गाव आहे जिथे गेल्या 39 वर्षांपासून पोलीस ठाण्यात एकही गुन्हा दाखल झालेला नाही. गावातील लोक पंचायत भरवून परस्पर संमतीने प्रकरणे सोडवतात. त्यामुळे लोकांना पोलीस ठाण्यात जाण्याची गरजच पडत नाही. ओरछा या धार्मिक आणि पर्यटन शहराजवळ वसलेले हाथीवर खिरक हे असं गाव आहे की, जिथे गावातील लोकांना गेली 39 वर्षे म्हणजे 1983 पासून पोलीस स्टेशनची गरजच भासली नाही. 

पोलीस ठाण्यात 39 वर्षांत आतापर्यंत एकही गुन्हा दाखल झालेला नाही. गावातील लोकही पोलीस ठाणे आणि न्यायालयापासून लांब राहतात. जेव्हा पृथ्वीपूरचे एसडीओपी संतोष पटेल या गावात पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की गावातील लोक पोलिसांना ओळखत नाहीत. प्यारी बाई पाल या 100 वर्षांच्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तिने गावात कधीही वाद पाहिलेला नाही. पोलीस गावात आले आहेत. पोलीस कसे असतात हे तिला माहीत नाही. गावात कोणताही वाद नसल्याचे गावातील अनेक ज्येष्ठ व तरुण सांगतात. किरकोळ वाद असतील तर ते गावातील ज्येष्ठ मंडळी पंचायत स्तरावर परस्पर संमतीने सोडवतात.

पृथ्वीपूरचे एसडीओपी संतोष पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा मला कळले की या गावात 39 वर्षांपासून पोलीस ठाण्यात एकही गुन्हा दाखल झालेला नाही, तेव्हा हे गाव पहिलं. तिथल्या लोकांशी बोलून व्हिलेज क्राइम नोटबुक तपासले असता 1983 पासून इथे एकही गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती मिळाली. शांतताप्रिय असलेल्या या गावात एक व्यक्ती असामाजिक स्वभावाचा होता पण तो आता गावात राहत नाही. हाथीवर खिरक गावात 225 लोक राहतात. कमी लोकवस्ती असलेल्या या गावात शांतता आणि आनंददायी वातावरण आहे.

गावात पाल आणि अहिरवार बा ब्राह्मण समाजाचे लोक राहतात. सर्व समाजातील लोक परस्पर बंधुभावाने मिळून मिसळून राहतात. सुख-दुःखात नेहमी एकमेकांना साथ देतात. दुरावा, वाद यांसारखी परिस्थिती निर्माण झाली तरी जेष्ठ मंडळी समजूत घालून शांत करतात. हाथीवर खिरक गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेतीसोबतच शेळी, गाय यांसारखे प्राणी पाळणे हा आहे. शेळीपालनामुळे त्यांना रोजगार मिळतो, त्यातून त्यांना आर्थिक उत्पन्नही मिळते. गायींच्या संगोपनामुळे गावातील लोकांना दुधाची कमतरता भासत नाही. गावातील लोकही तूप, दुधाचा व्यवसाय करतात. शेती करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. एका हिंदी  वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस