शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

तिबेटला स्वातंत्र्य नको, विकास हवा, दलाई लामांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 04:16 IST

कोलकाता : तिबेटला चीनपासून स्वातंत्र्य नव्हे तर अधिक विकास हवा आहे, असे प्रतिपादन गेली ५० वर्षे भारतात विजनवासात राहणारे तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांनी गुरुवारी येथे केले.

कोलकाता : तिबेटला चीनपासून स्वातंत्र्य नव्हे तर अधिक विकास हवा आहे, असे प्रतिपादन गेली ५० वर्षे भारतात विजनवासात राहणारे तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांनी गुरुवारी येथे केले. इंडियन चेंबर आॅफ कॉमर्सच्या कार्यक्रमात श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना दलाई लामा म्हणाले की, अधूनमधून भांडणे झाली असली तरी तिबेट व चीन यांचे घनिष्ट संबंध आहेत. त्यामुळे भूतकाळात काय घडले ते बाजूला ठेवून भविष्याचा विचार करायला हवा.आम्हाला स्वातंत्र्य नको, पण चीनने तिबेटचा आदर करायला हवा, यावर भर देत दलाई लामा म्हणाले की, तिबेटची वेगळी संस्कृती आहे, वेगळी भाषा आहे. त्याचा चीनने आदर ठेवायला हवा. चिनी लोकांचे जसे त्यांच्या देशावर प्रेम आहे तसे आमचे आमच्या देशावर प्रेम आहे.तिबेटचे पठार हे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचे व अद्वितीय आहे. त्यामुळे त्याचे जतन करणे अगत्याचे आहे, असे मतही दलाई लामा यांनी व्यक्त केले.>‘हिंदी, चिनी भाई भाई’राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अरुणाचल प्रदेश भेटीला चीनने आक्षेप घेतल्याबद्दल पत्रकारांनी विचारता दलाई लामा म्हणाले की, भारत व चीन यांचे संबंध ‘हिंदी चिनी भाई भाई’ या भावनेनेच पुढे नेले जाऊ शकतील. दोन्ही देशांना शेजारी म्हणूनच यापुढेही राहायचे आहे. त्यामुळे शांतता व सहकार्याने राहणे हाय स्थायी मार्ग आहे.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत