शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

तिबेटला स्वातंत्र्य नको, विकास हवा, दलाई लामांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 04:16 IST

कोलकाता : तिबेटला चीनपासून स्वातंत्र्य नव्हे तर अधिक विकास हवा आहे, असे प्रतिपादन गेली ५० वर्षे भारतात विजनवासात राहणारे तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांनी गुरुवारी येथे केले.

कोलकाता : तिबेटला चीनपासून स्वातंत्र्य नव्हे तर अधिक विकास हवा आहे, असे प्रतिपादन गेली ५० वर्षे भारतात विजनवासात राहणारे तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांनी गुरुवारी येथे केले. इंडियन चेंबर आॅफ कॉमर्सच्या कार्यक्रमात श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना दलाई लामा म्हणाले की, अधूनमधून भांडणे झाली असली तरी तिबेट व चीन यांचे घनिष्ट संबंध आहेत. त्यामुळे भूतकाळात काय घडले ते बाजूला ठेवून भविष्याचा विचार करायला हवा.आम्हाला स्वातंत्र्य नको, पण चीनने तिबेटचा आदर करायला हवा, यावर भर देत दलाई लामा म्हणाले की, तिबेटची वेगळी संस्कृती आहे, वेगळी भाषा आहे. त्याचा चीनने आदर ठेवायला हवा. चिनी लोकांचे जसे त्यांच्या देशावर प्रेम आहे तसे आमचे आमच्या देशावर प्रेम आहे.तिबेटचे पठार हे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचे व अद्वितीय आहे. त्यामुळे त्याचे जतन करणे अगत्याचे आहे, असे मतही दलाई लामा यांनी व्यक्त केले.>‘हिंदी, चिनी भाई भाई’राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अरुणाचल प्रदेश भेटीला चीनने आक्षेप घेतल्याबद्दल पत्रकारांनी विचारता दलाई लामा म्हणाले की, भारत व चीन यांचे संबंध ‘हिंदी चिनी भाई भाई’ या भावनेनेच पुढे नेले जाऊ शकतील. दोन्ही देशांना शेजारी म्हणूनच यापुढेही राहायचे आहे. त्यामुळे शांतता व सहकार्याने राहणे हाय स्थायी मार्ग आहे.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत