शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

तिबेटला स्वातंत्र्य नको, विकास हवा, दलाई लामांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 04:16 IST

कोलकाता : तिबेटला चीनपासून स्वातंत्र्य नव्हे तर अधिक विकास हवा आहे, असे प्रतिपादन गेली ५० वर्षे भारतात विजनवासात राहणारे तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांनी गुरुवारी येथे केले.

कोलकाता : तिबेटला चीनपासून स्वातंत्र्य नव्हे तर अधिक विकास हवा आहे, असे प्रतिपादन गेली ५० वर्षे भारतात विजनवासात राहणारे तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांनी गुरुवारी येथे केले. इंडियन चेंबर आॅफ कॉमर्सच्या कार्यक्रमात श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना दलाई लामा म्हणाले की, अधूनमधून भांडणे झाली असली तरी तिबेट व चीन यांचे घनिष्ट संबंध आहेत. त्यामुळे भूतकाळात काय घडले ते बाजूला ठेवून भविष्याचा विचार करायला हवा.आम्हाला स्वातंत्र्य नको, पण चीनने तिबेटचा आदर करायला हवा, यावर भर देत दलाई लामा म्हणाले की, तिबेटची वेगळी संस्कृती आहे, वेगळी भाषा आहे. त्याचा चीनने आदर ठेवायला हवा. चिनी लोकांचे जसे त्यांच्या देशावर प्रेम आहे तसे आमचे आमच्या देशावर प्रेम आहे.तिबेटचे पठार हे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचे व अद्वितीय आहे. त्यामुळे त्याचे जतन करणे अगत्याचे आहे, असे मतही दलाई लामा यांनी व्यक्त केले.>‘हिंदी, चिनी भाई भाई’राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अरुणाचल प्रदेश भेटीला चीनने आक्षेप घेतल्याबद्दल पत्रकारांनी विचारता दलाई लामा म्हणाले की, भारत व चीन यांचे संबंध ‘हिंदी चिनी भाई भाई’ या भावनेनेच पुढे नेले जाऊ शकतील. दोन्ही देशांना शेजारी म्हणूनच यापुढेही राहायचे आहे. त्यामुळे शांतता व सहकार्याने राहणे हाय स्थायी मार्ग आहे.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत