शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेखाली आल्याने तीन तरुणांचा मृत्यू, सेल्फी काढण्याच्या नादात गमावला जीव ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 16:45 IST

रेल्वेखाली आल्याने तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना बिदादी येथे घडली आहे. राजधानीपासून 30 किमी अंतरावर ही घटना घडली. अपघात झाला तेव्हा तिघे तरुण सेल्फी काढण्यात व्यस्त होते का ? याचा पोलीस तपास करत आहेत

ठळक मुद्देरेल्वेखाली आल्याने तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना बिदादी येथे घडली आहेअपघात झाला तेव्हा तिघे तरुण सेल्फी काढण्यात व्यस्त होते का ? याचा पोलीस तपास करत आहेतसकाळी 9.30 ते 10 वाजण्याच्या सुमारास तिन्ही तरुणांचा मृत्यू झाला

बंगळुरु - रेल्वेखाली आल्याने तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना बिदादी येथे घडली आहे. राजधानीपासून 30 किमी अंतरावर ही घटना घडली. अपघात झाला तेव्हा तिघे तरुण सेल्फी काढण्यात व्यस्त होते का ? याचा पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी ही शक्यता वर्तवली असून, अपघात झाला तेव्हा तरुण नेमके ट्रेनपासून किती अंतरावर होते याचा अंदाज लावला जात आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 9.30 ते 10 वाजण्याच्या सुमारास तिन्ही तरुणांचा मृत्यू झाला. दोन तरुणांची ओळख पटली आहे. बंगळुरुमधील नॅशनल कॉलेजमध्ये ते शिकत होते. काही वेळापुर्वी तिघे मित्र बंगळुरुजवळील अॅम्यूजमेंट पार्कात गेले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दोन आठवड्यांमध्ये सेल्फीमुळे मृत्यू होणारी बंगळुरुमधील ही दुसरी घटना आहे. 

गेल्या आठवड्यात, काही विद्यार्थी पिकनिकसाठी गेले होते. यावेळी मित्र तलावात बुडत असताना बाकी तरुण सेल्फी काढण्यात व्यस्त होते. योगायोगाने तेदेखील नॅशनल कॉलेजचे विद्यार्थी होते. 

विश्वास तरुण तलावात बुडत होता तेव्हा तिथेच तलावात मजा मस्ती करणारे मित्र मात्र सेल्फी काढण्यात व्यस्त होते. सेल्फी काढण्याकडे लक्ष नसतं तर कदाचित आपला मित्र बुडत असल्याचं त्यांना कळलं असतं, आणि जीव वाचवला असता. 17 वर्षीय विश्वास नॅशनल कॉलेजचा विद्यार्थी होता. बंगळुरुपासून 40 किमी अंतरावर असणा-या रामनगर जिल्ह्यातील कनकपूरा येथे ही घटना घडली होती. 

विश्वास जेव्हा तलावात बुडत होता तेव्हा इतर कॅडेट्स सेल्फी काढण्यात व्यस्त होते. 'जेव्हा विश्वास बुडत होता तेव्हा सर्वांचं लक्ष सेल्फीसाठी मोबाइलमध्ये होतं, त्यामुळे आपला मित्र बुडतोय हे त्यांना कळलंच नाही', अशी माहिती पोलीस अधिक्षक रमेश बानोथ यांनी दिली आहे. रमेश बानोथ यांनी सांगितल्यानुसार, 'जवळपास दुपारी 2 वाजता सर्व विद्यार्थी तलावाजवळ गेले होते. तलावात उतरत त्यांनी पोहायला सुरुवात केली. ग्रामपंचायतीने धोक्याचा इशारा देणारा बोर्ड लावूनही विद्यार्थ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. विश्वासचा तोल गेला आणि तो गाळात अडकला. बाहेर येईपर्यंत कोणालाही विश्वास आपल्यातून बेपत्ता झाल्याचं कळलंच नाही'.

3.30 वाजता विश्वासचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि त्यानंतर त्याच्या कुटुंबियांना कळवण्यात आलं. कुटुंबियांनी कॉलेज प्रशासनावर हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला. विश्वासच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली . 'तक्रारीच्या आधारे अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आम्ही तपास करत आहोत. आम्ही सर्व विद्यार्थ्यांची चौकशी करणार आहोत. मात्र अद्यार ते सर्व धक्क्यात आहेत', अशी माहिती पोलिसांनी दिली होती.