शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

रेल्वेखाली आल्याने तीन तरुणांचा मृत्यू, सेल्फी काढण्याच्या नादात गमावला जीव ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 16:45 IST

रेल्वेखाली आल्याने तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना बिदादी येथे घडली आहे. राजधानीपासून 30 किमी अंतरावर ही घटना घडली. अपघात झाला तेव्हा तिघे तरुण सेल्फी काढण्यात व्यस्त होते का ? याचा पोलीस तपास करत आहेत

ठळक मुद्देरेल्वेखाली आल्याने तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना बिदादी येथे घडली आहेअपघात झाला तेव्हा तिघे तरुण सेल्फी काढण्यात व्यस्त होते का ? याचा पोलीस तपास करत आहेतसकाळी 9.30 ते 10 वाजण्याच्या सुमारास तिन्ही तरुणांचा मृत्यू झाला

बंगळुरु - रेल्वेखाली आल्याने तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना बिदादी येथे घडली आहे. राजधानीपासून 30 किमी अंतरावर ही घटना घडली. अपघात झाला तेव्हा तिघे तरुण सेल्फी काढण्यात व्यस्त होते का ? याचा पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी ही शक्यता वर्तवली असून, अपघात झाला तेव्हा तरुण नेमके ट्रेनपासून किती अंतरावर होते याचा अंदाज लावला जात आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 9.30 ते 10 वाजण्याच्या सुमारास तिन्ही तरुणांचा मृत्यू झाला. दोन तरुणांची ओळख पटली आहे. बंगळुरुमधील नॅशनल कॉलेजमध्ये ते शिकत होते. काही वेळापुर्वी तिघे मित्र बंगळुरुजवळील अॅम्यूजमेंट पार्कात गेले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दोन आठवड्यांमध्ये सेल्फीमुळे मृत्यू होणारी बंगळुरुमधील ही दुसरी घटना आहे. 

गेल्या आठवड्यात, काही विद्यार्थी पिकनिकसाठी गेले होते. यावेळी मित्र तलावात बुडत असताना बाकी तरुण सेल्फी काढण्यात व्यस्त होते. योगायोगाने तेदेखील नॅशनल कॉलेजचे विद्यार्थी होते. 

विश्वास तरुण तलावात बुडत होता तेव्हा तिथेच तलावात मजा मस्ती करणारे मित्र मात्र सेल्फी काढण्यात व्यस्त होते. सेल्फी काढण्याकडे लक्ष नसतं तर कदाचित आपला मित्र बुडत असल्याचं त्यांना कळलं असतं, आणि जीव वाचवला असता. 17 वर्षीय विश्वास नॅशनल कॉलेजचा विद्यार्थी होता. बंगळुरुपासून 40 किमी अंतरावर असणा-या रामनगर जिल्ह्यातील कनकपूरा येथे ही घटना घडली होती. 

विश्वास जेव्हा तलावात बुडत होता तेव्हा इतर कॅडेट्स सेल्फी काढण्यात व्यस्त होते. 'जेव्हा विश्वास बुडत होता तेव्हा सर्वांचं लक्ष सेल्फीसाठी मोबाइलमध्ये होतं, त्यामुळे आपला मित्र बुडतोय हे त्यांना कळलंच नाही', अशी माहिती पोलीस अधिक्षक रमेश बानोथ यांनी दिली आहे. रमेश बानोथ यांनी सांगितल्यानुसार, 'जवळपास दुपारी 2 वाजता सर्व विद्यार्थी तलावाजवळ गेले होते. तलावात उतरत त्यांनी पोहायला सुरुवात केली. ग्रामपंचायतीने धोक्याचा इशारा देणारा बोर्ड लावूनही विद्यार्थ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. विश्वासचा तोल गेला आणि तो गाळात अडकला. बाहेर येईपर्यंत कोणालाही विश्वास आपल्यातून बेपत्ता झाल्याचं कळलंच नाही'.

3.30 वाजता विश्वासचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि त्यानंतर त्याच्या कुटुंबियांना कळवण्यात आलं. कुटुंबियांनी कॉलेज प्रशासनावर हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला. विश्वासच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली . 'तक्रारीच्या आधारे अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आम्ही तपास करत आहोत. आम्ही सर्व विद्यार्थ्यांची चौकशी करणार आहोत. मात्र अद्यार ते सर्व धक्क्यात आहेत', अशी माहिती पोलिसांनी दिली होती.