शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या तीन, भाजपच्या महिला कार्यकर्त्याची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 03:15 IST

राजकीय हिंसाचार अद्याप सुरूच

कोलकाता : पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेस व अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये लोकसभा निवडणुकांपासून सुरू झालेला हिंसाचार थांबायला तयार नाही. येथील मुर्शिदाबाद जिल्ह्यात काँग्रेस व तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत शुक्रवारी रात्री जोरदार हाणामारी झाली आणि त्यानंतर फेकण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट होऊ न तृणमूल काँग्रेसचे तीन कार्यकर्ते ठार झाले. राज्यात गेल्या काही दिवसांत राजकीय हिंसाचारांमध्ये १३ जण मरण पावले आहेत.काँग्रेस कार्यकर्त्यांनीच आमच्या घरावर बॉम्ब फेकला, असा आरोप ठार झालेल्या खैरुद्दीन शेख (५५) यांच्या मुलाने केला आहे. या बॉम्बहल्ल्यात तृणमूलचा १९ वर्षांचा सोहेल राणा हा कार्यकर्ताही ठार झाला आहे. बॉम्बहल्ला झाला, तेव्हा आम्ही घरात झोपलो होतो, असे शेख याच्या मुलाने सांगितले. ठार झालेल्या तिसऱ्या कार्यकर्त्याचे नाव समजू शकले नाही. काही दिवसांपूर्वी माझे काका अल्ताफ हुसेन यांनाही ठार मारण्यात आले होते, असे शेखच्या मुलाने सांगितले. काल बॉम्बहल्ल्यात मरण पावलेला सोहेल राणा हा अल्ताफ हुसेन यांचा मुलगा आहे. (वृत्तसंस्था)घरात घुसून गोळ्या झाडल्याया घटनेच्या आधी गुरुवारी भारतीय जनता पक्षाच्या सरस्वती दास या महिला कार्यकर्त्याची घरात घुसून हत्या करण्यात आली. ती हत्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली, असा आरोप भाजपने केला आहे.सरस्वती दास या बशीरघाटच्या हस्नाबाद येथे राहत. गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. त्यांचे पती संध्याकाळी कामावरून घरी आले, तेव्हा त्यांना पत्नीचा मृतदेह दिसला. या हत्येशी आमचा अजिबात संबंध नसल्याचा दावा तृणमूलने केला आहे.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालtmcठाणे महापालिकाBJPभाजपा