शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

जलीकट्टूचे तीन बळी

By admin | Updated: January 23, 2017 01:07 IST

तामिळनाडूच्या विविध भागात रविवारी जलीकट्टूचे (बैलांचा खेळ)आयोजन करण्यात आले होते. यात पडुकोट्टईत दोन जणांचा तर

चेन्नई / मदुराई : तामिळनाडूच्या विविध भागात रविवारी जलीकट्टूचे (बैलांचा खेळ)आयोजन करण्यात आले होते. यात पडुकोट्टईत दोन जणांचा तर अन्य एका ठिकाणी एकाचा मृत्यू झाला. दरम्यान, आंदोलकांचा उग्र पवित्रा लक्षात घेता मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम हे आलंगनल्लूर येथील जलीकट्टूचे उद्घाटन न करताच चेन्नईला निघून गेले. मदुराईत रविवारी आंदोलक आक्रमक झाले होते. तात्पुरती कायदा दुरुस्ती आंदोलकांना अमान्य असून यावर कायमस्वरुपी तोडगा काढावा अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान, जलीकट्टूच्या आयोजनासाठी प्रसिद्ध असलेल्या आलंगनल्लूर येथे कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम जाणार होते पण, आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहून ते परत गेले. पोलिसांनी सांगितले की, रापूसल येथे जलीकट्टूच्या कार्यक्रमादरम्यान एका बैलाने हल्ला केल्याने दोन लोकांचा मृत्यू झाला. तर, २८ जण जखमी झाले आहेत. तर, जयहिंदपुरम येथील ४८ वर्षीय चंद्रमोहन यांचा शरीरातील पाणी कमी झाल्याने मृत्यू झाला. मदुराईत जलीकट्टूच्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. चेन्नईच्या मरीना बीचवर अद्यापही आंदोलक आहेत. सहा दिवसांपासून मरीना बीच आंदोलनाचे केंद्र झाले आहे. पशु अधिकार संघटना पेटावर बंदी आणावी आणि या प्रकरणी कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशी मागणी आंदोलक करत आहेत. दरम्यान, चेन्नईत परतण्यापूर्वी मदुराईत पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री पनीरसेल्वम म्हणाले की, जलीकट्टूवरील बंदी हटविण्यात आली आहे. आलंगनल्लूर येथे स्थानिक नागरिकांकडून या खेळाचे आयोजन करण्यात येईल.