शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
3
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
4
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
5
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
6
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
7
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
8
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
9
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
10
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
11
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
12
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
13
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
14
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
17
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

पद्म पुरस्कारासाठी दिल्लीतून तिघांची नावे; मुख्यमंत्री केजरीवालांचे राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 10:53 AM

दरवर्षी पद्म पुरस्कारासाठी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे नावे पाठविली जातात.

- विकास झाडेनवी दिल्ली : कोविड काळात आरोग्य क्षेत्रात सर्वोत्तम काम करणाऱ्या तीन व्यक्तींची नावे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडे पाठविलेली तिघांची नावे जाहीर करून पुन्हा एकदा केंद्र सरकार विरोधात राजकारण केले आहे.दरवर्षी पद्म पुरस्कारासाठी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे नावे पाठविली जातात. कोणाला पुरस्कार द्यायचा किंवा नाही यावर मात्र राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब होते.

राज्यांनी पाठविलेली नावे ही याआधी कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली नाहीत. परंतु दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मात्र यासाठी पत्रकार परिषद आयोजित करून आरोग्य क्षेत्रातील तिघांची नावे जाहीर केलीत. त्यांना शुभेच्छाही दिल्यात आणि केंद्र सरकारने त्यांना पद्म पुरस्कार द्यावा अशी विनंती केली आहे.

देशात सर्वात प्रथम प्लाझ्मा बॅँक सुरू केलेल्या आएलबीएस हॉस्पिटलचे डॉ. ए. के. सरीन, एलएनजेपी हॉस्पिटलचे डॉ. सुरेश कुमार आणि मॅक्स हॉस्पिटलचे डॉ. संदीप बुद्धीराजा यांचा समावेश आहे. केजरीवाल म्हणाले, एलएनजेपी हॉस्पिटलमध्ये कोविडच्या २०५०० रुग्णांवर उपचार करण्यात आला. हा आकडा देशात सर्वाधिक होता. 

अशीही ‘पारदर्शकता’-

आपल्या कोणत्याही कामाची केंद्र सरकार दखल घेत नाही असा समज करून अलीकडे मुख्यमंत्री केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे आम्ही केंद्राकडे कोणत्या मागण्या केल्या या माध्यमांकडे जाहीर करतात. त्याला केजरीवाल सरकारने ‘पारदर्शकता’ असे नाव दिले आहे. या पारदर्शकतेच्या श्रृंखलेत त्यांनी आज पद्म पुरस्कारासाठी ज्यांची नावे पाठवलीत ती जाहीर केली.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालpadma shri awardsपद्मश्री पुरस्कार