शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
3
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
4
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
5
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
6
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
7
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
8
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
9
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
10
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
11
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
12
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
13
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
14
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
15
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
16
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
17
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
18
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
19
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
20
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार

पद्म पुरस्कारासाठी दिल्लीतून तिघांची नावे; मुख्यमंत्री केजरीवालांचे राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 10:53 IST

दरवर्षी पद्म पुरस्कारासाठी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे नावे पाठविली जातात.

- विकास झाडेनवी दिल्ली : कोविड काळात आरोग्य क्षेत्रात सर्वोत्तम काम करणाऱ्या तीन व्यक्तींची नावे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडे पाठविलेली तिघांची नावे जाहीर करून पुन्हा एकदा केंद्र सरकार विरोधात राजकारण केले आहे.दरवर्षी पद्म पुरस्कारासाठी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे नावे पाठविली जातात. कोणाला पुरस्कार द्यायचा किंवा नाही यावर मात्र राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब होते.

राज्यांनी पाठविलेली नावे ही याआधी कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली नाहीत. परंतु दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मात्र यासाठी पत्रकार परिषद आयोजित करून आरोग्य क्षेत्रातील तिघांची नावे जाहीर केलीत. त्यांना शुभेच्छाही दिल्यात आणि केंद्र सरकारने त्यांना पद्म पुरस्कार द्यावा अशी विनंती केली आहे.

देशात सर्वात प्रथम प्लाझ्मा बॅँक सुरू केलेल्या आएलबीएस हॉस्पिटलचे डॉ. ए. के. सरीन, एलएनजेपी हॉस्पिटलचे डॉ. सुरेश कुमार आणि मॅक्स हॉस्पिटलचे डॉ. संदीप बुद्धीराजा यांचा समावेश आहे. केजरीवाल म्हणाले, एलएनजेपी हॉस्पिटलमध्ये कोविडच्या २०५०० रुग्णांवर उपचार करण्यात आला. हा आकडा देशात सर्वाधिक होता. 

अशीही ‘पारदर्शकता’-

आपल्या कोणत्याही कामाची केंद्र सरकार दखल घेत नाही असा समज करून अलीकडे मुख्यमंत्री केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे आम्ही केंद्राकडे कोणत्या मागण्या केल्या या माध्यमांकडे जाहीर करतात. त्याला केजरीवाल सरकारने ‘पारदर्शकता’ असे नाव दिले आहे. या पारदर्शकतेच्या श्रृंखलेत त्यांनी आज पद्म पुरस्कारासाठी ज्यांची नावे पाठवलीत ती जाहीर केली.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालpadma shri awardsपद्मश्री पुरस्कार