शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

तीन ‘चेटकिणीं’चा खून करणाऱ्यांची फाशी केली रद्द; शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 01:31 IST

देहदंडाची शिक्षा देऊन समाजात खोलवर रुजलेल्या अंधश्रद्धांचे निर्मूलन होणार नाही, असे नमूद करीत कोलकाता उच्च न्यायालयाने ‘चेटकिणी’ असल्याच्या संशयावरून तीन महिलांचा खून करणाºया सात पुरुष आरोपींची फाशीची शिक्षा रद्द केली.

कोलकाता : देहदंडाची शिक्षा देऊन समाजात खोलवर रुजलेल्या अंधश्रद्धांचे निर्मूलन होणार नाही, असे नमूद करीत कोलकाता उच्च न्यायालयाने ‘चेटकिणी’ असल्याच्या संशयावरून तीन महिलांचा खून करणाºया सात पुरुष आरोपींची फाशीची शिक्षा रद्द केली.पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील दुबराजपूर व हरिदासपूर या गावांतील रोगराई व अकाली मृत्यू या तिघींनी ‘चेटूक’ केल्याने होत असल्याचा निष्कर्ष गावातील ज्येष्ठांंनी पंचायत भरवून काढल्यानंतर संबारी सिंग, फुलमणी सिंग व सोंबारी सिंग या तिघींना दगड-काठ्यांनी ठेचून ठार मारले होते. ही घटना १६ आॅक्टोबर २०१२ रोजी घडली होती. यावरून दाखल झालेल्या खटल्यात सत्र न्यायालयाने सात आरोपींना फाशी व दोघांना जन्मठेप ठोठावली होती. खून झालेल्या महिला व सर्व आरोपी मुंडा या आदिवासी समाजातील होते.याविरुद्ध हायकोर्टात केलेल्या अपिलांवर निकाल देताना न्या. जयमाला बागची व न्या. मौशुमी भट्टाचार्य यांनी म्हटले की, हे खून पूर्ववैमनस्य, वैर, धनाचा लोभ यासारख्या कोणत्याही हेतूने नव्हे तर निव्वळ अंधश्रद्धेतून झाले आहेत. शिक्षणाचा सर्वदूर प्रसार करून जनतेचा दृष्टिकोन विज्ञाननिष्ठ बनविणे ही सरकारची घटनादत्त जबाबदारी आहे. एकीकडे आर्थिक विकासाचे ढोल वाजविले जात असताना दुसरीकडे कोलकाता या राजधानीपासून फार दूर नसलेल्या या गावात अंधश्रद्धेतून असे बळी पडावेत हे सरकारचे अपयश आहे. (वृत्तसंस्था)राज्यातील प्रकरणाचा आधारकोलकाता उच्च न्यायालयाने हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने सन २०१४ मध्ये महाराष्ट्र सरकार वि. दामू गोपीनाथ शिंदे व इतर या प्रकरणात दिलेल्या निर्णयाचा आधार घेतला.त्या प्रकरणात कोवळ्या मुलांचा नरबळी दिला तर गुप्तधनाचा लाभ होईल, या अघोरी अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन आरोपींनी तीन मुलांना ठार मारले होते. सत्र न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयानेही हे अन्य खुनांप्रमाणे खून मानून आरोपींना फाशी दिली होती; परंतु सर्वोच्च न्यायालयाने ते खून अंधश्रद्धेतून झालेले असल्याने आरोपींची फाशी रद्द करून त्यांना जन्मठेप दिली होती.

टॅग्स :Courtन्यायालय