शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

तीन ‘चेटकिणीं’चा खून करणाऱ्यांची फाशी केली रद्द; शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 01:31 IST

देहदंडाची शिक्षा देऊन समाजात खोलवर रुजलेल्या अंधश्रद्धांचे निर्मूलन होणार नाही, असे नमूद करीत कोलकाता उच्च न्यायालयाने ‘चेटकिणी’ असल्याच्या संशयावरून तीन महिलांचा खून करणाºया सात पुरुष आरोपींची फाशीची शिक्षा रद्द केली.

कोलकाता : देहदंडाची शिक्षा देऊन समाजात खोलवर रुजलेल्या अंधश्रद्धांचे निर्मूलन होणार नाही, असे नमूद करीत कोलकाता उच्च न्यायालयाने ‘चेटकिणी’ असल्याच्या संशयावरून तीन महिलांचा खून करणाºया सात पुरुष आरोपींची फाशीची शिक्षा रद्द केली.पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील दुबराजपूर व हरिदासपूर या गावांतील रोगराई व अकाली मृत्यू या तिघींनी ‘चेटूक’ केल्याने होत असल्याचा निष्कर्ष गावातील ज्येष्ठांंनी पंचायत भरवून काढल्यानंतर संबारी सिंग, फुलमणी सिंग व सोंबारी सिंग या तिघींना दगड-काठ्यांनी ठेचून ठार मारले होते. ही घटना १६ आॅक्टोबर २०१२ रोजी घडली होती. यावरून दाखल झालेल्या खटल्यात सत्र न्यायालयाने सात आरोपींना फाशी व दोघांना जन्मठेप ठोठावली होती. खून झालेल्या महिला व सर्व आरोपी मुंडा या आदिवासी समाजातील होते.याविरुद्ध हायकोर्टात केलेल्या अपिलांवर निकाल देताना न्या. जयमाला बागची व न्या. मौशुमी भट्टाचार्य यांनी म्हटले की, हे खून पूर्ववैमनस्य, वैर, धनाचा लोभ यासारख्या कोणत्याही हेतूने नव्हे तर निव्वळ अंधश्रद्धेतून झाले आहेत. शिक्षणाचा सर्वदूर प्रसार करून जनतेचा दृष्टिकोन विज्ञाननिष्ठ बनविणे ही सरकारची घटनादत्त जबाबदारी आहे. एकीकडे आर्थिक विकासाचे ढोल वाजविले जात असताना दुसरीकडे कोलकाता या राजधानीपासून फार दूर नसलेल्या या गावात अंधश्रद्धेतून असे बळी पडावेत हे सरकारचे अपयश आहे. (वृत्तसंस्था)राज्यातील प्रकरणाचा आधारकोलकाता उच्च न्यायालयाने हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने सन २०१४ मध्ये महाराष्ट्र सरकार वि. दामू गोपीनाथ शिंदे व इतर या प्रकरणात दिलेल्या निर्णयाचा आधार घेतला.त्या प्रकरणात कोवळ्या मुलांचा नरबळी दिला तर गुप्तधनाचा लाभ होईल, या अघोरी अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन आरोपींनी तीन मुलांना ठार मारले होते. सत्र न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयानेही हे अन्य खुनांप्रमाणे खून मानून आरोपींना फाशी दिली होती; परंतु सर्वोच्च न्यायालयाने ते खून अंधश्रद्धेतून झालेले असल्याने आरोपींची फाशी रद्द करून त्यांना जन्मठेप दिली होती.

टॅग्स :Courtन्यायालय