शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

साखरझोपेतच काळाचा घाला! उत्तराखंडमध्ये भूस्खलनात तिघांचा मृत्यू; १६ जण गाडले गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 08:24 IST

या दुकानांमध्ये १९ लोक राहत होते. त्यातील तिघांचे मृतदेह सापडले असून, बेपत्ता १६ लोकांचा शोध सुरू आहे,  असे रुद्रप्रयागचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले. 

डेहराडून/रुद्रप्रयाग : देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे. उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरीकुंडजवळ साखरझोपेत असतानाच भूस्खलन झाल्याने ढिगाऱ्याखाली दबले गेले. यात ३ जणांचा मृत्यू तर अन्य १६ जण बेपत्ता  आहेत. गुरुवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या मुसळधार पावसात केदारनाथ यात्रा मार्गावरील गौरीकुंडजवळ असलेल्या दात पुलिया येथे भूस्खलनामुळे तीन दुकाने वाहून गेली. या दुकानांमध्ये १९ लोक राहत होते. त्यातील तिघांचे मृतदेह सापडले असून, बेपत्ता १६ लोकांचा शोध सुरू आहे,  असे रुद्रप्रयागचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले. 

दुर्घटनेची माहिती मिळताच रात्रीच बचावकार्य सुरू करण्यात आले आणि घटनास्थळापासून ५० मीटर खाली वाहणाऱ्या मंदाकिनी नदीतून तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. एनडीआरएफ, राज्य आपत्ती निवारण दल, पोलिस आणि इतर संस्था नदीत आणि आसपासच्या परिसरात बेपत्ता लोकांचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत, असे ते म्हणाले. 

या राज्यांत मुसळधार - उत्तराखंड, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, आसाम, मेघालय, पूर्व राजस्थान, हरयाणा, चंडीगड, अरुणाचल प्रदेश.येथे शक्यता नाही पश्चिम राजस्थान, सिक्कीम, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र.अतिवृष्टी कुठे होईल?मध्य प्रदेशातील नर्मदापुरम, बैतुल, नरसिंहपूर, छिंदवाडा, सिवनी आणि मंडला येथे अतिवृष्टीचा इशारा आहे.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडlandslidesभूस्खलनDeathमृत्यू