शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

बिहारमध्ये बोट बुडून तिघांचा मृत्यू; २० बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 04:40 IST

बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील महानंदा नदीत एक बोट बुडून त्यातील तीन प्रवाशांना जलसमाधी मिळाली व वीसहून अधिक जण बेपत्ता आहेत.

कटिहार : बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील महानंदा नदीत एक बोट बुडून त्यातील तीन प्रवाशांना जलसमाधी मिळाली व वीसहून अधिक जण बेपत्ता आहेत. या बोटीमध्ये ८० प्रवासी होते. बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.या अपघाताचे वृत्त कळताच पोलिसांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले. जलसमाधी मिळालेल्या प्रवाशांपैकी तीन जणांचे मृतदेह हाती लागले असून, त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही.मृतांमध्ये एक पुरुष, महिला व बालकाचा समावेश आहे. बोट बुडाल्यानंतर त्यातील काही प्रवाशांनी पोहत किनारा गाठला, तर काही जणांना आजूबाजूच्या लोकांनी वाचविले. वीसपेक्षा बेपत्ता प्रवाशांचा पाणबुड्यांकरवी शोध घेण्यात येत आहे. (वृत्तसंस्था)क्षमतेपेक्षा जास्त प्रवासीबिहार व पश्चिम बंगालच्या सीमेवरील जगन्नाथपूर घाट येथे गुरुवारी रात्री सव्वाआठ वाजता ही दुर्घटना घडली.रामपूर बाजारातून विविध वस्तूंची खरेदी करून वाजीदपूरचे रहिवासी आपल्या गावी परत येत असताना त्यांची बोट बुडाली.पोलिसांनी सांगितले की, ४० प्रवासी क्षमतेच्या बोटीमध्ये जास्त प्रवासी भरल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :BiharबिहारAccidentअपघात