शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

जिथे होळी पेटली, तिथेच चिता पेटवण्याची वेळ; तीन चिमुरडी होरपळल्यानं गावावर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 18:25 IST

तीन चिमुरड्यांच्या निधनामुळे शोककळा; एक चिमुरडा गंभीर जखमी

गया: देशभरात होळी आणि रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. मात्र बिहारमधल्या बोधगयामध्ये होळीच्या उत्सवाला गालबोट लागलं. होळी पेटवली जात असताना ४ चिमुरडी मुलं होरपळली. यातील तिघांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.बोधगया पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मनकोसी गावात रविवारी रात्री होळी पेटवण्यात आली. या आगीत चार चिमुरडी होरपळली. यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. रोहित कुमार (१२ वर्षे), नंदलाल मांझी (१३ वर्षे) आणि उपेंद्र कुमार (१२ वर्षे) अशी मृतांची नावं आहेत. तर मोराटाल पंचायतीच्या उपसरपंच गीता देवी यांचा मुलगा रितेश कुमार (१२ वर्षे) गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.होळी पेटवण्यात आल्यानंतर काही मुलं पेटली लाकडं घेऊन गावाच्या समोर आलेल्या डोंगरावर गेले होते. यातील ४ मुलं डोंगरावर फार पुढे गेली. यावेळी मुलांपैकी कोणीतरी पेटतं लाकूड झाडीत फेकलं. त्यामुळे झाडीला आग लागली. वर गेलेल्या मुलं अडकून पडली. आगीत होरपळल्यानं तिघांचा जागीच मृत्यू झाला. आज या तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणात मुलांच्या कुटुंबातील कोणीही एफआयआर दाखल केलेला नाही.