शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

जिथे होळी पेटली, तिथेच चिता पेटवण्याची वेळ; तीन चिमुरडी होरपळल्यानं गावावर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 18:25 IST

तीन चिमुरड्यांच्या निधनामुळे शोककळा; एक चिमुरडा गंभीर जखमी

गया: देशभरात होळी आणि रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. मात्र बिहारमधल्या बोधगयामध्ये होळीच्या उत्सवाला गालबोट लागलं. होळी पेटवली जात असताना ४ चिमुरडी मुलं होरपळली. यातील तिघांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.बोधगया पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मनकोसी गावात रविवारी रात्री होळी पेटवण्यात आली. या आगीत चार चिमुरडी होरपळली. यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. रोहित कुमार (१२ वर्षे), नंदलाल मांझी (१३ वर्षे) आणि उपेंद्र कुमार (१२ वर्षे) अशी मृतांची नावं आहेत. तर मोराटाल पंचायतीच्या उपसरपंच गीता देवी यांचा मुलगा रितेश कुमार (१२ वर्षे) गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.होळी पेटवण्यात आल्यानंतर काही मुलं पेटली लाकडं घेऊन गावाच्या समोर आलेल्या डोंगरावर गेले होते. यातील ४ मुलं डोंगरावर फार पुढे गेली. यावेळी मुलांपैकी कोणीतरी पेटतं लाकूड झाडीत फेकलं. त्यामुळे झाडीला आग लागली. वर गेलेल्या मुलं अडकून पडली. आगीत होरपळल्यानं तिघांचा जागीच मृत्यू झाला. आज या तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणात मुलांच्या कुटुंबातील कोणीही एफआयआर दाखल केलेला नाही.