शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
2
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
3
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
4
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
5
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
6
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
7
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
8
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
9
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
10
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
11
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
12
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
13
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
14
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
15
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
16
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
17
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
18
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
19
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
20
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले

जिथे होळी पेटली, तिथेच चिता पेटवण्याची वेळ; तीन चिमुरडी होरपळल्यानं गावावर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 18:25 IST

तीन चिमुरड्यांच्या निधनामुळे शोककळा; एक चिमुरडा गंभीर जखमी

गया: देशभरात होळी आणि रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. मात्र बिहारमधल्या बोधगयामध्ये होळीच्या उत्सवाला गालबोट लागलं. होळी पेटवली जात असताना ४ चिमुरडी मुलं होरपळली. यातील तिघांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.बोधगया पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मनकोसी गावात रविवारी रात्री होळी पेटवण्यात आली. या आगीत चार चिमुरडी होरपळली. यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. रोहित कुमार (१२ वर्षे), नंदलाल मांझी (१३ वर्षे) आणि उपेंद्र कुमार (१२ वर्षे) अशी मृतांची नावं आहेत. तर मोराटाल पंचायतीच्या उपसरपंच गीता देवी यांचा मुलगा रितेश कुमार (१२ वर्षे) गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.होळी पेटवण्यात आल्यानंतर काही मुलं पेटली लाकडं घेऊन गावाच्या समोर आलेल्या डोंगरावर गेले होते. यातील ४ मुलं डोंगरावर फार पुढे गेली. यावेळी मुलांपैकी कोणीतरी पेटतं लाकूड झाडीत फेकलं. त्यामुळे झाडीला आग लागली. वर गेलेल्या मुलं अडकून पडली. आगीत होरपळल्यानं तिघांचा जागीच मृत्यू झाला. आज या तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणात मुलांच्या कुटुंबातील कोणीही एफआयआर दाखल केलेला नाही.