शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 19:36 IST

मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळल्यानंतर जिल्ह्यात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे.जिरीबाम जिल्ह्यातील तीन लोकांच्या हत्येप्रकरणी मोठा गोंधळ उडाला आहे. शनिवारी इंफाळमध्ये आंदोलकांनी दोन मंत्री आणि तीन आमदारांच्या निवासस्थानावर धडक दिली आणि आमदारांच्या घरांवर जमावाने केलेल्या हल्ल्यानंतर इंफाळ पश्चिम प्रशासनाने जिल्ह्यात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू केली आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

इंफाळ पश्चिम जिल्हा दंडाधिकारी टी किरणकुमार यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, शनिवारी दुपारी ४.३० वाजल्यापासून कर्फ्यू लागू करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, लम्फेल सनकेथेल भागातील आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री सपम रंजन यांच्या निवासस्थानावर जमावाने हल्ला केला.

लॅम्फेल सनकेथेल डेव्हलपमेंट अथॉरिटीचे प्रतिनिधी डेव्हिड यांनी दिलेली माहिती अशी, सपम यांनी आम्हाला आश्वासन दिले की, तीन लोकांच्या हत्येशी संबंधित मुद्द्यांवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली जाईल आणि जर सरकार जनतेच्या भावनांचा आदर करू शकले नाही तर मंत्री राजीनामा देतील . आंदोलकांनी ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री एल सुसिंद्रो सिंह यांच्या घरावरही हल्ला केला.

इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील सगोलबंद भागात भाजप आमदार आरके इमो यांच्या घरासमोर आंदोलक जमले आणि घोषणाबाजी केली. इमो हे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांचे जावई देखील आहेत. तीन लोकांच्या हत्येवर त्यांनी सरकारकडून योग्य उत्तर देण्याची मागणी केली आणि २४ तासांच्या आत दोषींना अटक करण्याची विनंती केली.

केशमथोंग मतदारसंघातील अपक्ष आमदार सपम निशिकांत सिंह यांना त्यांच्या तिड्डीम रोड येथील निवासस्थानी भेटण्यासाठी आलेल्या आंदोलकांनी त्यांच्या मालकीच्या स्थानिक वृत्तपत्राच्या कार्यालयाच्या इमारतीला लक्ष्य केले, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एजन्सीला सांगितले. जमावाने कार्यालयाच्या इमारतीसमोरील काही तात्पुरत्या बांधकामांची नासधूस केली.

मणिपूर-आसाम सीमेवर जिरी आणि बराक नद्यांच्या संगमाजवळ शुक्रवारी रात्री जिरीबाम जिल्ह्यातील सहा बेपत्ता लोकांपैकी तीन मृतदेह सापडले. जिरीबाम जिल्ह्यातील बोरोबेकरा येथून १६ किलोमीटर अंतरावर एक महिला आणि दोन मुलांचे मृतदेह सापडले, ज्या ठिकाणी सोमवारी सहा जण बेपत्ता झाले होते.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार