शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
‘भाजपा ४०० जागा कदाचित चंद्रावर जिंकेल, भारतात मात्र…’ आदित्य ठाकरेंचा खोचक टोला 
3
....तोपर्यंत तपास यंत्रणा वकिलांना समन्स बजावू शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
4
आता उगाच उठून सोशल मीडियावर काहीही बोलता येणार नाही! 'या' देशाने इन्फ्लुएन्सर्सबाबतीत घेतला मोठा निर्णय
5
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
6
१ कोटी रुपयांचं घर घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी किती असली पाहिजे? पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स
7
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
8
Swami Samartha: घरातील देवांची मूर्ती, प्रतिमा यातील चैतन्य कसे ओळखावे? उपासना कशी वाढवावी? वाचा
9
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
10
घर घ्यायचंय? फ्लॅट घेताना स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च किती येतो? कुठे होईल पैशांची बचत
11
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
12
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
13
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
14
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
15
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
16
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
17
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
18
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
19
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
20
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग

मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 19:36 IST

मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळल्यानंतर जिल्ह्यात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे.जिरीबाम जिल्ह्यातील तीन लोकांच्या हत्येप्रकरणी मोठा गोंधळ उडाला आहे. शनिवारी इंफाळमध्ये आंदोलकांनी दोन मंत्री आणि तीन आमदारांच्या निवासस्थानावर धडक दिली आणि आमदारांच्या घरांवर जमावाने केलेल्या हल्ल्यानंतर इंफाळ पश्चिम प्रशासनाने जिल्ह्यात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू केली आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

इंफाळ पश्चिम जिल्हा दंडाधिकारी टी किरणकुमार यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, शनिवारी दुपारी ४.३० वाजल्यापासून कर्फ्यू लागू करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, लम्फेल सनकेथेल भागातील आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री सपम रंजन यांच्या निवासस्थानावर जमावाने हल्ला केला.

लॅम्फेल सनकेथेल डेव्हलपमेंट अथॉरिटीचे प्रतिनिधी डेव्हिड यांनी दिलेली माहिती अशी, सपम यांनी आम्हाला आश्वासन दिले की, तीन लोकांच्या हत्येशी संबंधित मुद्द्यांवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली जाईल आणि जर सरकार जनतेच्या भावनांचा आदर करू शकले नाही तर मंत्री राजीनामा देतील . आंदोलकांनी ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री एल सुसिंद्रो सिंह यांच्या घरावरही हल्ला केला.

इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील सगोलबंद भागात भाजप आमदार आरके इमो यांच्या घरासमोर आंदोलक जमले आणि घोषणाबाजी केली. इमो हे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांचे जावई देखील आहेत. तीन लोकांच्या हत्येवर त्यांनी सरकारकडून योग्य उत्तर देण्याची मागणी केली आणि २४ तासांच्या आत दोषींना अटक करण्याची विनंती केली.

केशमथोंग मतदारसंघातील अपक्ष आमदार सपम निशिकांत सिंह यांना त्यांच्या तिड्डीम रोड येथील निवासस्थानी भेटण्यासाठी आलेल्या आंदोलकांनी त्यांच्या मालकीच्या स्थानिक वृत्तपत्राच्या कार्यालयाच्या इमारतीला लक्ष्य केले, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एजन्सीला सांगितले. जमावाने कार्यालयाच्या इमारतीसमोरील काही तात्पुरत्या बांधकामांची नासधूस केली.

मणिपूर-आसाम सीमेवर जिरी आणि बराक नद्यांच्या संगमाजवळ शुक्रवारी रात्री जिरीबाम जिल्ह्यातील सहा बेपत्ता लोकांपैकी तीन मृतदेह सापडले. जिरीबाम जिल्ह्यातील बोरोबेकरा येथून १६ किलोमीटर अंतरावर एक महिला आणि दोन मुलांचे मृतदेह सापडले, ज्या ठिकाणी सोमवारी सहा जण बेपत्ता झाले होते.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार