शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

पहलू खान हत्या प्रकरणात आरोपी सुटणे धक्कादायक - प्रियांका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 04:13 IST

पहलू खान हत्या प्रकरणातील सर्व सहाही आरोपी खालच्या न्यायालयात निर्दोष सुटल्याबद्दल काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मला धक्का बसल्याचे शुक्रवारी म्हटले.

नवी दिल्ली : पहलू खान हत्या प्रकरणातील सर्व सहाही आरोपी खालच्या न्यायालयात निर्दोष सुटल्याबद्दल काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मला धक्का बसल्याचे शुक्रवारी म्हटले. त्यांनी राजस्थानमध्ये जमावाकडून होणाऱ्या हत्यांविरोधात बनवण्यात आलेला कायदा हा न्याय देण्यात सक्षम ठरेल, अशी आशा व्यक्त केली.‘पहलू खान मॉब लिंचिंग प्रकरणात खालच्या न्यायालयाने दिलेला निर्णय हा धक्कादायक आहे. आमच्या देशात मनुष्य हीनतेला आणि जमावाकडून ठार मारले (मॉब लिंचिंग) जाण्याच्या घृणास्पद कृत्यांना कोणतेही स्थान असायला नको,’ असे गांधी यांनी हिंदी भाषेत केलेल्या टष्ट्वीटमध्ये म्हटले.२०१७ मध्ये पहलू खान यांची जमावाकडून झालेल्या मारहाणीत हत्या झाली होती. अलवार न्यायालयाने १४ आॅगस्ट रोजी सर्व सहाही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.पहलू खान (५५), त्यांची दोन मुले व इतर काही जण १ एप्रिल २०१७ रोजी जयपूरहून गायी घेऊन निघाले असताना राजस्थानच्या अलवार जिल्ह्यात जमावाने त्यांना अडवून मारहाण केली होती. त्यात पहलू खान यांचा मृत्यू झाला होता. जमावाकडून झालेल्या मारहाणीत व्यक्तीचा मृत्यू झाल्यास दोषींना जन्मठेपेची शिक्षा आणि पाच लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावणारे विधेयक राजस्थान विधानसभेने पाच आॅगस्ट रोजी संमत केले आहे.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस