शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

दाेष नसतानाही हजाराे कैदी तुरुंगात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 11:49 IST

तीन वर्षांपेक्षा अधिक काळ जामीन न मिळालेल्या कैद्यांच्या संदर्भातील आकडेवारी थक्क करणारी आहे. अशा कैद्यांपैकी 27 टक्के कैदी हे अशिक्षित आहेत, तर 41 टक्के कैद्यांचे मॅट्रिकपर्यंतही शिक्षण झालेले नाही. 

संजय मोहिते, निवृत्त, पोलिस अधिकारी -आपल्या देशातील विविध तुरुंगात आजमितीला सुमारे पाच लाख ७५ हजार कैदी तुरुंगांत आहेत. त्यापैकी चार लाख ३५ हजार कच्चे किंवा न्याय चौकशीअधीन कैदी आहेत. म्हणजेच देशातील विविध तुरुंगांमध्ये सुमारे ७५ टक्के कैदी असे आहेत ज्यांच्यावर कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नाही. सुमारे ८५ हजार कैदी हे ज्येष्ठ नागरिक आहेत. बहुतांश तुरुंगांत क्षमतेपेक्षा अधिक, काही ठिकाणी दुप्पट, तर काही ठिकाणी तिप्पट ते चौपट कैदी दाटीवाटीने भरलेले आहेत. असे अंडरट्रायल कैदी दुर्दैवाने अनेक वर्षे तुरुंगात खितपत पडलेले असतात. त्यापैकी बऱ्याच जणांची नंतर खटल्यातून निर्दोष मुक्तताही होते.

संयुक्त राष्ट्र संघाने प्रकाशित केलेली आकडेवारी पाहिली असता, जगभरात सुमारे सव्वा ते दीड कोटी लोक तुरुंगांत आहेत. जवळजवळ १२० देशांमध्ये तुरुंगातील कैद्यांची संख्या ही तुरुंगाच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे. या कैद्यांपैकी सुमारे सात टक्के महिला कैदी आहेत. आपल्या देशातील बहुतांश तुरुंग हे ब्रिटिशकालीन आहेत. तेथे स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांचा अभाव आहे. त्यांना अत्यंत मर्यादित स्वरूपात कोठड्या आहेत.

प्रत्येक राज्याने स्वतंत्र असे प्रिझन मॅन्युअलसुद्धा बनवलेले आहेत. शिक्षा भोगणारे कैदी आणि ज्यांच्यावरील आरोप सिद्ध झालेले नाहीत आणि केवळ संशयावरून तुरुंगात असलेले चौकशीअधीन कैदी यांना स्वतंत्रपणे ठेवणे अपेक्षित आहे; परंतु तुरुंगातील वाढती कैद्यांची संख्या पाहता हे शक्य होत नसावे. काही तुरुंगांमध्ये तर क्षमतेपेक्षा दुप्पट, तिप्पट कैदी आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावरील कैद्यांचे जेवण, त्यांना पुरवण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधा, तेथील स्वच्छता, शौचालये यावर खूप मोठ्या प्रमाणावर ताण पडत आहे.

भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद २१ आणि २२ नुसार मिळालेल्या मूलभूत स्वातंत्र्यावरच गदा येत आहे. कैद्यांनाही काही मूलभूत अधिकार असतात. त्यांना देखील जगण्याचा अधिकार असतो, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी निवाडे दिलेले आहेत. भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद ३९-अ नुसार मोफत विधिसेवा देखील कैद्यांना मिळू शकते. तुरुंगातील सरासरी ३० कैद्यांमागे किमान एक वकील शासनाने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे; परंतु तसे होताना दिसत नाही.

चौकशीअधीन कैद्यांना जामीन देण्याची तरतूद आहे. ज्यांच्यावर गुन्हे सिद्ध झालेले आहेत अशा कैद्यांसाठी पॅरोल/ संचित रजा दिली जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार एखाद्या गुन्ह्यासाठी जेवढी शिक्षा आहे, त्या शिक्षेच्या अर्धा कालावधी जर एखाद्या चौकशीअधीन कैद्याने तुरुंगात व्यतित केला असेल तर त्याला जामीन द्यावा (फक्त काही प्रकरणांतच) असे निर्णय दिलेले आहेत.

तुरुंग किंवा सुधारगृहे हे ‘फौजदारी न्याय यंत्रणेचा’(क्रिमिनल जस्टीस सिस्टीम) अविभाज्य भाग आहेत. तपास यंत्रणा, वकील, न्यायालय आणि तुरुंग यंत्रणा परस्परांवर अवलंबून आहेत. आपल्या देशात लाखोंच्या संख्येने खटले प्रलंबित आहेत. न्यायालयांची; तसेच न्यायाधीशांची मर्यादित संख्या आणि वाढते गुन्हे हे प्रमाण फारच व्यस्त झालेले आहे. खून, दरोडा, बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना लवकर जामीन मिळत नाही. त्यांच्यावरील खटले वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. वारंवार जामिनासाठी अर्ज करावे लागतात. त्यासाठी वकील नेमावे लागतात आणि प्रचंड खर्च होतो. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे असे लोक चांगल्यात चांगले वकील नेमून स्वतःची जामिनावर सुटका करून घेतात; परंतु ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही किंवा जे अज्ञानी आहेत त्यांना एक तर वकिलांची फी परवडत नाही आणि पाठपुरावा करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नसते. अशा लोकांना कोणीच वाली नाही की काय, असा प्रश्न पडतो. बऱ्याच वेळा न्यायदानाच्या प्रक्रियेला विलंब होत असल्यामुळे अनेक चौकशीअधीन कैदी त्यांचा काही दोष नसताना विनाकारण तुरुंगात खितपत पडतात.

दारिद्र्य, अज्ञान, निरक्षरता आणि उपेक्षित, दुर्बल घटकांतील कच्च्या कैद्यांची अवस्था तर फारच बिकट आहे. कालांतराने यातील बहुतेक जणांची निर्दोष सुटका होते. त्यांच्यावर होणारा हा फार मोठा अन्याय आहे. सातत्याने होणाऱ्या या अन्यायामुळे सुमारे २३ टक्के कैदी हे मानसिक रुग्ण होण्याच्या काठावर असल्याचे एका पाहणी अहवालात आढळले आहे. त्यांच्या कुटुंबीयांना होणारा त्रास वेगळाच.

यासाठी तुरुंगांची संख्या, अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे, वैद्यकीय मदत पुरवणे, कायदेविषयक मदत करणे, मानसोपचारतज्ज्ञांची मदत मिळवून देणे अशा अनेक बाबींवर काम करावे लागणार आहे.  

टॅग्स :jailतुरुंगPrisonतुरुंग