शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

दाेष नसतानाही हजाराे कैदी तुरुंगात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 11:49 IST

तीन वर्षांपेक्षा अधिक काळ जामीन न मिळालेल्या कैद्यांच्या संदर्भातील आकडेवारी थक्क करणारी आहे. अशा कैद्यांपैकी 27 टक्के कैदी हे अशिक्षित आहेत, तर 41 टक्के कैद्यांचे मॅट्रिकपर्यंतही शिक्षण झालेले नाही. 

संजय मोहिते, निवृत्त, पोलिस अधिकारी -आपल्या देशातील विविध तुरुंगात आजमितीला सुमारे पाच लाख ७५ हजार कैदी तुरुंगांत आहेत. त्यापैकी चार लाख ३५ हजार कच्चे किंवा न्याय चौकशीअधीन कैदी आहेत. म्हणजेच देशातील विविध तुरुंगांमध्ये सुमारे ७५ टक्के कैदी असे आहेत ज्यांच्यावर कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नाही. सुमारे ८५ हजार कैदी हे ज्येष्ठ नागरिक आहेत. बहुतांश तुरुंगांत क्षमतेपेक्षा अधिक, काही ठिकाणी दुप्पट, तर काही ठिकाणी तिप्पट ते चौपट कैदी दाटीवाटीने भरलेले आहेत. असे अंडरट्रायल कैदी दुर्दैवाने अनेक वर्षे तुरुंगात खितपत पडलेले असतात. त्यापैकी बऱ्याच जणांची नंतर खटल्यातून निर्दोष मुक्तताही होते.

संयुक्त राष्ट्र संघाने प्रकाशित केलेली आकडेवारी पाहिली असता, जगभरात सुमारे सव्वा ते दीड कोटी लोक तुरुंगांत आहेत. जवळजवळ १२० देशांमध्ये तुरुंगातील कैद्यांची संख्या ही तुरुंगाच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे. या कैद्यांपैकी सुमारे सात टक्के महिला कैदी आहेत. आपल्या देशातील बहुतांश तुरुंग हे ब्रिटिशकालीन आहेत. तेथे स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांचा अभाव आहे. त्यांना अत्यंत मर्यादित स्वरूपात कोठड्या आहेत.

प्रत्येक राज्याने स्वतंत्र असे प्रिझन मॅन्युअलसुद्धा बनवलेले आहेत. शिक्षा भोगणारे कैदी आणि ज्यांच्यावरील आरोप सिद्ध झालेले नाहीत आणि केवळ संशयावरून तुरुंगात असलेले चौकशीअधीन कैदी यांना स्वतंत्रपणे ठेवणे अपेक्षित आहे; परंतु तुरुंगातील वाढती कैद्यांची संख्या पाहता हे शक्य होत नसावे. काही तुरुंगांमध्ये तर क्षमतेपेक्षा दुप्पट, तिप्पट कैदी आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावरील कैद्यांचे जेवण, त्यांना पुरवण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधा, तेथील स्वच्छता, शौचालये यावर खूप मोठ्या प्रमाणावर ताण पडत आहे.

भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद २१ आणि २२ नुसार मिळालेल्या मूलभूत स्वातंत्र्यावरच गदा येत आहे. कैद्यांनाही काही मूलभूत अधिकार असतात. त्यांना देखील जगण्याचा अधिकार असतो, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी निवाडे दिलेले आहेत. भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद ३९-अ नुसार मोफत विधिसेवा देखील कैद्यांना मिळू शकते. तुरुंगातील सरासरी ३० कैद्यांमागे किमान एक वकील शासनाने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे; परंतु तसे होताना दिसत नाही.

चौकशीअधीन कैद्यांना जामीन देण्याची तरतूद आहे. ज्यांच्यावर गुन्हे सिद्ध झालेले आहेत अशा कैद्यांसाठी पॅरोल/ संचित रजा दिली जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार एखाद्या गुन्ह्यासाठी जेवढी शिक्षा आहे, त्या शिक्षेच्या अर्धा कालावधी जर एखाद्या चौकशीअधीन कैद्याने तुरुंगात व्यतित केला असेल तर त्याला जामीन द्यावा (फक्त काही प्रकरणांतच) असे निर्णय दिलेले आहेत.

तुरुंग किंवा सुधारगृहे हे ‘फौजदारी न्याय यंत्रणेचा’(क्रिमिनल जस्टीस सिस्टीम) अविभाज्य भाग आहेत. तपास यंत्रणा, वकील, न्यायालय आणि तुरुंग यंत्रणा परस्परांवर अवलंबून आहेत. आपल्या देशात लाखोंच्या संख्येने खटले प्रलंबित आहेत. न्यायालयांची; तसेच न्यायाधीशांची मर्यादित संख्या आणि वाढते गुन्हे हे प्रमाण फारच व्यस्त झालेले आहे. खून, दरोडा, बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना लवकर जामीन मिळत नाही. त्यांच्यावरील खटले वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. वारंवार जामिनासाठी अर्ज करावे लागतात. त्यासाठी वकील नेमावे लागतात आणि प्रचंड खर्च होतो. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे असे लोक चांगल्यात चांगले वकील नेमून स्वतःची जामिनावर सुटका करून घेतात; परंतु ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही किंवा जे अज्ञानी आहेत त्यांना एक तर वकिलांची फी परवडत नाही आणि पाठपुरावा करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नसते. अशा लोकांना कोणीच वाली नाही की काय, असा प्रश्न पडतो. बऱ्याच वेळा न्यायदानाच्या प्रक्रियेला विलंब होत असल्यामुळे अनेक चौकशीअधीन कैदी त्यांचा काही दोष नसताना विनाकारण तुरुंगात खितपत पडतात.

दारिद्र्य, अज्ञान, निरक्षरता आणि उपेक्षित, दुर्बल घटकांतील कच्च्या कैद्यांची अवस्था तर फारच बिकट आहे. कालांतराने यातील बहुतेक जणांची निर्दोष सुटका होते. त्यांच्यावर होणारा हा फार मोठा अन्याय आहे. सातत्याने होणाऱ्या या अन्यायामुळे सुमारे २३ टक्के कैदी हे मानसिक रुग्ण होण्याच्या काठावर असल्याचे एका पाहणी अहवालात आढळले आहे. त्यांच्या कुटुंबीयांना होणारा त्रास वेगळाच.

यासाठी तुरुंगांची संख्या, अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे, वैद्यकीय मदत पुरवणे, कायदेविषयक मदत करणे, मानसोपचारतज्ज्ञांची मदत मिळवून देणे अशा अनेक बाबींवर काम करावे लागणार आहे.  

टॅग्स :jailतुरुंगPrisonतुरुंग