शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
6
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
8
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
9
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
10
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
11
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
12
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
13
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
15
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
16
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
17
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
18
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
19
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
20
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!

हजारो परप्रांतीयांचे काश्मीर खोऱ्यातून पलायन; दहशतवाद्यांनी हत्यांचे सत्र अवलंबल्याने घबराट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 7:23 AM

काश्मिरातील साडेतीन लाख परप्रांतीय मजुरांपैकी बुहतेकांनी खोऱ्यातून पळ काढण्यास सुरुवात केली आहे.

- सुरेश डुग्गरजम्मू : दहशतवाद्यांनी हत्यांचे सत्र अवलंबल्याने काश्मिरातील परप्रांतीय मजुरांमध्ये घबराटीचे वातावरण असून अनेकांनी खोऱ्यातून पळ काढण्यास सुरुवात केली आहे. काही मजुरांनी सुरक्षा दलांच्या छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. काश्मीरमध्ये गेल्या आठवड्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हिंसाचारात ११ जणांची हत्या झाली. त्यात पाच परप्रांतीय मजुरांचा समावेश होता. या पार्श्वभूमीवर काश्मिरातील साडेतीन लाख परप्रांतीय मजुरांपैकी बुहतेकांनी खोऱ्यातून पळ काढण्यास सुरुवात केली आहे. त्यापैकी काही जण तर गेल्या १० ते १५ वर्षांपासून काश्मिरात रहात आहेत. ३७० कलम रद्द आणि काश्मीरचे त्रिभाजन या घटनांच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपूर्वी अनेकांनी खोरे सोडले होते. पळून गेलेले हे मजूर गेल्या वर्षीच्या सुरुवातीला परतले होते. कोरोनामुळे त्यांना पुन्हा मूळगावी परतावे लागले. परंतु कामानिमित्त अनेक जण पुन्हा खोऱ्यात आले. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून खोऱ्यात दहशतादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे जिवाच्या आकांताने हे मजूर पलायन करताना दिसत आहे. पर्यटन, शिक्षणाला फटकाअतिरेक्यांनी अलीकडेच दोन शिक्षकांची हत्त्या केली. त्यामुळे शाळा ओस पडल्या आहेत. वाढत्या हल्ल्यांमु‌ळे पर्यटकही खोऱ्याकडे फिरकत नसल्याने या दोन्ही क्षेत्रांना फटका बसला आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर