शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हजारो परप्रांतीयांचे काश्मीर खोऱ्यातून पलायन; दहशतवाद्यांनी हत्यांचे सत्र अवलंबल्याने घबराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 07:24 IST

काश्मिरातील साडेतीन लाख परप्रांतीय मजुरांपैकी बुहतेकांनी खोऱ्यातून पळ काढण्यास सुरुवात केली आहे.

- सुरेश डुग्गरजम्मू : दहशतवाद्यांनी हत्यांचे सत्र अवलंबल्याने काश्मिरातील परप्रांतीय मजुरांमध्ये घबराटीचे वातावरण असून अनेकांनी खोऱ्यातून पळ काढण्यास सुरुवात केली आहे. काही मजुरांनी सुरक्षा दलांच्या छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. काश्मीरमध्ये गेल्या आठवड्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हिंसाचारात ११ जणांची हत्या झाली. त्यात पाच परप्रांतीय मजुरांचा समावेश होता. या पार्श्वभूमीवर काश्मिरातील साडेतीन लाख परप्रांतीय मजुरांपैकी बुहतेकांनी खोऱ्यातून पळ काढण्यास सुरुवात केली आहे. त्यापैकी काही जण तर गेल्या १० ते १५ वर्षांपासून काश्मिरात रहात आहेत. ३७० कलम रद्द आणि काश्मीरचे त्रिभाजन या घटनांच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपूर्वी अनेकांनी खोरे सोडले होते. पळून गेलेले हे मजूर गेल्या वर्षीच्या सुरुवातीला परतले होते. कोरोनामुळे त्यांना पुन्हा मूळगावी परतावे लागले. परंतु कामानिमित्त अनेक जण पुन्हा खोऱ्यात आले. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून खोऱ्यात दहशतादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे जिवाच्या आकांताने हे मजूर पलायन करताना दिसत आहे. पर्यटन, शिक्षणाला फटकाअतिरेक्यांनी अलीकडेच दोन शिक्षकांची हत्त्या केली. त्यामुळे शाळा ओस पडल्या आहेत. वाढत्या हल्ल्यांमु‌ळे पर्यटकही खोऱ्याकडे फिरकत नसल्याने या दोन्ही क्षेत्रांना फटका बसला आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर