शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

Narendra Modi : "ज्या काँग्रेसला आपल्या नेत्यांची गॅरेंटी नाही, ते मोदींच्या गॅरेंटीवर प्रश्न उपस्थित करताहेत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 15:23 IST

Narendra Modi And Congress : नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. य़ासोबतच त्यांनी राहुल गांधींवर देखील निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. य़ासोबतच त्यांनी राहुल गांधींवर देखील निशाणा साधला आहे. "ज्या काँग्रेसला आपल्या नेत्यांची गॅरेंटी नाही, ते मोदींच्या गॅरेंटीवर प्रश्न उपस्थित करताहेत" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. "10 वर्षांत काँग्रेसने देशाला 11व्या क्रमांकावर आणलं आहे. आम्ही 10 वर्षांत पाचव्या क्रमांकावर आणलं. ही काँग्रेस आपल्याला आर्थिक धोरणांवर भाषण देत आहे."

"ज्यांनी सर्वसामान्य प्रवर्गातील गरिबांना कधीही आरक्षण दिलं नाही. ज्यांनी बाबासाहेबांना भारतरत्न दिला नाही, ज्यांनी देशातील रस्त्यांना आणि चौकाचौकांना आपल्याच कुटुंबाची नावं दिली, तेच आपल्याला सामाजिक न्यायावर भाषण देत आहे. ज्या काँग्रेसला आपल्या नेत्याची गॅरेंटी नाही, आपल्या धोरणाची गॅरेंटी नाही. ते मोदींच्या गॅरेंटीवर प्रश्न उपस्थित करत आहेत" असं म्हणत पंतप्रधान मोदींनी निशाणा साधला आहे. 

"जुन्या सभागृहात देशाच्या पंतप्रधानांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. तुम्ही माझा आवाज दाबू शकत नाही. या आवाजाला देशातील जनतेने बळ दिलं आहे. यावेळी मी पूर्ण तयारीनिशी आलो आहे" असं मोदींनी म्हटलं आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत उत्तर दिलं.

"मी केवळ प्रार्थना करू शकतो. पश्चिम बंगालमधून आव्हान देण्यात आले आहे की, यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस 40 जागाही जिंकू शकणार नाही. मात्र, मी प्रार्थना करतो की काँग्रेसने आपल्या 40 जागा तरी वाचवाव्यात" असा उपरोधिक टोला पंतप्रधान मोदी यांनी लगावला. 

"ज्या गोष्टी देशात घडत आहेत, ते जनतेला समजले पाहिजे. काँग्रेस पक्ष विचारांनीही कालबाह्य झालेला आहे. त्यामुळे कामकाजही आऊटसोर्सिंग करण्यात आले आहे. इतकी दशके देशावर राज्य करणारा पक्ष, एवढा मोठा पक्ष, याचे अशा प्रकारे पतन झाले आहे. याचा आम्हाला कदापि आनंद नाही. काँग्रेस पक्षासोबत आमच्या संवेदना आहेत" अशी खरमरीत टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी