शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

"देश चालवण्याचा हा मार्ग नाही; आपण हळू हळू हुकूमशाहीकडे जातोय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 17:38 IST

आता, काँग्रेसनेही विशेष अधिवेशनावरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. 

मुंबई - केंद्र सरकारकडून संसदेचे ५ दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेष म्हणजे, १८ ते २२ सप्टेंबर या काळात केंद्र सरकारने संसदेचे हे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात ५ सत्र होणार आहेत. त्यावरुन आता विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. मोदी सरकारचं हे काम हिंदुविरोधी काम असल्याचं शिवसेनेनं म्हटलंय. आता, काँग्रेसनेही विशेष अधिवेशनावरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. 

मुंबईत इंडिया आघाडीची बैठक होत असून या बैठकीवेळी माध्यमांशी बोलताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. तसेच, सरकारच्या ५ दिवसीय विशेष अधिवेशानवरही त्यांनी कडक शब्दात टीका केली.

केंद्रातील मोदी सरकारने विरोधी पक्षाला विचारात घेतलं नाही, बिझनेस अॅडव्हाजरी समितीलाही विचारलं नाही. कुणालाही न विचारता संसदेच्या विशेष अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली. मणीपूर जळत असताना, कोरोना काळात, चीन आपल्या जमिनीवर घुसकोरी करत असातनाही विशेष अधिवेशन बोलावलं नाही. नोटबंदीवेळी नाही, कोरोनात लोकांचे होत असलेल्या स्थलांतरावेळीही त्यांनी विशेष अधिवेशन बोलावलं नाही. मात्र, आता अचानक हे विशेष अधिवेशन बोलावलं आहे, असे म्हणत मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदी सरकारच्या धोरणावर टीका केली. तसेच, सरकारचा नेमका अजेंडा काय आहे हे मला माहिती नाही. देश चालवण्याचा हा मार्ग नाही, आपण हळू हळू हुकूमशाहीकडे वाटचाल करतोय, असे म्हणत खर्गे यांनी मोदी सरकारवर जोरदार प्रहार केला. 

दरम्यान, केंद्र सरकारने बोलावलेल्या विशेष अधिवेशनात सरकार एक देश, एक निवडणूक विधेयक आणू शकते अशी माहिती राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच, गेल्या अनेक वर्षांपासून वन नेशन वन इलेक्शन यावर चर्चा सुरू आहे. सरकार हे विधेयक मंजूर करण्याच्या मानसिकतेत आहे, तर राजकीय पक्ष त्याचा विरोध करत आहेत. त्यामुळे, आता मोदी सरकारच्या विशेष अधिवेशनावरुन चर्चा होत आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत विरोधकांच्या २८ पक्षांचे नेते आले आहेत. त्यातच, हे वृत्त झळकल्याने अनेक खासदारांनी व पक्षांनी आक्रमक भूमिका घेत याला विरोध केलाय. 

शिवसेनेनंही साधला निशाणा

केंद्र सरकार आणि संसदीय कामकाज मंत्र्यांनी याबाबत माहिती द्यायला हवी. विशेष अधिवेशनासाठी हीच तारीख का ठरवण्यात आली आहे?, असा सवालही प्रियंका चतुर्वेदींनी विचारला आहे. आता, हिवाळी अधिवेशन होत असताना मध्येच हे विशेष अधिवेशन का बोलावण्यात आले आहे. बिहारमध्ये दिवाळीच्या सुट्ट्या कमी करण्यात आल्या होत्या. त्यावेळी, भाजपने मोठा गदारोळ घातला होता. आता, याच भाजप सरकारने हे हिंदुविरोध काम का केलंय, असा सवालही प्रियंका चतुर्वेदी यांनी विचारला आहे.