शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

"देश चालवण्याचा हा मार्ग नाही; आपण हळू हळू हुकूमशाहीकडे जातोय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 17:38 IST

आता, काँग्रेसनेही विशेष अधिवेशनावरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. 

मुंबई - केंद्र सरकारकडून संसदेचे ५ दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेष म्हणजे, १८ ते २२ सप्टेंबर या काळात केंद्र सरकारने संसदेचे हे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात ५ सत्र होणार आहेत. त्यावरुन आता विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. मोदी सरकारचं हे काम हिंदुविरोधी काम असल्याचं शिवसेनेनं म्हटलंय. आता, काँग्रेसनेही विशेष अधिवेशनावरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. 

मुंबईत इंडिया आघाडीची बैठक होत असून या बैठकीवेळी माध्यमांशी बोलताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. तसेच, सरकारच्या ५ दिवसीय विशेष अधिवेशानवरही त्यांनी कडक शब्दात टीका केली.

केंद्रातील मोदी सरकारने विरोधी पक्षाला विचारात घेतलं नाही, बिझनेस अॅडव्हाजरी समितीलाही विचारलं नाही. कुणालाही न विचारता संसदेच्या विशेष अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली. मणीपूर जळत असताना, कोरोना काळात, चीन आपल्या जमिनीवर घुसकोरी करत असातनाही विशेष अधिवेशन बोलावलं नाही. नोटबंदीवेळी नाही, कोरोनात लोकांचे होत असलेल्या स्थलांतरावेळीही त्यांनी विशेष अधिवेशन बोलावलं नाही. मात्र, आता अचानक हे विशेष अधिवेशन बोलावलं आहे, असे म्हणत मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदी सरकारच्या धोरणावर टीका केली. तसेच, सरकारचा नेमका अजेंडा काय आहे हे मला माहिती नाही. देश चालवण्याचा हा मार्ग नाही, आपण हळू हळू हुकूमशाहीकडे वाटचाल करतोय, असे म्हणत खर्गे यांनी मोदी सरकारवर जोरदार प्रहार केला. 

दरम्यान, केंद्र सरकारने बोलावलेल्या विशेष अधिवेशनात सरकार एक देश, एक निवडणूक विधेयक आणू शकते अशी माहिती राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच, गेल्या अनेक वर्षांपासून वन नेशन वन इलेक्शन यावर चर्चा सुरू आहे. सरकार हे विधेयक मंजूर करण्याच्या मानसिकतेत आहे, तर राजकीय पक्ष त्याचा विरोध करत आहेत. त्यामुळे, आता मोदी सरकारच्या विशेष अधिवेशनावरुन चर्चा होत आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत विरोधकांच्या २८ पक्षांचे नेते आले आहेत. त्यातच, हे वृत्त झळकल्याने अनेक खासदारांनी व पक्षांनी आक्रमक भूमिका घेत याला विरोध केलाय. 

शिवसेनेनंही साधला निशाणा

केंद्र सरकार आणि संसदीय कामकाज मंत्र्यांनी याबाबत माहिती द्यायला हवी. विशेष अधिवेशनासाठी हीच तारीख का ठरवण्यात आली आहे?, असा सवालही प्रियंका चतुर्वेदींनी विचारला आहे. आता, हिवाळी अधिवेशन होत असताना मध्येच हे विशेष अधिवेशन का बोलावण्यात आले आहे. बिहारमध्ये दिवाळीच्या सुट्ट्या कमी करण्यात आल्या होत्या. त्यावेळी, भाजपने मोठा गदारोळ घातला होता. आता, याच भाजप सरकारने हे हिंदुविरोध काम का केलंय, असा सवालही प्रियंका चतुर्वेदी यांनी विचारला आहे.