शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

'ही तर हुकूमशाहीच; संसदेवर सरकारचा बुलडोझर चालतोय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 05:53 IST

खासदारांच्या निलंबनावरून विरोधी पक्षांचे केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लोकसभेतील ३३ आणि राज्यसभेतील ४५ विरोधी सदस्यांचे सोमवारी केलेले निलंबन ही ‘हुकूमशाही’ चाल असून, सरकार विरोधकांना चिरडण्यासाठी संसदेवर बुलडोझर चालवत असल्याचे घणाघाती टीकास्त्र ‘इंडिया’ या  विरोधी आघाडीतील घटक पक्षांनी केंद्र सरकारवर सोडले.काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांच्यासह ३३ सदस्यांना सोमवारी  अवमान केल्याच्या आरोपावरून सभागृहातून निलंबित करण्यात आले. त्यापैकी ३० सदस्यांना चालू हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले  आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, प्रथम घुसखोरांनी संसदेवर हल्ला केला. त्यानंतर केंद्र सरकार संसदेवर आणि लोकशाहीवर हल्ला करत आहे. ४७ खासदारांना निलंबित करून निरंकुश केंद्र सरकारकडून सर्व लोकशाही नियम कचऱ्यात टाकले जात आहेत. विरोधाशिवाय संसदेत केंद्र सरकार आता विरोधकांचा आवाज दाबून, कोणत्याही चर्चेशिवाय महत्त्वाचे प्रलंबित कायदे मंजूर करू शकते, असे खरगे म्हणाले.

‘हा तर सन्मान’ सरकारचा प्रयत्न आहे की, विरोधी पक्षांतील जास्तीत जास्त लोकांना निलंबित करून विधेयक मंजूर करा, असे निलंबित खासदार आणि जनता दल (युनायटेड) नेते कौशलेंद्र कुमार म्हणाले. तर राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोज झा म्हणाले की, ‘लोकशाहीच्या या अंधारात निलंबन ही सन्मानाची बाब आहे. जे सरकार संसद भवनातील सुरक्षेतील त्रुटींच्या मुद्द्यावर बोलू शकत नाही, ते गलवानवर काय बोलणार?’ उर्वरित खासदारांनाही निलंबित करा...विरोधकमुक्त संसदेबद्दल अभिनंदन, केंद्र सरकार, असे त्यांनी म्हटले आहे.

१३ डिसेंबर रोजी झालेल्या धोकादायक हल्ल्यानंतर विरोधक गृहमंत्र्यांकडून निवेदनाची मागणी करत होते. त्यामुळे सुरुवातीला १३ खासदारांना निलंबित करण्यात आले. आता इंडिया आघाडीच्या ३३ आणखी खासदारांना निलंबित करण्यात आले. यात अनेक पक्षांचे सभागृह नेतेही आहेत. हे केवळ खासदारांचे निलंबन नाही तर लोकशाहीचे आहे.-जयराम रमेश,  सरचिटणीस, काँग्रेस

हे एक हुकूमशाही पाऊल आहे. आम्ही हुकूमशाहीविरुद्ध लढू.-प्रियांका चतुर्वेदी, खासदार, शिवसेना

संसदेतील विरोधी सदस्यांचे निलंबन म्हणजे लोकांचा आवाज दाबणे आहे. खासदारांवरील कारवाई ही लोकशाहीची चेष्टा आहे. ते घाबरले असल्याने त्यांनी एवढ्या खासदारांना निलंबित केले. त्यांनी दोन राज्ये जिंकली म्हणून ते इतके अहंकारी झालेत का? -ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल काँग्रेस आणि मित्रपक्षांनी लोकसभा अध्यक्ष, राज्यसभेचे सभापती यांचा अपमान करून त्यांच्या वर्तनाने देशाला लाजीरवाणे केले. विरोधी सदस्यांनी सदनात फलक आणले. सभागृहात फलक घेऊन येण्याची परवानगी नसल्याचा निर्णय घेऊनही जाणूनबुजून संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणला.-पीयूष गोयल, भाजप सभागृह नेते, राज्यसभा

 या सरकारमध्ये हुकूमशाही शिगेला पोहोचली आहे. आम्हाला चर्चा करायची होती. मात्र, बहुमताच्या ताकदीच्या जोरावर सर्वांना शांत केले जाईरू, असे सरकारला वाटत आहे.-अधीर रंजन चौधरी, खासदार

टॅग्स :lok sabhaलोकसभाParliamentसंसद