शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

'ही तर हुकूमशाहीच; संसदेवर सरकारचा बुलडोझर चालतोय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 05:53 IST

खासदारांच्या निलंबनावरून विरोधी पक्षांचे केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लोकसभेतील ३३ आणि राज्यसभेतील ४५ विरोधी सदस्यांचे सोमवारी केलेले निलंबन ही ‘हुकूमशाही’ चाल असून, सरकार विरोधकांना चिरडण्यासाठी संसदेवर बुलडोझर चालवत असल्याचे घणाघाती टीकास्त्र ‘इंडिया’ या  विरोधी आघाडीतील घटक पक्षांनी केंद्र सरकारवर सोडले.काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांच्यासह ३३ सदस्यांना सोमवारी  अवमान केल्याच्या आरोपावरून सभागृहातून निलंबित करण्यात आले. त्यापैकी ३० सदस्यांना चालू हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले  आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, प्रथम घुसखोरांनी संसदेवर हल्ला केला. त्यानंतर केंद्र सरकार संसदेवर आणि लोकशाहीवर हल्ला करत आहे. ४७ खासदारांना निलंबित करून निरंकुश केंद्र सरकारकडून सर्व लोकशाही नियम कचऱ्यात टाकले जात आहेत. विरोधाशिवाय संसदेत केंद्र सरकार आता विरोधकांचा आवाज दाबून, कोणत्याही चर्चेशिवाय महत्त्वाचे प्रलंबित कायदे मंजूर करू शकते, असे खरगे म्हणाले.

‘हा तर सन्मान’ सरकारचा प्रयत्न आहे की, विरोधी पक्षांतील जास्तीत जास्त लोकांना निलंबित करून विधेयक मंजूर करा, असे निलंबित खासदार आणि जनता दल (युनायटेड) नेते कौशलेंद्र कुमार म्हणाले. तर राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोज झा म्हणाले की, ‘लोकशाहीच्या या अंधारात निलंबन ही सन्मानाची बाब आहे. जे सरकार संसद भवनातील सुरक्षेतील त्रुटींच्या मुद्द्यावर बोलू शकत नाही, ते गलवानवर काय बोलणार?’ उर्वरित खासदारांनाही निलंबित करा...विरोधकमुक्त संसदेबद्दल अभिनंदन, केंद्र सरकार, असे त्यांनी म्हटले आहे.

१३ डिसेंबर रोजी झालेल्या धोकादायक हल्ल्यानंतर विरोधक गृहमंत्र्यांकडून निवेदनाची मागणी करत होते. त्यामुळे सुरुवातीला १३ खासदारांना निलंबित करण्यात आले. आता इंडिया आघाडीच्या ३३ आणखी खासदारांना निलंबित करण्यात आले. यात अनेक पक्षांचे सभागृह नेतेही आहेत. हे केवळ खासदारांचे निलंबन नाही तर लोकशाहीचे आहे.-जयराम रमेश,  सरचिटणीस, काँग्रेस

हे एक हुकूमशाही पाऊल आहे. आम्ही हुकूमशाहीविरुद्ध लढू.-प्रियांका चतुर्वेदी, खासदार, शिवसेना

संसदेतील विरोधी सदस्यांचे निलंबन म्हणजे लोकांचा आवाज दाबणे आहे. खासदारांवरील कारवाई ही लोकशाहीची चेष्टा आहे. ते घाबरले असल्याने त्यांनी एवढ्या खासदारांना निलंबित केले. त्यांनी दोन राज्ये जिंकली म्हणून ते इतके अहंकारी झालेत का? -ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल काँग्रेस आणि मित्रपक्षांनी लोकसभा अध्यक्ष, राज्यसभेचे सभापती यांचा अपमान करून त्यांच्या वर्तनाने देशाला लाजीरवाणे केले. विरोधी सदस्यांनी सदनात फलक आणले. सभागृहात फलक घेऊन येण्याची परवानगी नसल्याचा निर्णय घेऊनही जाणूनबुजून संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणला.-पीयूष गोयल, भाजप सभागृह नेते, राज्यसभा

 या सरकारमध्ये हुकूमशाही शिगेला पोहोचली आहे. आम्हाला चर्चा करायची होती. मात्र, बहुमताच्या ताकदीच्या जोरावर सर्वांना शांत केले जाईरू, असे सरकारला वाटत आहे.-अधीर रंजन चौधरी, खासदार

टॅग्स :lok sabhaलोकसभाParliamentसंसद