शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
2
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
3
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
4
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
5
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
6
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
7
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
8
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
9
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
10
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना
11
Share Market Today: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २७० अंकांनी वधारला; Nifty २४,९४२ च्या पार, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
12
VIDEO: भारताला विजयी केल्यावर जेमिमा रॉड्रिग्जची वडिलांना घट्ट मिठी, बाप-लेकीला भावना अनावर
13
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
14
मंदिरातून झाली 'मदिरा दान'ची घोषणा! आज सकाळपासूनच देशी दारूचा ठेक्यावर उसळली गर्दी, १० ची दिली होती वेळ...
15
₹५ लाखांचं बनतील ₹५० कोटी; ५ स्टेप फॉर्म्युला जो तुम्हाला देईल फायनान्शिअल फ्रीडम आणि अनस्टॉबेल ग्रोथ
16
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
17
Sushant Singh Rajput : सुशांत सिंह राजपूतची हत्या? बहीण श्वेता कीर्तीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, "२ लोकांनी..."
18
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
19
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
20
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड

याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 20:35 IST

पंतप्रधान मोदींचे विमान ज्यावेळी इम्फाळ विमानतळावर उतरले, तेव्हा तेथे मुसळधार पाऊस सुरू होता. हवामान एवढे खराब होते की, चुडाचांदपूरचे हेलिकॉप्टर उड्डाण रद्द करावे लागले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मणिपूरला पोहोचले. यावेळी, पुन्हा एकदा त्यांचा दृढनिश्चयाची झलक दिसून आली. खरे तर, पंतप्रधान मोदींचे विमान ज्यावेळी इम्फाळ विमानतळावर उतरले, तेव्हा तेथे मुसळधार पाऊस सुरू होता. हवामान एवढे खराब होते की, चुडाचांदपूरचे हेलिकॉप्टर उड्डाण रद्द करावे लागले. यानंतर, पंतप्रधानांनी रस्ते मार्गाने चुराचांदपूरला जाण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान मोदी म्हणाले, "मला लोकांना भेटायचे आहे, त्यांच्याशी बोलायचे आहे. यात हवामान अडथळा ठरू शकत नाही." इम्फाळ ते चुडाचांदपूर हे रस्ते मार्गाचे अंतर सुमारे दीड तासाचे आहे.खरेतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी शनिवारी राज्यात मुसळधार पाऊस झाला. इंफाळमधील कांगला किल्ल्याच्या काही भागांत गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते. चुराचांदपूर शहरातही मुसळधार पाऊस पडला. तथापि, पंतप्रधान वेळापत्रकानुसार लोकांना भेटण्यासाठी पोहोचले. पंतप्रधानांनी चुडाचांदपूर येथील शांतता मैदानावर अंतर्गत विस्थापितांची भेट घेतली. मे २०२३ मध्ये वांशिक हिंसाचार सुरू झाल्यानंतर राज्याच्या पहिल्या भेटीत कुकीबहुल चुडाचांदपूर जिल्ह्यातील एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, केंद्र सरकारच्या शांततेसाठीच्या सततच्या प्रयत्नांमुळे दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली.

मणिपूर ही धैर्य आणि शौर्याची भूमी आहे, असे वर्णन करत पंतप्रधान म्हणाले, इंफाळहून रस्त्याने चुडाचांदपूरला येताना मिळालेले प्रेम आपण कधीही विसरू शकत नाहीत. मी विस्थापित लोकांशी बोललो, मी म्हणू शकतो की,  मणिपूर एका नव्या सूर्योदयाकडे बघत आहे. लोकांनी शांतीचा मार्ग निवडला आहे. येथे हिंसाचार झाला हे दुर्दैव. आज, मी तुम्हाला वचन देऊ इच्छितो की, भारत सरकार तुमच्यासोबत आहे आणि मीही तुमच्यासोबत आहे.

मोदी म्हणाले, मी सर्व गटांना आणि संघटनांना शांततेचा मार्ग निवडण्याचे आवाहन करतो. विकासासाठी शांतता सर्वात महत्त्वाची आहे आणि केंद्र सरकार ती साध्य करण्यासाठी वचनबद्ध आहे. केंद्र सरकारने राज्यातील रेल्वे आणि रस्ते कनेक्टिव्हिटी प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पीय तरतूद वाढवली आहे. मोदी म्हणाले, २०१४ पासून मी मणिपूरमध्ये कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर विशेष भर दिला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीManipur Violenceमणिपूर हिंसाचारBJPभाजपा