शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
3
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
4
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
6
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
7
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
8
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
9
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
10
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
11
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
12
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
13
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
14
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
15
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
16
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
17
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
18
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
19
"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
20
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
Daily Top 2Weekly Top 5

‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 16:22 IST

'इतक्या घाईघाईत केलेल्या या दौऱ्यातून काय साध्य होणार आहे?'

Congress on Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १३ सप्टेंबर रोजी मणिपूरचा दौरा करणार आहेत. राज्यातील हिंसाचार सुरू झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच दौरा आहे. यावर सर्व राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसने या दौऱ्यावरुन सरकारवर बोचरी टीका केली. काँग्रेसने म्हटले की, '२९ महिन्यांनंतर पंतप्रधान मणिपूरला जात आहेत, पण फक्त ३ तास ​​तिथे घालवणार! हा मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे.'

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावर टीका करताना म्हटले की, '१३ सप्टेंबर रोजी पंतप्रधानांच्या प्रस्तावित मणिपूर दौऱ्याचे त्यांच्या समर्थकांकडून स्वागत केले जात आहे, परंतु ते राज्यात फक्त ३ तास ​​घालवणार आहेत. इतक्या घाईघाईत केलेल्या या दौऱ्यातून काय साध्य होणार आहे? हा राज्यातील लोकांचा अपमान आहे. त्यांनी २९ वेदनादायक महिने पंतप्रधानांची वाट पाहिली आहे. यामुळे मणिपूरच्या लोकांबद्दल त्यांची उदासीनता आणि असंवेदनशीलता दिसून येईल,' अशी बोचरी टीका जयराम रमेश यांनी केली.

आता पर्यटनाची वेळ आली आहे, म्हणून...काँग्रेस व्यतिरिक्त शिवसेना (उबाठा) नेते खासदार संजय राऊत यांनीदेखील पीएम मोदींच्या दौऱ्यावर टीका केली. ते म्हणाले, 'जर ते मणिपूरला जात असतील, तर त्यात मोठी गोष्ट काय? ते पंतप्रधान आहेत, ते दोन-तीन वर्षांनी तिथे जात आहेत. जेव्हा मणिपूर जळत होते, हिंसाचार भडकला होता, तेव्हा त्यांना जाण्याची हिंमत झाली नाही. आता मोदींनी पंतप्रधानपद सोडण्याची वेळ आली आहे, म्हणून ते पर्यटनासाठी तिथे जात आहेत.'

हिंसाचारात २६० हून अधिक लोकांचा मृत्यूमणिपूरमध्ये हिंसाचाराला २९ महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. इतक्या दिवसांनंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच दौरा आहे. येथील मेईतेई आणि कुकी समुदायांमधील संघर्षात २६० हून अधिक लोक मारले गेले आहेत अन् हजारो लोक बेघर झाले आहेत. मेईतेई समुदायाला अनुसूचित जमाती (एसटी) दर्जा देण्याच्या मागणीने या संघर्षाला खतपाणी घातले होते. ज्याला कुकी आणि इतर आदिवासी समुदाय विरोध करतात.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीManipur Violenceमणिपूर हिंसाचार