शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

हा इंडिया आघाडीचा अत्यंत महत्त्वाचा विजय; भाजपला पराभूत करता येते : केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 05:55 IST

एकप्रकारे आम्ही हा विजय भाजपकडून हिसकावून आणला आहे; पण आम्ही हार मानली नाही आणि शेवटपर्यंत संघर्ष करीत आणि लढत राहिलो आणि अंतिमतः आमचा विजय झाला, असे केजरीवाल म्हणाले.

नवी दिल्ली : भाजपला ऐक्याने, चांगले नियोजन, रणनीती आणि मेहनतीने पराभूत करता येते, असा देशाला मोठा संकेत चंडीगडच्या महापौर निवडणुकीतील ‘इंडिया’ आघाडीच्या पहिल्या आणि अतिशय महत्त्वाच्या विजयाने दिला असल्याची प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी व्यक्त केली.

एकप्रकारे आम्ही हा विजय भाजपकडून हिसकावून आणला आहे; पण आम्ही हार मानली नाही आणि शेवटपर्यंत संघर्ष करीत आणि लढत राहिलो आणि अंतिमतः आमचा विजय झाला, असे केजरीवाल म्हणाले.

आज ’ते’ अतिशय आत्मविश्वासाने लोकसभेच्या ३७० जागा जिंकण्याचा दावा करताना आम्हाला तुमच्या मतांची गरज नाही, असे जनतेला आव्हानच देत आहेत. हा आत्मविश्वास कुठून येतो? काहीतरी गडबड करून ठेवली असणार त्यांनी, अशी शंका केजरीवाल यांनी व्यक्त केली.

दरम्यान, लोकशाहीच्या हत्येचा भाजपने कट रचला असून चंडीगड महापौरपदाच्या निवडणुकीतील निवडणूक अधिकारी असलेला अनिल मसिह हा एक प्यादे आहे. या कटामागे असलेला चेहरा वेगळाच आहे. असे काॅंग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले.

हा प्रकार विद्यमान सत्ताधाऱ्यांनी रचलेल्या कटाच्या हिमनगाचे एक टोक आहे. संविधानावर होणाऱ्या हल्ल्यांचा सर्व भारतीयांनी एकजुटीने मुकाबला केला पाहिजे. २०२४च्या लोकसभा निवडणुकांत देशातील लोकशाहीची धिंडवडे निघण्याचा धोका आहे.

- मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस

अखेर सत्याचाच विजय झाला. निवडणुकीत गैरप्रकार करणाऱ्या भाजपला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे सणसणीत चपराक बसली आहे. लोकशाहीच्या झालेल्या विजयाबद्दल मी चंडीगडच्या नागरिकांचे

अभिनंदन करतो.

- भगवंत मान, पंजाबचे मुख्यमंत्री

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवाल