शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

'केरळमधील महापूर म्हणजे ४४ नद्यांचे कोंडलेले अश्रू'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 06:55 IST

जलमित्र राजेंद्रसिंह यांनी दिला होता इशारा

नवी दिल्ली : प्रत्येक नदीचा स्वत:चा स्वभाव असतो. नद्यांचे प्रवाह अडवणारी बांधकामे, नद्या दूषित करणारे कारखाने व अतिक्रमणे जो हटवली जात नाहीत, तिथे कॉन्झर्वेशन झोन तयार केला जात नाही, तोपर्यंत केरळच्या महापुरासारख्या आपत्ती वारंवार येतच रहातील... हे उद्गार आहेत राजस्थानात ‘जल क्रांती’ चा यशस्वी प्रयोग राबवणारे जलमित्र राजेंद्रसिंह यांचे.देशात मृत नद्यांना पुनरूज्जीवित करणारा प्रयोग यशस्वीरित्या राबवल्याबद्दल राजेंद्रसिंगांना रॅमन मॅगेसेसे पुरस्काराने व स्टॉकहोमच्या पाणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राजेंद्रसिंग म्हणाले की, केरळातला महापूर म्हणजे राज्यातल्या ४४ नद्यांचे कोंडलेले अश्रू आहेत. केरळ सरकारने २0१५ साली मला मृतप्राय नद्यांसाठी खास योजना बनवण्यासाठी निमंत्रित केले होते. केरळचे मंत्री व अधिकारी यांच्यासह बैठक झाली. नद्यांचे पुनरूज्जीवन, पूरस्थितीला रोखणे व अन्य मुद्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. नद्यांना वाचवण्यासाठी खास विधेयक तयार करण्याचे ठरले. त्यासाठी केरळ सरकारने माझे मत मागवले. त्यावेळी नद्यांच्या जलमार्गातले अडथळे, अतिक्रमणे व प्रदूषण दूर करण्याचा आग्रह मी धरला व त्याची सविस्तर यादीही केरळ सरकारकडे सोपवली. आज केरळातील महापूर पहाताना या साऱ्या सूचनांचा तिथल्या सरकारला विसर पडला असावा असे वाटते. नदीच्या मार्गातील अतिक्रमणे वेळीच हटवली नाही तर त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतील, याची जाणीव तेव्हाच मी केरळ सरकारला करून दिली होती.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूर