शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

तिसरी लाट टाळता येईल, वैज्ञानिक सल्लागार राघवन यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 06:27 IST

वैज्ञानिक सल्लागार राघवन; लसीकरण व नियमांचे पालन गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोनाविषयक नियमांची त्रिसूत्री, मोठ्या प्रमाणावर लसीकरण आण‍ि योग्य काळजी घेतल्यास तिसरी लाट कदाचित येणारही नाही, असे मत केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन त्यांनी व्यक्त केले आहे. राघवन यांनी तिसऱ्या लाटेबाबत मार्गदर्शक भूमिका मांडून तिसऱ्या लाटेबाबतची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे.

कोरोनाची तिसरी लाट कशी रोखता येईल, याबाबत राघवन यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, संसर्ग रोखण्यासाठी योग्य काळजी घेतल्यास कोरोनाची तिसरी लाट कदाचित देशात सर्वत्र एकाच वेळी येणार नाही. कदाचित  येणारही नाही. देशभरात महामारीचे वेगवेगळे परमोच्च बिंदू आणि घट असते. संसर्गाची लाट आणि त्याबाबतच्या आकडेवारीवर बोलण्यापेक्षा वेळ, स्थान आणि तीव्रतेवर चर्चा करणे अधिक फायद्याचे ठरेल. महामारीची लाट हा सर्रास वापरला जाणारा शब्द आहे. आपण संसर्ग रोखण्यासाठी कठोर उपाययोजना केल्यास तिसरी लाट कदाचित येणार नाही. चाचणी, उपचार आण‍ि प्रतिबंध या त्रिसूत्रीचे पालन केल्यास छुपे व लक्षणे नसलेल्यांपासून होणारा संसर्ग रोखता येऊ शकतो, असे राघवन म्हणाले. 

विषाणूला अजिबात संधी देऊ नकाविषाणूला संधी मिळाली की, संसर्गाचे प्रमाण वाढते. मोठ्या प्रमाणावर लसीकरण, तसेच सोशल डिस्टन्सिंग व इतर नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास विषाणूला संधी मिळत नाही. मात्र, संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याचे पाहून महामारी संपली, असा विचार करणे चुकीचे ठरेल.    - के. विजय राघवन,     प्रमुख वैज्ञानिक सल्लागार,     केंद्र सरकार    

काय म्हणाले राघवन?

n सद्यस्थ‍ितीत होत असलेल्या विषाणूचा संसर्ग पाहता, कोरोनाची तिसरी लाट अटळ असल्याचा इशारा राघवन यांनी दिला होता. n ही तिसरी लाट कधी आणि किती काळ असेल, हे सांगणे कठीण आहे. मात्र, त्यासाठी आपण तयार राहायला हवे, असे ते म्हणाले होते. n संसर्गासोबत लोकांमध्ये रोगप्रतिकार शक्तीही वाढली. याच्या एकत्रित परिणामामुळे पहिली लाट रोखण्यात यश आले होते. n महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगडसह काही राज्यांमध्ये कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या घटताना दिसत आहे. n या राज्यांमध्ये २७ ते ३० एप्रिल या कालावधीत परमोच्च बिंदू गाठून  कोरोनाची लाट ओसरण्यास सुरुवात होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. n भारतात दुसरी लाट ओसरण्यास १५ मेनंतर सुरुवात होईल, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

इशाऱ्यानंतर वाढली होती सगळ्यांचीच चिंताराघवन यांनी दोन दिवसांपूर्वी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला होता. त्यामुळे सर्वांची चिंता वाढली होती. दुसऱ्या लाटेतच कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे अनेक राज्यांनी लॉकडाऊन लावला आहे, तसेच केंद्र सरकारवर देशव्यापी लॉकडाऊन लावण्यासाठीही दबाव वाढत आहे.

‘स्पुतनिक लाइट’ला रशियाची मंजुरीरशियाने स्पुतनिक लाइट ही नवी कोरोना लस बनविली असून तिच्या आपत्कालीन वापरास पुतीन सरकारने मान्यता दिली. स्पुतनिक लाइट लस एका डोसची असून ती ८० टक्के प्रभावी असल्याचा दावा रशियाने केला आहे. रशियाने याआधी बनविलेली स्पुतनिक व्ही लस भारतातील लसीकरण मोहिमेमध्ये आता वापरण्यात येणार आहे. जगभरात सध्या वापरात असलेल्या कोरोना लसींपैकी बहुतांश लसी दोन डोसच्या आहे. स्पुतनिक लाइट ही लस स्पुतनिक व्हीपेक्षा जास्त प्रभावी आहे.     

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसscienceविज्ञान