शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
3
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
4
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
5
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
6
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
7
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
8
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
9
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
10
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
11
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
12
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
13
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
14
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
15
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
16
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
17
'हीरामंडी'मधील या अभिनेत्रीला आला होता कास्टिंग काउचचा अनुभव, म्हणाली...
18
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
19
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठी, रायबरेलीतील उमेदवारांबाबत काय म्हणाल्या मनेका गांधी?
20
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी

'...तर येत्या काळात तिसरा सर्जिकल स्ट्राइकदेखील होऊ शकतो'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 5:19 AM

पर्रिकरांनी दाखवलेल्या इच्छाशक्तीचं  निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांच्याकडून कौतुक

पुणे: उरीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी प्रबळ इच्छाशक्ती दाखवली. त्यामुळेच सैन्याला पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक करता आला, असं मत निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी व्यक्त केलं आहे. राजकीय इच्छाशक्ती असल्यास अशा प्रकारच्या धाडसी मोहिमा पूर्ण केल्या जाऊ शकतात. येत्या काळात तिसरा सर्जिकल स्ट्राइकदेखील होऊ शकतो, असं ते पुढे म्हणाले. उरी हल्ल्याचा बदला म्हणून २९ सप्टेंबरला भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. यावर निंभोरकर यांनी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात भाष्य केलं. मनोहर पर्रिकर आणखी ४-५ वर्षे संरक्षणमंत्री राहिले असते, तर देशाच्या संरक्षण विभागाचं सामर्थ्य आणखी वाढलं असतं, असं निंभोरकर म्हणाले. 'पर्रिकर यांनी अवघ्या १५ दिवसांत जवानांसाठी १६ हजार कोटींची संरक्षण सामुग्री खरेदी करण्यास मंजुरी दिली. त्यामुळे आपलं सामर्थ्य ८० टक्क्यांपर्यंत वाढलं,' असं निंभोरकर यांनी सांगितलं. पर्रिकर यांनी सर्जिकल स्ट्राइक करण्यासाठी आवश्यक असलेली इच्छाशक्ती दाखवली. मुंबईवरील २६/११ हल्ल्यानंतरदेखील आपलं सैन्यदल कारवाईस सज्ज होतं. मात्र त्यावेळी राजकीय इच्छाशक्ती कमी पडली, असं ते म्हणाले.  उरी हल्ल्यानंतर तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मला फोन करुन सर्जिकल स्ट्राइकबद्दल विचारणा केली होती. आपली तयारी असेल, तर लवकरात लवकर कारवाई करा, अशा सूचना त्यांनी दिल्या होत्या. पर्रिकर यांनी सैन्याला पूर्णपणे सूट दिली होती. त्याशिवाय अत्याधुनिक शस्त्रास्त्रंदेखील दिली होती. यानंतर २९ सप्टेंबरचा दिवस निश्चित करण्यात आला. ती कारवाई पूर्णपणे यशस्वी झाली. यामध्ये पर्रिकर यांनी दाखवलेली इच्छाशक्ती महत्त्वाची ठरल्याचं निंभोरकर यांनी म्हटलं. 

टॅग्स :surgical strikeसर्जिकल स्ट्राइकManohar Parrikarमनोहर पर्रीकर