शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

'...तर येत्या काळात तिसरा सर्जिकल स्ट्राइकदेखील होऊ शकतो'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 06:54 IST

पर्रिकरांनी दाखवलेल्या इच्छाशक्तीचं  निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांच्याकडून कौतुक

पुणे: उरीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी प्रबळ इच्छाशक्ती दाखवली. त्यामुळेच सैन्याला पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक करता आला, असं मत निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी व्यक्त केलं आहे. राजकीय इच्छाशक्ती असल्यास अशा प्रकारच्या धाडसी मोहिमा पूर्ण केल्या जाऊ शकतात. येत्या काळात तिसरा सर्जिकल स्ट्राइकदेखील होऊ शकतो, असं ते पुढे म्हणाले. उरी हल्ल्याचा बदला म्हणून २९ सप्टेंबरला भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. यावर निंभोरकर यांनी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात भाष्य केलं. मनोहर पर्रिकर आणखी ४-५ वर्षे संरक्षणमंत्री राहिले असते, तर देशाच्या संरक्षण विभागाचं सामर्थ्य आणखी वाढलं असतं, असं निंभोरकर म्हणाले. 'पर्रिकर यांनी अवघ्या १५ दिवसांत जवानांसाठी १६ हजार कोटींची संरक्षण सामुग्री खरेदी करण्यास मंजुरी दिली. त्यामुळे आपलं सामर्थ्य ८० टक्क्यांपर्यंत वाढलं,' असं निंभोरकर यांनी सांगितलं. पर्रिकर यांनी सर्जिकल स्ट्राइक करण्यासाठी आवश्यक असलेली इच्छाशक्ती दाखवली. मुंबईवरील २६/११ हल्ल्यानंतरदेखील आपलं सैन्यदल कारवाईस सज्ज होतं. मात्र त्यावेळी राजकीय इच्छाशक्ती कमी पडली, असं ते म्हणाले.  उरी हल्ल्यानंतर तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मला फोन करुन सर्जिकल स्ट्राइकबद्दल विचारणा केली होती. आपली तयारी असेल, तर लवकरात लवकर कारवाई करा, अशा सूचना त्यांनी दिल्या होत्या. पर्रिकर यांनी सैन्याला पूर्णपणे सूट दिली होती. त्याशिवाय अत्याधुनिक शस्त्रास्त्रंदेखील दिली होती. यानंतर २९ सप्टेंबरचा दिवस निश्चित करण्यात आला. ती कारवाई पूर्णपणे यशस्वी झाली. यामध्ये पर्रिकर यांनी दाखवलेली इच्छाशक्ती महत्त्वाची ठरल्याचं निंभोरकर यांनी म्हटलं. 

टॅग्स :surgical strikeसर्जिकल स्ट्राइकManohar Parrikarमनोहर पर्रीकर