शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

गुजरातवर तिसरे संकट: प्रचंड पाऊस, महापुरानंतर ‘असना’ चक्रवादळ घोंघावतेय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 11:13 IST

गुजरात व उत्तर महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर आगामी दोन दिवस ६५ ते ७५ प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पाऊस आणि पूर यामुळे जनजीवन विस्कळीत झालेल्या गुजरातवर तिसरे संकट ‘असना’ चक्रीवादळाच्या रूपाने घोंघावत आहे. कधी नव्हे ते तब्बल ४८ वर्षांनी ऑगस्टमध्ये अरबी समुद्रात चक्रीवादळ येणार असून ते १२ तासांत गुजरातच्या तटावर पोहोचू शकते. त्यामुळे कच्छ आणि सौराष्ट्रात जाेरदार पावसाची शक्यता असून यंत्रणा अलर्टवर ठेवण्यात आल्या आहेत. कच्छमध्ये झोपड्यांत राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी आश्रय घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  

चक्रीवादळ ओमान किनाऱ्याकडे सरकण्याचा अंदाज आहे. गुजरात व उत्तर महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर आगामी दोन दिवस ६५ ते ७५ प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. त्यामुळे मच्छीमारांनासमुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुराचा वेढा कायमगुजरातमधील पावसाचा जोर कमी झाला असला तरी पुराच्या पाण्यामुळे अनेक खेडी, वाड्या-तांड्यांना पाण्याचा विळखा कायम आहे. राज्यात मागील २४ तासांत फक्त चार ठिकाणी १५ ते २६ मिमी पाऊस झाला, तर काही ठिकाणी हलका पाऊस झाला. कच्छ जिल्ह्यातील मांडवी, भुज, अंजार, नखटराना या भागांना पाण्याने वेढले आहे. विश्वामित्री नदी आता २३.१६ फुटांवरून वाहत आहे.

आवाहन काय?- गुजरातच्या कच्छ भागात बनलेले दबाव क्षेत्र शुक्रवारपर्यंत चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकते. - त्यामुळे झोपड्या आणि तात्पुरत्या निवाऱ्यात राहणाऱ्यांना शाळा,  मंदिरे आणि इतर इमारतींत आश्रय घेण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

१९७६ नंतर प्रथमच ऑगस्टमध्ये चक्रीवादळ अरबी समुद्रात निर्माण झाले आहे.१९८१  ते २०२३ दरम्यान ऑगस्टमध्ये केवळ तीन चक्रीवादळे आली आहेत.१९७६  चक्रीवादळ ओडिशात तयार झाले आणि अरबी समुद्रात दाखल झाले.१९४४ च्या चक्रीवादळाने उग्र रूप धारण केले होते.  १९६४ गुजरात किनाऱ्याजवळ चक्रीवादळ आले होते.

टोक्योत पूर परिस्थिती - जपान : जपानच्या बहुतांश भागात आलेल्या उष्ण कटिबंधीय वादळाचा परिणाम म्हणून टोक्यो आणि परिसरात शुक्रवारी मुसळधार पाऊस झाल्याने रस्ते, नद्यांच्या  किनाऱ्यावरील भाग जलमय झाले. - टोक्योच्या पश्चिम भागातील कानागावा प्रांतात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. टोक्यो, कानागावा आणि शिजुओका  प्रांतात जोरदार पाऊस आणि भूस्खलनाचा इशारा देण्यात आला आहे. 

एकाच कुटुंबातील १२ ठारउत्तर-पश्चिम पाकिस्तानमध्ये शुक्रवारी जोरदार पावसामुळे भूस्खलन होऊन एक घर त्याखाली गाडले गेले. त्यात ९ मुलांसह एकाच कुटुंबातील १२ जणांचा मृत्यू झाला. ही घटना खैबर पख्तूनख्वा प्रांतातील अप्पर दीर जिल्ह्यात झाली. सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या दुर्घटनेत दोन महिला, एक पुरुष आणि ९ मुलांचा मृत्यू झाला. येथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :weatherहवामानGujaratगुजरात