शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

Wayanad Landslides : "मेरे प्यारे वायनाड में..."; भूस्खलनानंतर चिमुकल्याच्या पत्राने जिंकलं इंडियन आर्मीचं मन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 16:52 IST

Wayanad Landslides : तिसरीतल्या एका चिमुकल्याने इंडियन आर्मीला पत्र लिहिलं आहे

केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलनामुळे मोठं नुकसान झालं आहे. सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. तिसरीतल्या एका चिमुकल्याने इंडियन आर्मीला पत्र लिहिलं आहे. केरळमधील शाळेत शिकणाऱ्या रेयानने हे पत्र मल्याळममध्ये सैनिकांना लिहिलं आहे. रेयानच्या या पत्राला इंडियन आर्मीने उत्तर दिलं. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या पत्रावर युजर्स प्रतिक्रिया देत आहेत. 

रेयानने पत्रात लिहिलं आहे की, "डियर इंडियन आर्मी, माझ्या आवडत्या वायनाडमध्ये भूस्खलनामुळे मोठा विध्वंस झाला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना तुम्ही वाचवत असलेलं पाहून मला खूप अभिमान आणि आनंद झाला. तो व्हिडीओ पाहिला ज्यात तुम्ही तुमची भूक भागवण्यासाठी बिस्किटं खात आहात आणि पूल बांधत आहात. या दृश्याने मला खूप प्रभावित केलं आणि प्रेरणा दिली. मीही एक दिवस सैन्यात भरती होऊन माझ्या देशाचं रक्षण करेन."

इंडियन आर्मीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर रेयानचे पत्र शेअर केले आहे. पत्र शेअर करताना त्यांनी लिहिलं की, "डियर रेयान, तुझ्या हृदयातून आलेले शब्द आम्हाला खूप भावले आहेत. संकटकाळात आशेचा किरण बनणे हे आमचे ध्येय आहे आणि तुझं पत्र आमच्या ध्येयाची पुष्टी करत आहे. तुझ्यासारखे हिरो आम्हाला आमचं सर्वोत्तम देण्यासाठी प्रेरणा देतात. आम्ही त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहोत जेव्हा तू आर्मीचा युनिफॉर्म परिधान करून आमच्यासोबत उभा राहशील. आपण एकत्र उभं राहू आणि देशाला अभिमान वाटावा यासाठी काम करू. तरुण योद्धा, तुझ्या धैर्याबद्दल आणि प्रेरणेबद्दल धन्यवाद."

केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलनामुळे मोठे नुकसान झालं आहे. वायनाडमधील मृतांची संख्या ३५८ वर पोहोचली आहे. इस्रोने सॅटेलाईट फोटो घेऊन केरळमधील १३ फुटबॉल स्टेडियम मैदानाइतके क्षेत्र उद्ध्वस्त झाल्याचा अंदाज व्यक्त केला होता. वायनाडमध्ये इंडियन आर्मीकडून सातत्याने बचावकार्य सुरू आहे. 

टॅग्स :landslidesभूस्खलनKeralaकेरळIndian Armyभारतीय जवान