शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Wayanad Landslides : "मेरे प्यारे वायनाड में..."; भूस्खलनानंतर चिमुकल्याच्या पत्राने जिंकलं इंडियन आर्मीचं मन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 16:52 IST

Wayanad Landslides : तिसरीतल्या एका चिमुकल्याने इंडियन आर्मीला पत्र लिहिलं आहे

केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलनामुळे मोठं नुकसान झालं आहे. सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. तिसरीतल्या एका चिमुकल्याने इंडियन आर्मीला पत्र लिहिलं आहे. केरळमधील शाळेत शिकणाऱ्या रेयानने हे पत्र मल्याळममध्ये सैनिकांना लिहिलं आहे. रेयानच्या या पत्राला इंडियन आर्मीने उत्तर दिलं. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या पत्रावर युजर्स प्रतिक्रिया देत आहेत. 

रेयानने पत्रात लिहिलं आहे की, "डियर इंडियन आर्मी, माझ्या आवडत्या वायनाडमध्ये भूस्खलनामुळे मोठा विध्वंस झाला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना तुम्ही वाचवत असलेलं पाहून मला खूप अभिमान आणि आनंद झाला. तो व्हिडीओ पाहिला ज्यात तुम्ही तुमची भूक भागवण्यासाठी बिस्किटं खात आहात आणि पूल बांधत आहात. या दृश्याने मला खूप प्रभावित केलं आणि प्रेरणा दिली. मीही एक दिवस सैन्यात भरती होऊन माझ्या देशाचं रक्षण करेन."

इंडियन आर्मीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर रेयानचे पत्र शेअर केले आहे. पत्र शेअर करताना त्यांनी लिहिलं की, "डियर रेयान, तुझ्या हृदयातून आलेले शब्द आम्हाला खूप भावले आहेत. संकटकाळात आशेचा किरण बनणे हे आमचे ध्येय आहे आणि तुझं पत्र आमच्या ध्येयाची पुष्टी करत आहे. तुझ्यासारखे हिरो आम्हाला आमचं सर्वोत्तम देण्यासाठी प्रेरणा देतात. आम्ही त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहोत जेव्हा तू आर्मीचा युनिफॉर्म परिधान करून आमच्यासोबत उभा राहशील. आपण एकत्र उभं राहू आणि देशाला अभिमान वाटावा यासाठी काम करू. तरुण योद्धा, तुझ्या धैर्याबद्दल आणि प्रेरणेबद्दल धन्यवाद."

केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलनामुळे मोठे नुकसान झालं आहे. वायनाडमधील मृतांची संख्या ३५८ वर पोहोचली आहे. इस्रोने सॅटेलाईट फोटो घेऊन केरळमधील १३ फुटबॉल स्टेडियम मैदानाइतके क्षेत्र उद्ध्वस्त झाल्याचा अंदाज व्यक्त केला होता. वायनाडमध्ये इंडियन आर्मीकडून सातत्याने बचावकार्य सुरू आहे. 

टॅग्स :landslidesभूस्खलनKeralaकेरळIndian Armyभारतीय जवान