शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

Corona Vaccine: तिसऱ्या बूस्टर डोसची गरज नाही; कोरोनाविषयक कृतिगटाचा केंद्र सरकारला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 07:01 IST

कोरोना लसीचे दोन्ही डोस  घेतले तरी कोणालाही पुन्हा हा आजार होऊ शकतो.

-हरीश गुप्तानवी दिल्ली : देशातील नागरिकांना कोरोना लसीचा तिसरा बूस्टर डोस देण्याची गरज नाही, असे केंद्र सरकारने नेमलेल्या कोरोनाविषयक कार्यगटाचे मत असून ते केंद्र सरकारला कळविण्यात आले आहे. 

कोरोना लसीचे दोन्ही डोस  घेतले तरी कोणालाही पुन्हा हा आजार होऊ शकतो. मात्र त्यामुळे या रुग्णाचा मृत्यू होण्याचा किंवा प्रकृती खूप गंभीर होण्याचा प्रकार टाळता येतो. कोरोना साथीबरील उपचारांबाबत धोरण ठरविण्यासाठी केंद्र सरकारने हा कार्यगट स्थापन केला आहे. या कार्यगटाने केंद्र सरकारला कळविले आहे की, कोरोना लस घेतलेल्यांना तिसरा बूस्टर डोस द्यावा, असे मत जागतिक आरोग्य संघटना किंवा अन्य महत्त्वाच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलेले नाही. अमेरिका, ब्रिटनमध्ये तिसरा बूस्टर डोस देण्यात आला पण त्याचे काही खास परिणाम दिसून आले नाहीत.

जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेचे संचालक व कोरोना कार्यगटाचे सदस्य डॉ. राकेश अग्रवाल यांनी सांगितले की, नजीकच्या काळात जास्तीत जास्त लोकांना लस देण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. या एकाच उपायाने मृत्यू व रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी होऊ शकेल.  पुन्हा कोरोना झालेल्यांपैकी ज्यांना एकाहून अधिक व्याधी नाहीत अशा लोकांच्या जीवाला तुलनेने कमी धोका असतो. अशा रुग्णांचा मृत्यू होणे किंवा त्यांना उपचारांसाठी अतिदक्षता विभागात दाखल करावे लागण्याची पाळी येण्याची शक्यता नसते.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या