शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 16:28 IST

Kanimozhi News: इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या द्रमुकच्या खासदार आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या भगिनी कनिमोळी यांच्या एका विधानामुळे मोठा वाद उफाळून आला आहे. काही काळापूर्वी स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी सनातन धर्माची खिल्ली उडवल्यानंतर आता कनिमोळी यांनी मारुतीरायाची खिल्ली उडवली आहे.

इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या द्रमुकच्या खासदार आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या भगिनी कनिमोळी यांच्या एका विधानामुळे मोठा वाद उफाळून आला आहे. काही काळापूर्वी स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी सनातन धर्माची खिल्ली उडवल्यानंतर आता कनिमोळी यांनी मारुतीरायाची खिल्ली उडवली आहे. एका सभेला संबोधित करताना कनिमोळी म्हणाल्या की, मारुती पहिल्यांदा चंद्रावर गेला होता, असे सांगणारे नेते तामिळनाडूमध्ये नाहीत ही चांगली बाब आहे. नाहीतर चंद्रावर आमची आजी गेली होती आणि ती तिथेच थांबली आहे, असंही त्यांनी सांगितलं असतं असा टोला, कनिमोळी यांनी लगावला.

त्यांनी पुढे सांगितले की, तामिळनाडूमधील मुलांना विचारलं की, चंद्रावर पहिलं पाऊल कुणी ठेवलं होतं तर ते  नील आर्मस्ट्राँग असं उत्तर देतील. मात्र उत्तर भारतातील काही नेत्यांना विचारलं तर ते सांगतील की, हनुमान सर्वप्रथम चंद्रावर गेला होता. त्यानंतर कनिमोळी यांनी आजीबाईंच्या कहाण्यांना लक्ष्य करत सनातन धर्मातील परंपरांची खिल्ली उडवली. दरम्यान, डीएमकेच्या नेत्यांकडून हिंदू देवदेवता आणि धर्माची खिल्ली उडवण्यात आल्याची ही काही पहिलीच  वेळ नाही आहे. याआधीही डीएमकेच्या नेत्यांनी सनातन धर्माची खिल्ली उडवलेली आहे. द्रविड आंदोलनाच्या नावावर डीएमकेकडून कधी रामायणातील पात्रांना लक्ष्य केलं जातं. तर कधी कधी देव-देवतांची खिल्ली उडवली जाते. यावेळी कनिमोळी यांनी मारुतीला लक्ष्य केलं गेलं आहे.कनिमोळी यांनी पुढे सांगितलं की, तमिळ संस्कृती आक्रमकांनाही तोडता आलेली नाही. तसेच द्रविड आंदोलन ही तमिळांच्या अधिकारांचा आवाज आहे.  दरम्यान, हे व्होट बँकेचं राजकारण असून, त्यासाठी सनातन धर्मातील देवदेवता आणि परंपरांना लक्ष्य केलं जात असल्याचं राजकीय क्षेत्रातील जाणकारांनी म्हटलं आहे. तर कनिमोळी यांच्या विधानाविरिोधात सोशल मीडियावरून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच हे विधान सनातनविरोधी मानसिकतेतून आलेलं आहे, अशी टीता तकण्यात येत आहे.इतर धर्मांवर टीका केली असती तर माफी मागावी लागली असती. मात्र हिंदू धर्माविरोधात असं काही बोलल्यास ती गंमत समजली जाते, असे एका युझरने म्हटले आहे. तर कनिमोळी यांच्या विधानावर भाजपासह विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली आहे. तसेच डीएमकेचा अजेंडा हा सनातनविरोधी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूDravid Munnetra Kazhagamद्रविड मुनेत्र कझागमINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी