शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 17:25 IST

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. "अपमानाचे मंत्रालय" स्थापन करावे, असा टोला गांधी यांनी लगावला. छठपूजेवरील राहुल गांधींच्या विधानावर त्यांनी पंतप्रधान मोदींवर प्रत्युत्तर दिले.

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधानांनी अपमानाचे मंत्रालय स्थापन करावे कारण ते सतत विरोधी नेत्यांवर देशाचा आणि बिहारचा अपमान केल्याचा आरोप करतात, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली.

काही दिवसांपूर्वी पीएम मोदी यांनी राहुल गांधी यांच्या टीकेला छठपूजेचा अपमान अपमान असे म्हटले होते. या टीकेला आता प्रियांका गांधी यांनी प्रत्युत्तर दिले. बिहारमधील मुझफ्फरपूर येथे एका रॅलीदरम्यान ही टीका केली. राहुल गांधी यांनी रेखा सरकारने दिल्लीत छठपूजेसाठी बांधलेल्या घाटाचा उल्लेख केला होता.

राहुल गांधींची टीका काय होती?

राहुल गांधी म्हणाले होते, "त्यांनी एक नाटक केले आणि भारताबद्दलचे सत्य उघड केले. यमुनेचे पाणी घाणेरडे आहे. ते प्यायल्याने तुम्ही आजारी पडाल किंवा मराल. कोणीही त्यात जाऊ शकत नाही. पाणी इतके घाणेरडे आहे की जर तुम्ही त्यात पाऊल ठेवले तर तुम्ही आजारी पडाल किंवा संसर्ग होईल. पण पंतप्रधान मोदींनी एक नाटक केले."

राहुल गांधी म्हणाले, "त्यांनी तिथे एक लहान तलाव बांधला. निवडणुकीच्या वेळी ते तुम्हाला काहीही दाखवतील. मागून एक पाईप बसवण्यात आला होता. त्यातून स्वच्छ पाणीपुरवठा केला जात होता. पण समस्या अशी होती की कोणीतरी पाईपचा फोटो काढला." पंतप्रधानांनी राहुल गांधींच्या हल्ल्याला छठचा अपमान असल्याचे म्हटले होते.

प्रियांका गांधी यांनी निशाणा साधला

पंतप्रधान मोदींनी विचारले, "मतांसाठी छठीमैय्याचा अपमान करणाऱ्यांना बिहार आणि भारत माफ करेल का? छठच्या वेळी उपवास करणाऱ्या माता आणि भगिनी अशा अपमान सहन करतील का आणि त्यांना शिक्षा करणार नाहीत का?" प्रियांका गांधी यांनी पंतप्रधानांच्या उत्तरावर टीका केली.

"पंतप्रधान अनावश्यक मुद्द्यांवर बोलतात, परंतु बिहारमधील एनडीए सरकारच्या भ्रष्टाचार आणि गैरकारभाराबद्दल एकही शब्द बोलत नाहीत, अशी टीका प्रियांका गांधीनी केली. त्यांनी बिहार सरकारवर दिल्लीवरून रिमोट कंट्रोल असल्याचा आरोपही केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Priyanka Gandhi Attacks PM Modi, Suggests Ministry of Humiliation

Web Summary : Priyanka Gandhi criticized PM Modi, suggesting a 'Ministry of Humiliation' due to his constant accusations against opposition leaders. This followed Modi's condemnation of Rahul Gandhi's remarks about Chhath Puja, which he deemed disrespectful. Gandhi accused the NDA government in Bihar of corruption and misgovernance, controlled remotely from Delhi.
टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी