शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम मशिदीत शस्त्रास्त्रं ठेवतात, त्यांना जागा दाखवणार, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 13:24 IST

कर्नाटकातल्या भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमदार रेणुकाचार्य यांनी मुस्लिमांसंदर्भात वादग्रस्त विधान केलं आहे.

ठळक मुद्देकर्नाटकातल्या भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमदार रेणुकाचार्य यांनी मुस्लिमांसंदर्भात वादग्रस्त विधान केलं आहे. देवनागरेमध्ये एका रॅलीला संबोधित करताना रेणुकाचार्य यांनी मुस्लिमांवर गंभीर आरोप केला आहे.मुस्लिम लोक मशिदीमध्ये शस्त्रास्त्रं जमवून ठेवतात. मुस्लिमांना मी त्यांची जागा दाखवून देणार आहे.

बंगळुरूः कर्नाटकातल्या भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमदार रेणुकाचार्य यांनी मुस्लिमांसंदर्भात वादग्रस्त विधान केलं आहे. देवनागरेमध्ये एका रॅलीला संबोधित करताना रेणुकाचार्य यांनी मुस्लिमांवर गंभीर आरोप केला आहे. मुस्लिम लोक मशिदीमध्ये शस्त्रास्त्रं जमवून ठेवतात. मुस्लिमांना मी त्यांची जागा दाखवून देणार आहे. राजकारण काय असतं ते लवकरच समजेल, असा धमकीवजा इशाराच भाजपाच्या कर्नाटकातील आमदारानं मुस्लिमांना दिला आहे. त्यामुळे कर्नाटकातल्या राजकारणातही खळबळ उडाली आहे. देवनागरेच्या होनाली येथे सोमवारी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. मुस्लिम समुदायातील लोक मशिदीत नमाज पठण करण्याऐवजी शस्त्रास्त्रं गोळा करून ठेवतात. इथे काही जण देशद्रोही आहेत. तुम्ही लोक मशिदीत बसता आणि फतवे काढता?, मशिदीत काय तर शस्त्रास्त्रं गोळा केली जात आहेत. त्यासाठी तुम्हाला मशीद हवी आहे काय?, जर तुम्हाला असंच काही तरी करायचं असल्यास ठीक आहे. मी माझं राजकारण करत राहीन, असंही रेणुकाचार्य म्हणाले आहेत. रेणुकाचार्य हे कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्याजवळचे समजले जातात. रेणुकाचार्य पुढे म्हणाले, मी मुस्लिमांसाठी मिळालेला निधी हिंदूंवर खर्च करण्यासाठी अजिबात मागे-पुढे पाहणार नाही. मी तालुक्यात मुस्लिमांसाठी मिळालेला निधी हिंदूवर खर्च करणार आहे. भाजपाचे आमदार एम. पी. रेणुकाचार्च यांना येडियुरप्पा सरकारमध्ये कॅबिनेटचा दर्जा मिळालेला आहे. रेणुकाचार्य हे वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत असतात. रेणुकाचार्य यांच्या आधी भाजपाचे आमदार सोमशेखर रेड्डी यांनीसुद्धा बेल्लारीमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ मुस्लिम समुदायाविरोधात विधान केलं होतं. आम्ही 80 टक्के आहोत, तुम्ही फक्त 17 टक्के आहात, विचार करा, जर सीएए लागू झाला तर तुमचे काय हाल होतील?, सावध राहा, असंही सोमशेखर रेड्डी म्हणाले होते. 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारण