शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

"यांना तर गवार आणि तुरीमधला फरक समजत नाही, केजरीवाल आणि राहुल गांधींवर बोचरी टीका’’

By बाळकृष्ण परब | Updated: December 18, 2020 13:47 IST

Farmer Protest : केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात सध्या दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावरून सध्या राजकारणही जोरात सुरू आहे.

ठळक मुद्देदिल्लीचे मुख्यमंत्री असलेल्या केजरीवाल यांच्याकडे केवळ एका शहराच्या महापौरांकडे असतात तेवढेच अधिकार राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना गवार आणि तुरीमधील फरक माहिती नसेल याबाबत माझ्या मनात काहीच शंका नाहीकेजरीवाल आता संपूर्ण देशाच्या राजकारणात आपला दबदबा बनवू इच्छित आहेत. मात्र ते कागदी वाघापेक्षा अधिक काही नाही आहेत

अहमदाबाद - केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात सध्या दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावरून सध्या राजकारणही जोरात सुरू आहे. दरम्यान, गुजरात प्रदेश भाजपाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. दोन्ही नेत्यांना गवार आणि तूर यांच्यातील फरक समजतो का, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे.पाटील यांनी केजरीवाल यांचा उल्लेख कागदी वाघ असा केला. तर काँग्रेस शेतकऱ्यांना भ्रमित करत आहे, असा आरोप केला. ते म्हणाले की, काँग्रेस जेव्हा सत्तेत होती. तेव्हा ती कृषी सुधारणांच्या बाजूने होती. सूरत जिल्ह्यातील बार्डोली येथे शेतकऱ्यांच्या एका सभेला संबोधित करताना पाटील यांनी सांगितले की, दिल्ली एक शहर आहे, त्याला राज्याचा दर्जा मिळालेला आहे. त्यामुळे त्याला एक मुख्यमंत्रीही आहे. खरंतर दिल्लीचे मुख्यमंत्री असलेल्या केजरीवाल यांच्याकडे केवळ एका शहराच्या महापौरांकडे असतात तेवढेच अधिकार आहेत.त्यांनी सांगितले की, केजरीवाल आता संपूर्ण देशाच्या राजकारणात आपला दबदबा बनवू इच्छित आहेत. मात्र ते कागदी वाघापेक्षा अधिक काही नाही आहेत. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी भाजपाच्या नेत्यांनी तिन्ही कृषी कायद्यांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी सभांचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे.यादरम्यान, आयोजित करण्यात आलेल्या एका सभेमध्ये पाटील म्हणाले की, राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना गवार आणि तुरीमधील फरक माहिती नसेल याबाबत माझ्या मनात काहीच शंका नाही. असे लोक आज शेतकऱ्यांच्या हिताच्या बाता मारत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. चंद्रकांत पाटील हे गुजरात भाजपाचे बिगर गुजराती अध्यक्ष आहेत. ते मुळचे जळगावचे आहेत. त्यांनी सुरुवातीच्या काळात पोलीस दलात काम केले होते . 

टॅग्स :PoliticsराजकारणRahul Gandhiराहुल गांधीArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपा