शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

धक्कादायक! हॉस्पिटलची ऑक्सिजन पुरवठा करणारी लाईन चोरट्यांनी कापली, २० मुलांचे प्राण संकटात, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 13:31 IST

Rajasthan News : राजस्थानमधील अलवर येथून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. येथे चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने केलेल्या एका कृतीमुळे २० मुलांचे प्राण संकटात सापडले होते

जयपूर - राजस्थानमधील अलवर येथून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. येथे चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने केलेल्या एका कृतीमुळे २० मुलांचे प्राण संकटात सापडले होते. या चोरट्यांनी रविवारी रात्री रुग्णालयात घुसले. तिथे त्यांनी ऑक्सिजन सप्लाय करणारी पाइप लाइन चोरण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी चोरांनी ऑक्सिजन पाइप लाइन कापली. त्यामुळे एफबीएनसी वॉर्डमध्ये सुमारे २० नवजात मुले ऑक्सिजन सपोर्टवर होते. या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला. घाईगडबडीत रुग्णालयातील स्टाफने तिथे असलेले लोक आणि पोलिसांच्या मदतीने सिलेंडरच्या मदतीने मुलांचे प्राण वाचवले. सुदैवाने यादरम्यान, रुग्णालयात मोठी दुर्घटना घडली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील गीतानंद शिशू रुग्णालयामध्ये रविवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. हॉस्पिटलमध्ये असलेली ऑक्सिजन सप्लायची पाईप लाइन चोरण्याच्या प्रयत्नामध्ये चोरट्यांनी ती कापली. त्यावेळी रुग्णालयातील एफबीएनची वॉर्डमध्ये भरती २० मुले ऑक्सिजन सपोर्टवर होती. अचानक ऑक्सिजनची सप्लाय बंद झाल्याने मुलांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यादरम्यान तिथे असलेल्या गार्डनी रुग्णालयाच्या मागून चोरट्यांना पळताना पाहिले. त्याने आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक लोकांनी आणि रुग्णांच्या नातेवाईकांच्या मदतीने दोन चोरांना पकडण्यात आले. त्यानंतर त्यांना पोलिसांकडे सोपवण्यात आले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी लोकांच्या मदतीने रुग्णालयाच्या परिसरात ठेवलेले १० ऑक्सिजन एफबीएनसी वॉर्डमध्ये नेऊन नवजात मुलांना ऑक्सिजन लावले.  

या प्रकरणाची माहिती त्वरित रुग्णालय प्रशासनाला देण्यात आली. अधिकाऱ्यांनी इंजिनियर्सना घटनास्थळी बोलावत रात्रीच पाइपलाइन दुरुस्त केली. त्यानंतर पुन्हा आयसीयूमध्ये ऑक्सिजन लाइन सुरू झाली.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानhospitalहॉस्पिटल