शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

या कार्यालयांनी घेतली सर्वाधिक ‘चिरीमिरी’; केंद्रीय दक्षता आयोगाच्या अहवालातील माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 13:16 IST

सर्वात कमी तक्रारी एका महत्त्वाच्या विभागात आल्या

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : मागील वर्षभरात केंद्रीय गृहमंत्रालयातील कर्मचाऱ्यांविरोधात भ्रष्टाचाराच्या सर्वाधिक तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यापाठोपाठ रेल्वे आणि बँकांमधील कर्मचाऱ्यांविरोधात तक्रारी आल्याचे केंद्रीय दक्षता आयोगाच्या (सीव्हीसी) अहवालातून समोर आले आहे. 

केंद्राच्या अखत्यारीतील विविध विभाग व संस्थांमध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात भ्रष्टाचाराच्या मागील वर्षभरात एकूण १,१५,२०३ तक्रारी दाखल झाल्या. त्यापैकी ८५,४३७ तक्रारींचा निपटारा करण्यात आला, तर २९,७६६ तक्रारी प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे २२,०३४ तक्रारी सुमारे तीन महिन्यांहून अधिक कालावधीपासून प्रलंबित आहे. दाखल झालेल्या तक्रारींपैकी सर्वाधिक तक्रारी गृहमंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांविरोधातील असल्याचे अहवालात नमूद केले. 

अन्य विभागांचे काय?

गत वर्षभरात केंद्रीय गृहनिर्माण तसेच नगरविकास मंत्रालय, दिल्ली विकास प्राधिकरण, दिल्ली मेट्रो रेल निगम, दिल्ली शहरी कला आयोग, हिंदुस्तान प्रीफॅब लिमिटेड, गृह आणि शहरी विकास निगम लिमिटेड, एनबीसीसी आणि एनसीआर योजना मंडळाच्या कर्मचाऱ्यांविरोधात ४,७१० तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यापैकी ३,८८९ तक्रारींचा निपटारा केला, तर ८२१ तक्रारी प्रलंबित आहेत.

  • २९,७६६ - प्रलंबित तक्रारी
  • २२,०३४ - ३ महिने प्रलंबित

ग्रामविकास विभाग भ्रष्टाचारमुक्त?

मागील वर्षभरात ग्रामविकास विभागाविरोधात भ्रष्टाचाराची केवळ १ तक्रार दाखल झाली आणि तिचाही निपटारा करण्यात आला.

विभागनिहाय सर्वाधिक तक्रारी

विभाग | दाखल | निपटारा | प्रलंबित | ३ महिने+ प्रलंबित

गृह    ४६,६४३    २३,९१९    २२,७२४    १९,१९८रेल्वे    १०,५८०    ९,६६३    ९१७    ९बँक    ८,१२९    ७,७६२    ३६७    ७८ एनसीटी    ७,३७०    ६,८०४    ५६६    १८ कोळसा    ४,३०४    ४०५०    २५४    ७२ कामगार    ४,२३६    ४,०१६    २२०    १५ पेट्रोलियम    २,६१७    २,४०९    २०८    २९ 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणIndiaभारत