शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

'हे 3 कृषी कायदे शेतकऱ्यांसाठीच नाही, तर जनता अन् देशासाठीही घातक'

By महेश गलांडे | Updated: February 6, 2021 11:57 IST

राहुल गांधींनी ट्विट करुन आंदोलनाला पूर्ण समर्थन असल्याचं म्हटलंय. 

ठळक मुद्देअन्नदाता शेतकऱ्याचं शांतीपूर्ण आंदोलन देशाच्या हितासाठीच आहे, हे तीन कृषी कायदे केवळ शेतकरी आणि मजूरांसाठीच नाही, तर जनता आणि देशासाठीही घातक आहेत.

नवी दिल्ली - मोदी सरकारने लागू केलेल्या तीन कृषी विधेयकांवरुन दिल्लीतील रस्त्यांवर आणि संसदेतही चर्चा सुरु आहे. दिल्लीच्या सीमारेषांवर गेल्या 70 दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र, अद्यापही शेतकरी आणि सरकार यांच्यातीतल चर्चेतून अंतिम तोडगा निघाला नाही. विरोधी पक्षही सातत्याने केंद्र सरकारला तीन कृषी कायद्यांवरुन कोंडीत पकडत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन नेहमीच यासंदर्भात ट्विट करतात. आता, पुन्हा एकदा तिन्ही कृषी कायद्यांबाबत राहुल गांधींनी ट्विट केलं आहे. 

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांनी शनिवारी ६ फेब्रुवारीला देशव्यापी चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. मात्र, त्यात दिल्लीसह उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे शेतकरी सहभागी होणार नसल्याने या राज्यांमध्ये आंदोलन होणार नसल्याचे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी स्पष्ट केले. फक्त राष्ट्रीय आणि राज्य मार्ग जाम करण्याचे आवाहन भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी केले आहे. या चक्का जाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकही आक्रमक होताना दिसत आहेत. राहुल गांधींनी ट्विट करुन आंदोलनाला पूर्ण समर्थन असल्याचं म्हटलंय. 

अन्नदाता शेतकऱ्याचं शांतीपूर्ण आंदोलन देशाच्या हितासाठीच आहे, हे तीन कृषी कायदे केवळ शेतकरी आणि मजूरांसाठीच नाही, तर जनता आणि देशासाठीही घातक आहेत, असे राहुल गांधींनी म्हटलं आहे. राहुल गांधींनी ट्विट करुन पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

दिल्लीतील उप्रदव हा पूर्वनियोजित कट?

दिल्लीतील शेतकरी आंदोलनात 26 जानेवारी रोजी लाल किल्ल्यावर झालेल्या उपद्रवाचा कट आधीपासून ठरवण्यात आला होता. असा धक्कादायक खुलासा दिल्ली पोलीस क्राईम ब्रांचच्या SIT चौकशीतून समोर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपद्रव करण्यासाठी काही विशेष गटांना लाल किल्ला आणि आयटीओवर एकत्र होण्यास सांगण्यात आले होते. यांचा उद्देश आंदोलकांमध्ये उपस्थित राहून उपद्रव सुरू करणे आणि नंतर आंदोलन कर्त्यांना उपद्रवात सामील करणे, असा होता.

हिंसाचार प्रकरणात 124 हून अधिक लोकांना अटक -

दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांचची SIT 26 जानेवारीला झालेल्या हिंसाचाराची चौकशी करत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तब्बल 124 जणांना अटक केली आहे. तर 44 FIR दाखल करण्यात आल्या आहेत. संबंधित 44 प्रकरणांपैकी 14 प्रकरणांचा तपास SIT करत आहे. या शिवाय पोलिसांकडून 70 हून अधिक लोकांचे फोटोही जारी करण्यात आले आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीFarmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्लीFarmerशेतकरी