शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

'हे 3 कृषी कायदे शेतकऱ्यांसाठीच नाही, तर जनता अन् देशासाठीही घातक'

By महेश गलांडे | Updated: February 6, 2021 11:57 IST

राहुल गांधींनी ट्विट करुन आंदोलनाला पूर्ण समर्थन असल्याचं म्हटलंय. 

ठळक मुद्देअन्नदाता शेतकऱ्याचं शांतीपूर्ण आंदोलन देशाच्या हितासाठीच आहे, हे तीन कृषी कायदे केवळ शेतकरी आणि मजूरांसाठीच नाही, तर जनता आणि देशासाठीही घातक आहेत.

नवी दिल्ली - मोदी सरकारने लागू केलेल्या तीन कृषी विधेयकांवरुन दिल्लीतील रस्त्यांवर आणि संसदेतही चर्चा सुरु आहे. दिल्लीच्या सीमारेषांवर गेल्या 70 दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र, अद्यापही शेतकरी आणि सरकार यांच्यातीतल चर्चेतून अंतिम तोडगा निघाला नाही. विरोधी पक्षही सातत्याने केंद्र सरकारला तीन कृषी कायद्यांवरुन कोंडीत पकडत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन नेहमीच यासंदर्भात ट्विट करतात. आता, पुन्हा एकदा तिन्ही कृषी कायद्यांबाबत राहुल गांधींनी ट्विट केलं आहे. 

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांनी शनिवारी ६ फेब्रुवारीला देशव्यापी चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. मात्र, त्यात दिल्लीसह उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे शेतकरी सहभागी होणार नसल्याने या राज्यांमध्ये आंदोलन होणार नसल्याचे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी स्पष्ट केले. फक्त राष्ट्रीय आणि राज्य मार्ग जाम करण्याचे आवाहन भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी केले आहे. या चक्का जाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकही आक्रमक होताना दिसत आहेत. राहुल गांधींनी ट्विट करुन आंदोलनाला पूर्ण समर्थन असल्याचं म्हटलंय. 

अन्नदाता शेतकऱ्याचं शांतीपूर्ण आंदोलन देशाच्या हितासाठीच आहे, हे तीन कृषी कायदे केवळ शेतकरी आणि मजूरांसाठीच नाही, तर जनता आणि देशासाठीही घातक आहेत, असे राहुल गांधींनी म्हटलं आहे. राहुल गांधींनी ट्विट करुन पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

दिल्लीतील उप्रदव हा पूर्वनियोजित कट?

दिल्लीतील शेतकरी आंदोलनात 26 जानेवारी रोजी लाल किल्ल्यावर झालेल्या उपद्रवाचा कट आधीपासून ठरवण्यात आला होता. असा धक्कादायक खुलासा दिल्ली पोलीस क्राईम ब्रांचच्या SIT चौकशीतून समोर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपद्रव करण्यासाठी काही विशेष गटांना लाल किल्ला आणि आयटीओवर एकत्र होण्यास सांगण्यात आले होते. यांचा उद्देश आंदोलकांमध्ये उपस्थित राहून उपद्रव सुरू करणे आणि नंतर आंदोलन कर्त्यांना उपद्रवात सामील करणे, असा होता.

हिंसाचार प्रकरणात 124 हून अधिक लोकांना अटक -

दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांचची SIT 26 जानेवारीला झालेल्या हिंसाचाराची चौकशी करत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तब्बल 124 जणांना अटक केली आहे. तर 44 FIR दाखल करण्यात आल्या आहेत. संबंधित 44 प्रकरणांपैकी 14 प्रकरणांचा तपास SIT करत आहे. या शिवाय पोलिसांकडून 70 हून अधिक लोकांचे फोटोही जारी करण्यात आले आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीFarmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्लीFarmerशेतकरी