शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

'हे 3 कृषी कायदे शेतकऱ्यांसाठीच नाही, तर जनता अन् देशासाठीही घातक'

By महेश गलांडे | Updated: February 6, 2021 11:57 IST

राहुल गांधींनी ट्विट करुन आंदोलनाला पूर्ण समर्थन असल्याचं म्हटलंय. 

ठळक मुद्देअन्नदाता शेतकऱ्याचं शांतीपूर्ण आंदोलन देशाच्या हितासाठीच आहे, हे तीन कृषी कायदे केवळ शेतकरी आणि मजूरांसाठीच नाही, तर जनता आणि देशासाठीही घातक आहेत.

नवी दिल्ली - मोदी सरकारने लागू केलेल्या तीन कृषी विधेयकांवरुन दिल्लीतील रस्त्यांवर आणि संसदेतही चर्चा सुरु आहे. दिल्लीच्या सीमारेषांवर गेल्या 70 दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र, अद्यापही शेतकरी आणि सरकार यांच्यातीतल चर्चेतून अंतिम तोडगा निघाला नाही. विरोधी पक्षही सातत्याने केंद्र सरकारला तीन कृषी कायद्यांवरुन कोंडीत पकडत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन नेहमीच यासंदर्भात ट्विट करतात. आता, पुन्हा एकदा तिन्ही कृषी कायद्यांबाबत राहुल गांधींनी ट्विट केलं आहे. 

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांनी शनिवारी ६ फेब्रुवारीला देशव्यापी चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. मात्र, त्यात दिल्लीसह उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे शेतकरी सहभागी होणार नसल्याने या राज्यांमध्ये आंदोलन होणार नसल्याचे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी स्पष्ट केले. फक्त राष्ट्रीय आणि राज्य मार्ग जाम करण्याचे आवाहन भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी केले आहे. या चक्का जाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकही आक्रमक होताना दिसत आहेत. राहुल गांधींनी ट्विट करुन आंदोलनाला पूर्ण समर्थन असल्याचं म्हटलंय. 

अन्नदाता शेतकऱ्याचं शांतीपूर्ण आंदोलन देशाच्या हितासाठीच आहे, हे तीन कृषी कायदे केवळ शेतकरी आणि मजूरांसाठीच नाही, तर जनता आणि देशासाठीही घातक आहेत, असे राहुल गांधींनी म्हटलं आहे. राहुल गांधींनी ट्विट करुन पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

दिल्लीतील उप्रदव हा पूर्वनियोजित कट?

दिल्लीतील शेतकरी आंदोलनात 26 जानेवारी रोजी लाल किल्ल्यावर झालेल्या उपद्रवाचा कट आधीपासून ठरवण्यात आला होता. असा धक्कादायक खुलासा दिल्ली पोलीस क्राईम ब्रांचच्या SIT चौकशीतून समोर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपद्रव करण्यासाठी काही विशेष गटांना लाल किल्ला आणि आयटीओवर एकत्र होण्यास सांगण्यात आले होते. यांचा उद्देश आंदोलकांमध्ये उपस्थित राहून उपद्रव सुरू करणे आणि नंतर आंदोलन कर्त्यांना उपद्रवात सामील करणे, असा होता.

हिंसाचार प्रकरणात 124 हून अधिक लोकांना अटक -

दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांचची SIT 26 जानेवारीला झालेल्या हिंसाचाराची चौकशी करत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तब्बल 124 जणांना अटक केली आहे. तर 44 FIR दाखल करण्यात आल्या आहेत. संबंधित 44 प्रकरणांपैकी 14 प्रकरणांचा तपास SIT करत आहे. या शिवाय पोलिसांकडून 70 हून अधिक लोकांचे फोटोही जारी करण्यात आले आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीFarmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्लीFarmerशेतकरी