शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

...म्हणून भारताच्या लोकसंख्येची जातिनिहाय आकडेवारी समजणे आवश्यक, राहुल गांधींचं मोठं विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 16:20 IST

Rahul Gandhi: बिहार सरकारने केलेल्या जातिनिहाय जनगणनेची आकडेवारी समोर आली आहे. त्यानंतर आता या आकडेवारीवरून राजकारण पेटले आहे.

बिहार सरकारने केलेल्या जातिनिहाय जनगणनेची आकडेवारी समोर आली आहे. त्यानंतर आता या आकडेवारीवरून राजकारण पेटले आहे. एकीकडे लालूप्रसाद यादव यांनी हा ऐतिहासिक दिवस असल्याचे सांगत ज्यांची जेवढी संख्या त्यांना तेवढं हिस्सा मिळाला पाहिजे असं विधान केलं आहे. तर आता राहुल गांधी यांनीही जातिनिहाय जनगणनेबाबत मोठं विधान केलं आहे. जेवढी लोकसंख्या तेवढा हक्क हा आमचा पण आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

राहुल गांधी यांनी सांगितले की, बिहारच्या जातिनिहाय जनगणनेमधून समजले की, बिहारमध्ये ओबीसी+एससी+एसटी यांची एकूण संख्या ८४ टक्के आहे. मात्र केंद्र सरकारच्या ९० सचिवांमध्ये केवळ ३ ओबीसी आहेत. ते भारताचं केवळ ५ टक्के बजेट सांभाळतात. त्यामुळे भारताची जातिनिहाय लोकसंख्या कळणे आवश्य आहे. जेवढी लोकसंख्या तेवढा हक्क हे आमचे वचन आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

बिहारच्या राजकारणात कळीचा मुद्दा ठरलेल्या जातिनिहाय जनगणनेची आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार राज्यात राजपूत ३.४५% यादव १४%, भूमिहार २.८६%, ब्राह्मण ३.६५% आणि नौनिया १.९% एवढे आहेत. बिहारमधील जातिनिहाय जनगणनेनुसार राज्यात मागासवर्गीय (३ कोटी ५४ लाख ६३ हजार ९३६) २७.१२ टक्के, अतिमागास वर्गीय (४ कोटी ७० लाख, ८० हजार ५१४) ३६.०१ टक्के, अनुसूचित जाती (२ कोटी ५६ लाख ८९ हजार ८२०) १९.६५ टक्के, अनुसूचित जमाती (२१ लाख, ९९ हजार ३६१) १.६८ टक्के आणि अनारक्षित (२ कोटी २ लाख ९१ हजार ६७९) १५.५२ टक्के आहेत.

जातिनिहाय जनगणनेतील आकडेवारीनुसार बिहारमध्ये हिंदू ८१.९९ टक्के, मुस्लिम १७.७० टक्के, ख्रिश्चन ०.०५ टक्के, शिख ०.०११ टक्के, बौद्ध ०.०८५१ टक्के, जैन ०.००९६ टक्के आणि इतर धर्मीय ०.१२७४ टक्के आहेत. त्याशिवाय ०.००१६ टक्के लोकांचा कुठलाही धर्म नाही आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBiharबिहार