शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

...म्हणून भारताच्या लोकसंख्येची जातिनिहाय आकडेवारी समजणे आवश्यक, राहुल गांधींचं मोठं विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 16:20 IST

Rahul Gandhi: बिहार सरकारने केलेल्या जातिनिहाय जनगणनेची आकडेवारी समोर आली आहे. त्यानंतर आता या आकडेवारीवरून राजकारण पेटले आहे.

बिहार सरकारने केलेल्या जातिनिहाय जनगणनेची आकडेवारी समोर आली आहे. त्यानंतर आता या आकडेवारीवरून राजकारण पेटले आहे. एकीकडे लालूप्रसाद यादव यांनी हा ऐतिहासिक दिवस असल्याचे सांगत ज्यांची जेवढी संख्या त्यांना तेवढं हिस्सा मिळाला पाहिजे असं विधान केलं आहे. तर आता राहुल गांधी यांनीही जातिनिहाय जनगणनेबाबत मोठं विधान केलं आहे. जेवढी लोकसंख्या तेवढा हक्क हा आमचा पण आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

राहुल गांधी यांनी सांगितले की, बिहारच्या जातिनिहाय जनगणनेमधून समजले की, बिहारमध्ये ओबीसी+एससी+एसटी यांची एकूण संख्या ८४ टक्के आहे. मात्र केंद्र सरकारच्या ९० सचिवांमध्ये केवळ ३ ओबीसी आहेत. ते भारताचं केवळ ५ टक्के बजेट सांभाळतात. त्यामुळे भारताची जातिनिहाय लोकसंख्या कळणे आवश्य आहे. जेवढी लोकसंख्या तेवढा हक्क हे आमचे वचन आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

बिहारच्या राजकारणात कळीचा मुद्दा ठरलेल्या जातिनिहाय जनगणनेची आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार राज्यात राजपूत ३.४५% यादव १४%, भूमिहार २.८६%, ब्राह्मण ३.६५% आणि नौनिया १.९% एवढे आहेत. बिहारमधील जातिनिहाय जनगणनेनुसार राज्यात मागासवर्गीय (३ कोटी ५४ लाख ६३ हजार ९३६) २७.१२ टक्के, अतिमागास वर्गीय (४ कोटी ७० लाख, ८० हजार ५१४) ३६.०१ टक्के, अनुसूचित जाती (२ कोटी ५६ लाख ८९ हजार ८२०) १९.६५ टक्के, अनुसूचित जमाती (२१ लाख, ९९ हजार ३६१) १.६८ टक्के आणि अनारक्षित (२ कोटी २ लाख ९१ हजार ६७९) १५.५२ टक्के आहेत.

जातिनिहाय जनगणनेतील आकडेवारीनुसार बिहारमध्ये हिंदू ८१.९९ टक्के, मुस्लिम १७.७० टक्के, ख्रिश्चन ०.०५ टक्के, शिख ०.०११ टक्के, बौद्ध ०.०८५१ टक्के, जैन ०.००९६ टक्के आणि इतर धर्मीय ०.१२७४ टक्के आहेत. त्याशिवाय ०.००१६ टक्के लोकांचा कुठलाही धर्म नाही आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBiharबिहार